|| श्री स्वामी समर्थ ||
गोष्ट एका स्त्रीची . राहूची दशा चालू आहे. विवाह अद्याप झालेला नाही . वय पुढे गेले असले तरी विवाह करण्याची इच्छा आहे . राहू चतुर्थात सुखस्थानात . पत्रिकेतील ग्रहस्थिती अशी कि व्यक्ती प्रचंड hyper, over aggressive. असो.
कुणाशीही न पटण्याची असंख्य कारणे. राहुमध्ये जेव्हा गुरु ची अंतर्दशा सुरु झाली , गुरु पंचमेश त्यामुळे आता राहुने त्याची खेळी खेळली . ह्या स्त्रीच्या आयुष्यात कुणी व्यक्ती आली जिच्या प्रेमात बाई साहेब इतक्या पडल्या कि वास्तव , समाज कश्याचेही भान राहिले नाही. ह्या व्यक्तीशीच आपला विवाह होणार हे मनोमन जणू त्यांनी गृहीत धरले , नव्हे तसा विचार करायला राहुनेच भाग पाडले. आखिर प्यार प्यार होता है, प्यार किया तो डरना क्या वगैरे युक्तीना धरून प्रणयाचे रंग खुलत गेले. राहुमध्ये गुरुचे अंतर संपताना सगळ्या रंगांचा बेरंग झाला. वास्तव समजले, भानावर आली तेव्हा लक्ष्यात आले कि जसा विचार केला तसे काहीच घडत नाही. ते प्रेम कधीच नव्हते होते ते फक्त आकर्षण , कारण जितक्या वेगाने तो माणूस ह्या स्त्रीच्या आयुष्यात आला तितक्याच वेगाने तो निघूनही गेला. विवाहाचे सुख पत्रिकेत नाही त्यामुळे ह्याधीही अश्या घटना घडल्या आहेत . असो.
राहूची दशा , अंतर्दशा , विदशा काहीही असो राहू आला कि तो ज्या भावात असेल ते भाव active होतात आणि तशी फळे मिळतात .राहू सगळ्या लग्नांना राशिना वाईट च फळे देणार तो कुणाचाही मित्र नाही . राहुने एखाद्या ग्रहासोबत युती केली कि त्यातील गुणांना शोषून त्याला आपल्यासारखे वागायला लावणारा हा तामसी ग्रह आहे . जितका चांगला तितका वाईट . अध्यात्मिक दृष्टीने , संशोधन ह्या साठी उत्तम पण फसवणूक , धोका , षडयंत्र ह्यात राहूचा हातखंडा आहे. म्हणूनच , राहूच्या दशेत प्रत्येक गोष्ट , कागदपत्रे आणि माणसे सुद्धा तपासून घ्यावीत . घाईघाईत कुठेही सही करू नये , कुणाला जामीन राहू नये , कुणावरही काडीचाही विश्वास ठेवू नये , स्वतः डोळसपणे प्रत्येक गोष्टीची खात्री करून पुढे जावे. शेअर मार्केट साधे सोपे नाही , तिथेही चढ उतार आहेत . शेअर मार्केट मध्ये कमी काळात अधिक धन मिळवण्याची हाव धरून आपण सगळेच घालवून बसणार नाही ना हेही पाहावे. जपून पावले टाकावीत . राहूच्या दशेत निव्वळ गैरसमजामुळे अनेक नाती , मैत्रीचे संबंध तुटतात . राहू निव्वळ भास आहे, मोठ मोठी वलये आपल्या भोवती निर्माण करणारा , आकर्षणे गुंतवून ठेवतात.
आज ह्या स्त्री ला राहुने प्रेमाच्या विळख्यात अडकवले आणि तिने तिचे सर्वस्व घालवले. शेवटी हाती आला मनस्ताप . अनेकदा समजत असूनही व्यक्ती आंधळी होते आणि संकटे ओढवून घेते. विचाराची दिशाभूल करणारा , मती गुंग करणारा राहू आहे , तो आपल्याला विचार करायला संधी , वेळ देत नाही , घटना इतक्या वेगाने घडतात कि आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही नव्हे त्यावेळी आपल्याला तो करायचाच नसतो आणि आपण त्याच्या विळख्यात किती आणि कसे गुरफटत जातो ते आपले आपल्यालाही समजत नाही . आपण त्यातून बाहेर पडतो तेव्हा असंख्य गोष्टी ओंजळीतून निघून गेलेल्या असतात . राहू आपल्याला पूर्व जन्माचे भोग भोगायला लावतो , कधीतरी मागच्या कुठल्या तरी जन्मात आपण कुणाचे तरी नुकसान कलेले आहे मग ते आर्थिक , असो अथवा मानसिक त्रास दिलेला असो , ती व्यक्ती ह्या जन्मात कुठल्या तरी रुपात येवून आपल्यावर सूड उगवणारच , आपल्याला देणे द्यावेच लागणार . हिशोब चुकता .
कलियुगातील राहू हा महत्वाचा ग्रह आहे, संपूर्ण इंटरनेट युग राहूचे आहे पण ह्या सगळ्या चमकत्या दुनियेत आपण कुठे फसलो जात नाही ना? ह्याचा विचार केला पाहिजे , सतर्क राहिले पाहिजे . चमकत्या ग्यामर चे आकर्षण सगळ्यांना असते , पैसा प्रसिद्धीची हाव असते पण त्यासाठी आपण काय पणाला लावत आहोत हे समजत नाही व्यक्तीला .फक्त ती गोष्ट मिळवायची मग काहीही होवूदे इतकेच समजत असते . तुमची साधना उत्तम असेल तर तुमचे सद्गुरू तुम्हाला ह्यातून वाचवतील , बाहेर काढतील . वर उल्लेख केलेली स्त्री माझ्याकडे त्याच वेळी आली होती जेव्हा त्या माणसाशी ओळख झाली होती. मी तिला सतर्क केले होते पण राहूच्या प्रेमळ विळख्या पुढे आपल्या पामराला कोण विचारतो . राहूच्या दशेत एखादी गोष्ट झाली तर ती पूर्णत्वाला जाण्याची शक्यता कमी असते , ह्या मध्ये असेच झाले तो आला आणि निघून गेला मागे आंधळ्या प्रेमाच्या राहिल्या फक्त आठवणी त्याही मानसिक त्रास देणाऱ्या .
उपाय : हनुमान चालीसा हा रामबाण उपाय राहूवर आहे.
११ दिवस रोज ११ वेळा हनुमान चालीसा म्हणा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला कि . काय आणि कसा फरक पडला , कसा मार्ग मिळाला , कशी कामे होत आहेत ते नक्की कळवा. भोग आपले आहेत तेव्हा आपल्यालाच हातपाय हलवायला लागणार आहेत . youtube वर लावून नाही ऐकायची हनुमान चालीसा, स्वतः म्हणायची आहे. वेळ नाही ? मग भोगा . जो भोगत आहे आणि ज्याला ह्यातून सुटायचे आहे तो वेळ नाही असे म्हणण्याचे धाडस नक्कीच करणार नाही .
करा करा... केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
आज राहुचेच नक्षत्र आहे म्हणून हा लेखन प्रपंच .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment