Monday, 8 April 2024

कसे आहेत माझ्या पत्रिकेतील ग्रह ?- भाग 2.

 || श्री स्वामी समर्थ ||


सूर्यमालिकेत रवी राजा आणि चंद्र राणी मानले तर बुध हा राजकुमार आहे. पण तो किशोर वयातील आहे. बुध म्हणजे शब्द , भाषा , वक्तृत्व त्यामुळे बुध ज्यांचा चांगला असतो ते बोलण्यात हुशार , अनेक भाषा जाणणारे बोलणारे असतात . शब्दांच्या कोट्यां करणारे आणि नकलाकार असतात . म्हणूनच बुधाला ग्रहांत बिरबल म्हंटले आहे . अत्यंत हजरजबाबी असतात . उत्तम सवांद शैली असणारे. चिरतरुण व्यक्तिमत्व असणारा आणि हुशार , उत्कृष्ठ स्मरणशक्ती आणि असामान्य शब्द सामर्थ्य . पण किशोरवयीन असल्यामुळे थोडासा अल्लड आणि कधी बालिश सुद्धा . बुध प्रधान व्यक्ती त्यांचे वय चोरतात म्हणजे ५० वर्षाचा माणूस ४५ चा दिसेल. कन्या राशीत बुध उत्तम फलित देतो. बुध आणि सोबत गुरु सुद्धा पत्रिकेत चांगले असतील तर व्यक्तीची शैक्षणिक पात्रता उत्तम असते , उच्च शिक्षण होते . बुध विष्णूचे प्रत्यक असल्यामुळे बुधाचे उपाय म्हणून विष्णूची आराधना , जप , सत्यनारायण व्रत करता येते . बुधाच्या राशी निसर्ग कुंडलीत 3 6 ह्या भावात येतात . 6 व्या भावावरून आपण आपले पोट पाहतो. आपले वितभर पोट आणि पोटाची भूक आपल्याला काम करायला लावते. बुधाकडे हात आणि बाहू आहेत . पाहिलेत ना काम करण्यासाठी आपल्याला तृतीय भावातील हात आणि बहु लागतात . तृतीय भाव पराक्रम आहे. पराक्रमाने , कर्तुत्व गाजवून आपण आपले पोट भरतो आणि काम करण्यासाठी हात लागतात . बुध हा नर्व्हस सिस्टीम दर्शवतो , बुधाकडे पृथ्वीतत्व आहे आणि आपली त्वचा ( पृथ्वीला जसे आवरण असते ). आपल्या त्वचेला एक प्रकारचा सुगंध असतो जसा पहिला पाऊस पडला कि मातीचा सुगंध येतो तसाच . बुधाला चंद्राने बिघडवले तर स्कीन म्हणजे त्वचेचे आजार होवू शकतात . चंद्र बुध मनाचे चांचल्य दर्शवतो. बुधाकडे थोडे नपुंसत्व आहे. म्हणूनच पंचम भावात बुधाच्या राशी किंवा पंचमेश बुधाच्या राशीत असेल तर संतती साठी पत्रिका अभ्यासावी लागते अर्थात त्याचसोबत जीवकारक गुरु सुद्धा. बुधाची मिथुन राशी तृतीय भावात येते जिथे करार मदार , लेखणी आहे , जाहिरात क्षेत्र . बुध दूत आहे म्हणूनच सगळी प्रसार माध्यमे तृतीय भावावरून पहिली जातात . शिवाजी महाराजांच्या काळात दूत खलिता घेवून इथून तिथे जात असत. थोडक्यात इथली बातमी तिथे ( दोन्ही अर्थाने ) हा बुध त्यात प्रवीण आहे. एखादा फालतू बडबड किंवा अर्थहीन बोलत असेल तर त्याचा बुध बिघडलेला आहे आणि एखादा मार्मिक , वैचारिक बैठक असणारा बोलत असेल तर त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते , लिखाण वाचावेसे वाटते . बुध ठीक करण्यासाठी विष्णूची पूजा जप करावा .

राजाच्या राज्याला सेनापती मंगळ ह्याची नितांत गरज आहे . जोश , उत्साह , लढाऊ वृत्ती , आरे ला कारे करण्याची प्रवृत्ती , असामान्य धैर्य आणि शौर्य , नेतृत्व , अग्नीतत्व त्यामुळे भडका उडणे ( अनेकदा स्वभाव ) , शक्तीचे प्रदर्शन त्यामुळे समुद्रात पोहणारे , अग्निशामक दल , अनेक खेळ , पोलीस यंत्रणा , सैन्य दल , सर्जन ह्या क्षेत्रात  काम करणाऱ्या लोकांचा मंगळ नक्कीच महत्वाचा आहे. श्री गणेश , हनुमानाची पूजा  करावी . श्री गणेशाची आणि हनुमानाचे पूजन उपयुक्त होईल. मंगळ स्त्रीच्या पत्रिकेत पतीकारक मानला आहे. मंगळ हा अनेकदा अमंगळ करणारा असू शकतो जर तो राहू शनी ह्या ग्रहणी दुषित असेल तर . सुस्थितीत असलेला मंगळ स्वतःवर ताबा मिळवेल उठसुठ चिडणार नाही. भावनांवर विजय मिळवेल. रक्ताचा कारक असल्यामुळे BP , रक्तदाब , असुरक्षित पणाची भावना मनात येते. मंगळाकडे अजिबात धीर नाही तर तो प्रत्येक गोष्टीत अधीरता दर्शवतो. सेनापती ला इतकेच माहित आहे कि समोर शत्रू आहे आणि त्याचा निपात करायचा आहे. त्यामुळे तो फारसे डोके न चालवता कृती करतो तीही क्षणाचाही विलंब न लावता . असे हायपर पेशंट अनेकदा आपल्यालाच त्रास करून घेतात .रक्ताचा कारक असल्यामुळे राक्तासंबंधी आजार . मंगळाची पत्रिका हा विषय तर अत्यंत चुकीच्या दृष्टीने मांडला जातो. मंगळाच्या मुलामुलीत दोष आहे असे काही नसते , त्यांनी विवाह करू नये असे तर अजिबात नाही. बुधाच्या मिथुन आणि कन्या राशीतील मंगळ तितकासा धाडसी नसतो. शनी मंगल युती हि घातक , त्रासदायक मानलेली आहे .हनुमान चालीसा , गणपती स्तोत्र म्हणावे.  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment