Saturday, 16 August 2025

तळमळ फक्त एक घोट पाण्याची....

 || श्री स्वामी समर्थ ||


एक विधवा निराधार स्त्री एका गावात राहत होती आणि रोज ती दिवसभर पोटासाठी काम करत असे जेणेकरून तिला एक भाकरी तरी मिळत असे . तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती . महाराजांना रोज सोने चांदी अनेकविध मिठाया अनेक उंची वस्तू भेट करणारे आणि नेवेद्य ठेवणारे खूप लोक गावात रोज मठात जावून महाराजांना अर्पण करत असत. पण हि स्त्री एका लोट्यात पाणी भरून महाराजांच्या चरणाशी ठेवत असे आणि मनोमन प्रार्थना करत असे कि तुम्हाला द्यायला माझ्याकडे दुसरे काहीच नाही आणि श्रद्धेने नतमस्तक होत असे.

एकदा एक धनिक जोडपे मठात आले आणि महाराजांना अनेक विध पक्वान्ने , फळे वगैरे ठेवत असताना त्या श्रीमंत स्त्रीने ह्या गरीब विधवा स्त्रीकडे पाहिले आणि म्हणाली हे काय स्वामिना ह्या लोट्यांतील पाण्याची गरज नाही . गरीब स्त्री हिरमुसली झाली आणि मनोमन विचार करू लागली कि ह्या अनेकविध उंची नेवैद्य , वस्त्रे ह्यापुढे हे पाणी ..खरच कि. म्हणून ती घरी गेली आणि दुसर्या दिवशी पुन्हा दर्शनाला आली पण काहीही न घेता . महाराज आले आणि म्हणाले हे काय मला तहान लागली आहे पाणी कुठे आहे. मनोमन काय ते ती समजली आणि लोटाभर पाणी आणले. महाराज पाणी प्यायले आणि संतुष्ट होवून तिला आशीर्वाद दिला.

त्यावेळी तिच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या त्या तुम्हा आम्हा सर्वांच्याच डोळ्यात नेहमी येतात इतके आपले महाराजांच्यावर अतोनात प्रेम आहे. तिने आणलेल्या पाण्यात तिचा श्रद्धा भाव होता हे महाराज जाणत नसतील का? अखंड विश्वाची निर्मिती केलेल्या परमेश्वराचे चित्त तुमच्या मोदक आणि पुरणपोळी वर असेल का? त्याला तुमचा निर्मळ खरा भाव हवा आहे .

त्यांच्यासमोर आपल्या अहंकाराची धूळधाण होते , महाराज अहंकारीत व्यक्तीकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीत. तुमची खरी तळमळ असेल तर त्यांचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Friday, 15 August 2025

लग्नातील “ Harmony “ टिकवणारा “ शुक्र “

 || श्री स्वामी समर्थ ||

काही दिवसापूर्वी मला एका जातकाचा फोन आला. म्हणाल्या विवाहित जोडपे आहे पण अजून मुलबाळ नाही कारण काय तर अजून दोघे एकत्रच आलेले नाहीत . अश्या गोष्टी अनेकदा ह्याही पुर्वी ऐकल्या आहेत . विवाह हा एकमेकांच्या पसंतीने झालेला असतानाही अशी वेळ का यावी .

वैवाहिक सुख आणि भिन्नलिंगी आकर्षण दर्शवणारा ग्रह म्हणजे “ शुक्र “ सर्वप्रथम नजरेसमोर येतो. विवाहाची पहिली वीट रचणारा शुक्रच असतो. मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी प्रथम हळूच पाहते आणि मनोमन एकमेकांना वरतात , लाजून हसतात वगैरे , तर हि कळी खुलवणारा शुक्रच असतो .

दोघांच्याही पत्रिका गुण मिलन केल्यावर ग्रह मिलन करताना प्रामुख्याने शुक्र तपासावा लागतो . दोघांच्या मध्ये असणारे प्रेम खुलते ते आकर्षणं असेल तरच . शारीरिक आकर्षण नसेल तर पुढे त्या विवाहाची परिणीती काय होणार त्याचा अंदाज बांधू शकतो . हे आकर्षण क्षणिक नसले पाहिजे म्हणजेच निव्वळ शारीरिक ओढ नसावी तर प्रेमाचे धागे विणले जाणारे प्रेम हवे तरच विवाह दीर्घकाळ टिकेल .

दोघांच्याही आचार विचारातील साधर्म्य सुद्धा महत्वाचे आहे . जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन , प्रवासाच्या कल्पना त्याची नेमकी स्थळे , संसारातील गोडवा माधुर्य , खाण्यापिण्याच्या चोखंदळ आवडी , गुंतवणुकीचे विचार , एकमेकांचे छंद आणि त्यासाठीचे अपेक्षित सहकार्य , एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे फक्त शारीरिक संबंध नाही तर एकमेकांचे होऊन जगणे , मन जपणे . एकमेकांच्या विचारात अति भिन्नता असेल तरीही संसार पुढे जाताना त्रासदायक होतो. संसार आनंदाने झाला पाहिजे , मनापासून केला पाहिजे तो लादला गेला नसावा.

लग्नातील “ Harmony “ टिकवायची असेल तर शुक्र ह्या ग्रहाची संमती असलीच पाहिजे. दोघांच्याही पत्रिकेतील शुक्र एकमेकांना पूरक असला पाहिजे . दोघांच्याही पत्रिकेत शुक्र एकाच ठिकाणी असेल तर चांगलेच. शुक्र प्रतियोगात नको . मुलाच्या कुंडलीत जिथे शुक्र आहे तिथे मुलीचा रवी नसावा . जिथे मुलाचा शुक्र आहे तिथे मुलीचा चंद्र असेल तर काही कालावधीनंतर मानसिक संघर्ष सुरु होतो आणि वैवाहिक जीवन भावनात्मक दृष्टीने डगमगू लागते . मुलाचा शुक्र आहे तिथे मुलीचा मंगळ असेल तर प्रेम आकर्षण ओढ अधिक असते. शुक्र असेल तिथे पत्नीचा बुध नसावा नाहीतर नाते टिकताना दिसत नाही . शुक्र असेल तिथे स्त्रीचा गुरु असेल तर एकमेकांच्यात बौद्धिक वाद होतील पण नाते टिकेल . शनी असेल तर मात्र विवाह खूप वर्ष टिकतो कारण शनी हा परिपक्व ग्रह आहे. Matured planet आहे. एकमेकांना समजुतीने घेतील. राहू असेल तरी विवाह टिकेल पण केतू असेल तर अजिबात सौख्य मिळणार नाही . केतू शुक्राला शुष्क करेल .

ह्या व्यतिरिक्त मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत शुक्र हा ग्रह शनी राहू केतू हर्शल नेप ह्या ग्रहांनी दुषित झाला असेल तर वैवाहिक सुखाचे बारा वाजू शकतात . शेवटी आयुष्यातील आनंदाचा स्त्रोत म्हणजे शुक्र आणि जिथे त्यालाच ग्रहण लागते तिथे सुखाची होळी झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच अत्यंत लक्षपूर्वक पत्रिका मिलन करावे लागते .

विवाह एकदाच होत असतो. विवाह हा फक्त त्या दोघांचे नाही तर एकंदरीत कुटुंबातील आनंद , सौख्य वृद्धींगत करणारा आणि दोन मने , कुटुंबे जोडणारा असल्यामुळे तो घाई घाई करून उरकून टाकू नये म्हणजे पुढील विघ्ने टळतील . सहमत ?????????

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 13 August 2025

पैसा हीच माणसाची खरी ओळख

 || श्री स्वामी समर्थ ||


माणूस काम करत नाही तर त्याचे पोट त्याला काम करायला लावते . वितभर पोटाला भूक लागली कि काहीच सुचत नाही . नैतिक अनैतिक , चांगले वाईट हे सर्व पोट भरल्यावर करायच्या गप्पा आहेत . पण पोटाची भूक माणसाला काहीही करायला भाग पाडते हे आयुष्यातील संवेदनाशील चित्र आहे. माणसाच्या मनात नसतानाही माणूस चोरी करतो , चुकीच्या मार्गाने धन कमावतो ते सर्व काही ह्या दोन घासासाठी ..

पोटात प्रज्वलित झालेला भुकेचा यज्ञ आणि त्याला दोन घास अन्नाची आहुती देण्यासाठी म्हणजेच अन्नधान्य पर्यायाने पैसा मिळवण्यासाठी मनुष्य अविरत कष्ट करतो . जन्मल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्या दोन घासाची तजवीज करण्यासाठीच उभा जन्म वेचतो . पैशाचे मोल पैसा नसतो तेव्हा खर्या अर्थाने समजते .

आज आपण आपल्या पत्रिकेत असलेल्या “ धन योगा “ संबंधी जाणून घेवूया चर्चा करुया . आपण कुटुंबात जन्म घेतो ते निर्धन किंवा सधन असते जे सर्वस्वी आपल्या प्रारब्धावर अवलंबून असते . आपल्या कर्मांचा आरसा म्हणजेच आपला हा जन्म . देवाने विचारले असते तुला कुठल्या कुटुंबात जन्म हवा तर सगळ्यांनीच अमिताभ बच्चन किंवा अंबानीच्या घराकडे बोट दाखवले असते . असो

पत्रिकेतील द्वितीय भाव आपले कुटुंब आणि कौटुंबिक धन संपत्ती , आर्थिक सुबत्ता दर्शवते. आपले शिक्षण झाल्यावर नोकरी व्यवसाय करून आपणही धन अर्जित करायला लागतो . कष्ट सगळेच करतात पण त्याचा मोबदला वेगवेगळा असतो . त्यासाठी पत्रिकेतील ग्रहयोग आणि पूरक दशाही कारण ठरतात .

पैसा कोण मिळवणार आपण स्वतः म्हणून लग्न भाव , लग्नेश मुळात चांगले हवेत . लग्नातील राहू माणसाला बर्याच अंशी महत्वाकांक्षी करतो. पैसा हा राज मार्गाने मिळाला तर टिकतो आणि फळतो . कुठल्याही कृतीमागे विचार असतो आणि तो करण्यासाठी लागते ती बुद्धी . ती स्थिर असावी ह्यासाठी बुध महत्वाचा , मनाचा कारक चंद्र आणि ऐश्वर्य देणारा सर्व सुखांचा कारक शुक्र हे महत्वाचे ग्रह आहेत . गुरूला विसरून कसे चालेल .

नोकरी कि व्यवसाय ? शेवटी अर्थार्जन महत्वाचे . नोकरी अर्थार्जनात स्थिरता देयील पण व्यवसायात नफा तोटा होणार आणि तो पेलवायची मानसिक कुवत लागते . तसेच कुठला व्यवसाय करावा हेही समजले पाहिजे .

पत्रिकेतील अर्थ त्रिकोण हा २ ६ १० ह्या भावांनी तयार होतो. धन भाव पैसा . ६ वा भाव रोजच्या जीवनात मिळवलेला पैसा आणि १० वा म्हणजे दशम भाव हा नोकरी धंद्यातून पैसा कसा मिळवणार ह्याबद्दल सांगतो . पंचम भाव हा कमी कमी कष्टातील धन जसे शेअर मार्केट सट्टा जुगार , अष्टम स्त्रीधन , वारसा ह्यातून संपत्ती दर्शवतो.

धनेश तृतीयात असेल तर प्रवासातून , लिखाणातून , भावंडांच्या कडून पैसा मिळतो . रवी चंद्र , गुरु रवी , चंद्र गुरु हे योग संपत्ती साठी चांगले असतात . अर्थ त्रिकोणाशी ह्याचा संबंध असेल तर उत्तम धनप्राप्ती होते तसेच हे ग्रह पृथ्वी तत्वाच्या राशीत असतील तर धनाचा संचय होतो . धनेश व्यय भावात किंवा त्रिक भावात असेल तर पैसा टिकणार नाही . धन भावात राहू असेल तर वाम मार्गाने धन अर्चित होते . चंद्र शनी योगावर पैसा टिकतो , हे लोक कमी खर्च करणारे असतात . हा योग अशुभ असेल तर मात्र दारिद्र येते .

गुरु शुक्र लौकिक दृष्टीने पैसा नातेवाईक मित्र , लोकप्रियता मिळवून धन देतील. रवी मंगळ स्वतःच्या कर्तबगारीने , कष्टाने , पैसा मिळवतील. अष्टम भावाशी गुरु चंद्राचा योग आला तर वारसा हक्कानेही संपत्ती मिळते . मंगळावर शनीची दृष्टी धन मिळवण्यास अनंत अडथळे आणते . शनिवर हर्शल ची दृष्टी असेल तर आर्थिक नुकसान विशेषतः शेअर मार्केट मध्ये होते . शनी रिअल इस्टेट मधून तसेच काबाड कष्ट करून पैसा मिळवतो.

शुक्र चंद्राचे शुभ स्थानातील योग अर्थार्जनाला पूरक असतात . शुक्राची मंगळावर अशुभ दृष्टी किंवा मंगळाची शुक्रवार तसेच शुक्र दुषित असेल तर व्यसनांवर पैसा खर्च होतो. अश्या वेळी व्यक्ती उतावळा , पैशाच्या बाबत निष्काळजी होईल.

बुधाकडे संवाद आणि आकलन आहे. लेखन , जाहिरात क्षेत्र , छपाई , भाषणे , प्रवास , कमिशन ची कामे , सरकारी व्याज रोखे ह्यातून जर बुध चांगला असेल तर पैसा मिळेल.

शुक्र शनीचा अशुभ योग पैसा घालवेल . असे अनेकविध ग्रहयोग पैसा मिळवून देणारे आणि पैशाचा ओघ खंडित करणारे सुद्धा आहेत . मुळात धनेश दुषित नसावा . धनेश लाभेश हे स्थिर राशीत असावेत . लग्नेश आणि चंद्र मजबूत हवाच .

पोटाला भूक लागली कि माणूस काम करायला अर्थार्जनासाठी घराबाहेर पडतो आणि धन प्राप्त होते . मिळवलेल्या धनाचा उत्तम विनियोग करणे हे माणसाच्या हाती नक्कीच आहे. आज कुणी एकदा जेवायला घालेल पण कुणी ५ रुपये हातावर ठेवणार नाही . पैसा हे विष आहे शेवटी . संबंध बिघडू शकतात म्हणून शक्यतो नातेसंबंधात पैशाचे व्यवहार नकोत केलेत तर स्वछ्य असावेत तोंडी तर कधीच नको, कागदोपत्री व्यवहार असावेत .

आज व्यक्तीची ओळख हि आर्थिक स्थर काय आहे त्यावरूनच होते . कुठल्या गाडीतून व्यक्ती उतरते आहे , कुठले अत्तर लावले आहे, पेहराव वेशभूषा , परिधान केलेले दागिने ह्यावरून व्यक्तिमत्वाचा निकष लावला जातो . पैसा म्हणजे सबकुछ असणार्या ह्या जगात पत्रिकेत पैशाचा ओघ नसेल तर व्यक्तीला अनेक मानापमान आणि समस्यांना तोंड द्यावे लागते .

आपल्या कुलस्वामिनीची नित्य उपासना , श्री सुक्त पठण , महालक्ष्मी अष्टक हे लाभ करून देयील. आपल्या सद्गुरूंची उपासना जगायला बळ देते . अन्न दान, जल दान सर्वश्रेष्ठ आहे ते करत राहणे .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Friday, 8 August 2025

कश्याला कुणाची भीती ??

 || श्री स्वामी समर्थ ||


यमुना नदीत असलेला विषारी नाग “ कालिया “ ह्याच्या विषामुळे नदी चे पाणी आणि आजूबाजूचा परिसर तर दुषित होत होताच पण गुरेढोरे , वनस्पती सुद्धा मरत होती. कृष्णा ने कालियाच्या फण्या वर मर्दन करून त्याचा पराभव केला आणि त्याला नदी सोडून सागरात वास्तव्य कर असे सांगितले . तेव्हा कालियाने कृष्णाला सांगितले कि मी समुद्रात जायीपर्यंत गरुड मला बरोबर हेरेल आणि त्याची मला भीती वाटते म्हणून मी ह्या डोहात आश्रय घेतला होता.

त्यावर कृष्णाने त्याला सांगितले कि मी तुझ्या फण्यावर मर्दन करताना माझ्या पायांचे ठसे तुझ्या डोक्यावर उमटले आहेत त्यामुळे गरुड च काय कुणी तुला त्रास देवू शकत नाही . येतंय का काही लक्ष्यात ???

अगदी अश्याच प्रकारे भक्ताला जेव्हा त्याच्या साधनेमुळे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त लाभतो तेव्हा आयुष्य वेगळ्याच अध्यात्मिक उंचीवर जाते . मग कश्याचीच भीती वाटत नाही आणि आसक्तीही , मोह सुद्धा वाटेनासा होतो. नामस्मरणाची मजा आयुष्यभर चाखत आणि त्याचा निर्भेळ आनंद घेत भक्त परिपूर्ण जीवन जगतो .

आयुष्यभर सगळे काही गोळा करत राहायचे ते कश्यासाठी ? ह्याची निंदा , त्याची नालस्ती , हेवेदावे , मत्सर हे करूनही काय मिळणार ? बाकी शून्य त्यामुळे ह्या सर्वाची उपरती होणे हि एका नामाची जादू आहे बर का . ती अनुभवण्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतील. आपल्या मनाला बजावत मनाला छडी मारत मारत नाम घ्यायचेच हा निश्चय करायचा . सीरिअल बघायला कसे बसतो तासंतास अगदी तसेच नामस्मरणात आपला जीव ओतला तर आहे तेच आयुष्य अमृतासारखे होयील ह्यात शंकाच नाही.

सतत भाती , भयगंड वाटतो ते अनेक उपाय करतात जसे कुठल्या कुठल्या शांती वगैरे आणि हजारो रुपये घालवतात पण नामस्मरण मात्र करत नाहीत . अहो नाम फुकट आहे पण ते सुद्धा घ्यायचा कंटाळा आहे किंवा त्यावर विश्वासच नाही. नामस्मरण करायला ५ मिनिटे आपण एका जागी बसू शकत नाही म्हणजे किती मन चंचल आहे बघा आपले. आणि ह्या चंचल मनामुळेच आपले आयुष्य देखील सैरभैर आहे .

वादळात असलेल्या नौके सारखे कुठेतरी भरकटत राहतो आपण आणि एकदिवस आपली इहलोकीची यात्रा संपते , पण वजाबाकी शून्य काय मिळवले आपण ह्या जन्मात काहीही नाही . भीतीने ग्रासते ते मन आणि पैसा खर्च करून मन शांत होत नाही तर त्याचा लगाम नामस्मरण हाच आहे . पण आपला विश्वासच नाही देवावर . नुसते महाराज महाराज करायचे अनेक यात्रा करायच्या पण आम्ही अजूनही नर्मदेचे गोटेच. महाराज आणि मी एकच आहोत. माझ्या आजूबाजूला महाराज खडा पहारा ठेवून आहेत कोण काय करणार मला इतका विश्वास असायला हवा प्रत्येक भक्ताला मनोमनी. पण नाही . जप करतो पण त्यात जीव ओतला तर त्यांच्याशी एकरूप होवू .

महाराजांचा वरदहस्त ज्याला लाभला त्याने कश्याचीही भीती बाळगायची गरज नाही . आम्हाला सोपे सोपे सगळे हवे , रत्न घाला , महाराजांना नारळाची तोरणे बांधा सगळे करा पण नाम ते घ्यायचे राहूनच जाते , तिथे लक्ष्यच नाही आहे आपले .

आजच सकाळी एका मुलीची पत्रिका पाहिली . दुसरा विवाहाचा प्रश्न होता . सध्या माहेरी राहते आहे , स्वतःचेही घर आहे . असो पण घरात राहायला एकटेपणाची भीती वाटते. साहजिक आहे , तसे वय फार नाही. मी तिला समजावले आणि म्हंटले दुसर्या विवाहाचीही गत पहिल्यासारखी होणार म्हणून आहे ते आयुष्य ठीक आहे , ह्या भानगडीत नाही पडलीस तर अधिक सुखी राहशील. पत्रिकेत विवाहाचे योगच नाहीत . असो आता राहिला प्रश्न भीतीचा . भीती वाटते म्हणून आपण जगायचे सोडून देतो का ? देणार का ? तर नाही ..वाटेल भीती पण जर महाराज प्रत्यक्ष आपल्या घरात आहेत आपल्या सोबत असा विचार जरी केला तर सगळी भीती क्षणात पळून जायील . तिलाही तेच सांगितले नामस्मरण हि एक जादू आहे , ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी कधीच प्रत्यक्षात घडत नाहीत .

आज दुपारपर्यंत चंद्राचेच नक्षत्र आहे . आज श्रावणी शनिवार आणि पौर्णिमा , उत्तम योग . चंद्र म्हणजेच मन . आज दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा आणि नामस्मरणाला सुरवात करा . महाराजांचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही हा संपूर्ण विश्वास ठेवून नाम घ्या .

रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेछ्या .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 7 August 2025

राजाची शेळी

 || श्री स्वामी समर्थ ||

एका राजाने राजदरबारात घोषणा केली कि कुणीही विद्वानाने माझ्या लाडक्या शेळीला रानात दिवसभर पोटभर चारावयाचे आणि संध्याकाळी परत आणायचे . आणल्यावर मी स्वतः तिला चारा देईन. जर तिने चारा खाल्ला तर तिचे पोट भरलेले नाही असे समजून त्या विद्वानाला मी देहदंड देयीन .आता ह्या साठी कुणीच पुढे यायला तयार नाही , आपला जीव कोण धोक्यात घालेल नाही का .

एक माणूस पुढे आला आणि म्हणाला मी प्रयत्न करतो त्याने शेळीला दिवसभर रानात खूप फिरवले आणि खा खा चारा खायला दिला . संध्याकाळी दरबारात आल्यावर राजाने विचारले पोट भरले आहे कि हिचे त्याने मान डोलावली. तेव्हा राजाने पुन्हा तिला चारा खायला घातला. शेळीने चारा खाल्ल्यावर राजा म्हणाला पोट भरले असेल तर ती कश्याला खाईल . असे म्हंटल्यावर आपली आता धडगत नाही म्हणून तो माणूस खूप घाबरून गेला. बघा शेळी हे असे जनावर आहे कितीही पोट भरले तरी चारा दिसल्यावर ती त्याला तोंड लावणारच . असो .

दिसरया दिवशी अजून एक व्यक्ती पुढे आला आणि त्याने शेळीला रानात नेले . जाताना त्याने आपल्या हातात एक दंडुका घेतला . शेळीने चार्याला तोंड लावले कि हा तिच्या तोंडावर तो दंडुका मारत असे. असे दिवसभर त्याने केले. अश्यामुळे शेळी उपाशीच राहिली आणि दिवसभर त्या दंडुक्याचा प्रसाद खात राहिली. संध्याकाळी राजासमोर तिला आणल्यावर त्याने तिला पोटभर चारा खायला घातला का असे विचारले आणि पुन्हा तिच्या तोंडाशी चारा नेला . शेजारी हा दंडुका ठोकत उभा. काय बिचार्या त्या शेळीची हिम्मत तो चारा खायची .

झाले देह्दंड बाजूला राहिला राजाच्या बक्षिसाचा तो मानकरी ठरला.

ह्यावरून आपण काय बोध घ्यायचा तो घ्यायचा .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

इटुकला पिटुकला -बुध होणार मार्गी.....हुश्श...

 || श्री स्वामी समर्थ ||


परमेश्वराने मानवाला जे सर्वात मोठे वरदान दिले आहे ते म्हणजे “ बुद्धी “ आणि त्यावर अंमल आहे तो बुधाचा . आता दिलेल्या बुद्धीचा वापर कसा करायचा ते मात्र प्रत्येकाच्या हातात आहे. काही लोक ती समाजहितासाठी , आपले आयुष्य पुढे नेण्यासाठी , सन्मार्गाने जगण्यासाठी , ज्ञानप्राप्तीसाठी , राजमार्गाने अर्थार्जन करण्यासाठी वापरतात तर काही कुटील मार्गाने आपल्या बुद्धीचा वापर नाही तर ह्रास करून घेतात .

बुध हा इटुकला पिटुकला जरी असला तरी त्याची किमया अफाट आहे , भल्याभल्यांना तोंडघशी पाडणारा हा बुध गेले काही दिवस “ वक्री “ अवस्थेत होता . पृथ्वीच्या गतीपेक्षा त्याची गती कमी झाल्यामुळे तो मागे जात आहे अशी भासमान स्थिती दिसत होती . बुधाकडे बुद्धी , लेखणी , आकलनशक्ती , मज्जासंस्था ,शिक्षण , प्रवास आणि सर्वात मुख्य म्हणजे संवाद असल्यामुळे हा ग्रह वक्री होवून त्याने आपल्या सगळ्यांचेच “ वांदे “ केले होते . पण आता ११ ऑगस्ट ला बुध कर्क राशीतच मार्गी अवस्थेत येणार असल्यामुळे आपल्याला अगदी “ हुश्श “ होणार आहे. बुध मार्गी झाल्यामुळे आपल्याला अनेक अडलेल्या कामातून दिलासा आणि मार्ग मिळणार आहे.

बुध वक्री असताना संवादात गोंधळ. आपण जे म्हणतो त्याचा समोरचा भलताच अर्थ काढतो आणि संवादाचे १२ वाजतात . गैरसमज , चुकीची कागदपत्रे , अनेक चुका झाल्यामुळे हवे ते काम वेळेत न होणे, पेपर वर्क अडकणे , बोलण्याचा गैरअर्थ , इमेल ह्यात गोंधळ. प्रवास वेळेत न झाल्यामुळे मिटिंग उशिरा किंवा रद्द मग त्यावरून होणारी डोकेदुखी , ह्याला समजावू कि त्याला अशी भ्रामक अवस्था . सर्व व्यवहार कमी अधिक गतीने होणे. बुध वक्री असताना महत्वाचे निर्णय , प्रवास नेहमी टाळावेत . बुध म्हणजे बातम्या , जाहिरात , मिडिया त्यामुळे नवीन उत्पादांचे अनावरण बुध वक्री असताना करू नये.

आजकालचे इंटरनेट चे युग त्यात ह्याची मेल त्याला जाणे , डेटा लॉस , files corrupt होणे ह्या सारख्या असंख्य गोष्टीना आपण गेले काही दिवस तोंड देत आहोत . बुध मार्गी झाल्यावर ज्यांचे interview झालेले आहेत पण offer आलेली नाही त्यांना ती येणार , वाट पाहत असलेले इमेल , मेसेज येणार . अर्थात तश्या दशाही पूरक असाव्यात . त्यामुळे आता आपण सुटकेचा श्वास सोडून मोकळा श्वास घेत कामाचा “ पुनश्च हरिओम “ करायला हरकत नाही .

इथे काही शाश्वत नाही आज एक तर उद्या दुसरे असे बदल निसर्गात सुद्धा होतात तर आपले जीवन ते काय . कधी एखादा भरमसाट मेसेज करून आपल्याला विचार करायला भाग पाडेल तर कधीमहिने मेसेजच येणार नाहीत . चलता है. Take it Easy. आहे हे असे आहे . बुधाला राजकुमार म्हणून संबोधले आहे तेव्हा त्याचे नखरे हे असणारच .

त्यात भरीस भर म्हणून कि काय “ शनी “ सुद्धा वक्री आहे . सध्या आपण संयम घालवून बसलो आहोत . हो हो आपण सगळेच आणि कदाचित त्याचीच किंमत चुकवण्यासाठी आणि आपले आयुष्य शिस्तबद्ध करण्यासाठी ग्रह वक्री होत असावेत .

चला तर मग कामाला लागुया , झालेले गैरसमज , कामातील चुका निस्तरुया , बिघडले आहे तिथे काही वेगळे घडेल ह्यासाठी प्रयत्न करुया , शेवटी सगळे आपलेच आहेत राव , अगदी ग्रह सुद्धा . सहमत ?????

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

Tuesday, 5 August 2025

रूढी परंपरांच्या पल्याड लिव्ह इन ( ज्योतिषीय दृष्टीकोण )

 || श्री स्वामी समर्थ ||

पूर्वीच्या काळी प्रचलित नसणाऱ्या किंवा ऐकिवात सुद्धा नसलेल्या अनेक गोष्टीपैकी एक म्हणजे “ लिव्ह इन रिलेशनशिप “ हा नवा अध्याय आपल्या संस्कृतीत जोमाने फोफावत आहे. आम्ही अमुक अमुक वर्ष लिव्ह इन मध्ये होतो हे सर्रास ऐकायला मिळते . पण आपल्या परंपरा , संस्कृती ह्या गोष्टीना तग धरून देतील का हा प्रश्न आहे. 

मुळात हे विचार मनात यायला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे “ कसलीही जबाबदारी नको “. आरामात राहायचे एकत्र  तेही आपल्या इच्छा पूर्तीसाठी पण त्यातून कधीही सटकता येयील असे हे आपले सोय पाहणारे गोड बंधन .

विवाह हि एक जबाबदारी आहे. आपली वंशवेल वाढवणे हा प्रमुख उद्देशाने विवाहसंस्था जन्माला आली . ती नसती तर समाजात अराजकता माजली असती . प्रेम हि एक भावना आहे आणि ती सहवासातून फुलत जाते . एकमेकांसाठी जगणे आणि एकमेकांचे होऊन जगणे ह्यात खरी गम्मत आहे आणि मग आयुष्याचा आनंद , प्रवास सुखकर होतो .

जेव्हा व्यक्ती वैचारिक , आर्थिक , मानसिक , सामाजिक आणि लैंगिक दृष्टीनेही सक्षम होते तेव्हाच पालकांनी त्याचा विवाह करावा . विवाह म्हणजे एक जबाबदारी आहे तीही संपूर्ण आयुष्यभराची . ज्यांना ती पेलवत नाही किंवा पेलावण्याची ताकदच नसते नुसतेच आपले बेफिकीरीने जगायचे ते हा कन्सेप्ट आनंदानी स्वीकारतील. मुळातच ह्यामागे जबाबदारी टाळणे हा हेतू स्पष्ट आहे. आयुष्यभराची साथ आयुष्य समृद्ध करते हे न समजणे हे दुर्दैवच म्हंटले पाहिजे.


पाश्चिमात्य लोक आपल्या चांगल्या गोष्टींचे समर्थन करतात . कर्ज काढून भारतात आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला येतात ती संस्कृती आज आपल्यालाच  नकोशी झाली आहे त्यातील उदात्त विचारांची बैठक नकोशी झालेली आहे हे आजचे चित्र आहे पण समाजाच्या भविष्यासाठी हे निश्चित पोषक नाही. हि खरी शोकांतिका आहे . 


स्वैराचाराला बंधन म्हणूनच विवाह संस्था आहे. पण आजच्या कलियुगात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. जगायचे तेही फक्त स्वतःपुरते . मुले होणे संसार होणे ह्यात किती प्रेम आहे , मुलांना मोठे होताना पाहणे ह्यात स्वर्गसुख आहे आणि म्हणूनच कुटुंब व्यवस्था जन्माला घातली आहे परमेश्वराने . पण त्याला बगल देवून आपल्याला सर्व सुखे हवी पण जबाबदारी नको म्हणून हि असली थेर आता माणसाला सुचत आहेत . मुक्त विचारसरणी घाला चुलीत , त्याच्या नावावर मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि आधुनिक विचारांचे आम्ही कसे भोक्ते आहोत हे मिरवायचे जे बिन बुडाचे आहे आणि अशोभनीय आहे . भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट आहेत आणि त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला असलाच पाहिजे. भारतीयांच्या मनातील देवांचे , परंपरांचे अधिष्ठान उखडून टाकणे सहज सोपे नाही. आपले वेद , पुराण संस्कृती ह्यावर आपली नितांत  श्रद्धा आहे.

आपली एखादी पिढी ह्या पाश्चिमात्य नको त्या गोष्टींचे अनुकरण करू पाहत आहे कारण कसली बंधने नको मुक्त जगायचे आहे. पण हा पायंडा पडू शकणार नाही इतकी आपली संस्कृतीची पाळेमुळे भक्कम आहेत . ह्या कडे वळण्याचा मानसिक कल एखाद्या जातकाचा कसा होतो ह्याचा थोडा अभ्यास करुया .


सर्व सुखाचा आणि विवाहाची परिभाषा शिकवणारा ग्रह शुक्र जेव्हा हर्शल राहू केतू नेप ह्यांनी दुषित होतो आणि त्याच सोबत चंद्र तेव्हा ह्या विचाराना खतपाणी घालतो  . मुळातच हर्शल हा रूढी झुगारून देणारा ग्रह आहे . प्रामुख्याने पत्रिकेतील काम त्रिकोण महत्वाचा आहे , सप्तम जे आपला जोडीदार आणि तृतीय हे सप्तम भावाचे म्हणजे विवाहाचे भाग्य दर्शवते . विवाहातून होणारे अनेकविध लाभ हे लाभ भावातून प्रत्ययास येतात . जगावेगळ्या ह्या गोष्टींसाठी सर्वप्रथम स्वतःचे मन आणि बुद्धी ने सहमती दिली पाहिजे म्हणजे जातक स्वतः जेव्हा ह्या विचारांनी प्रेरित होतो म्हणजे लग्न भाव महत्वाचा आहे. पंचम जिथे प्रणय फुलतो आणि अष्टम जिथे खरा शारीरिक संबंध येतो , आता ह्यात आपला धर्म काय सांगतो म्हणून नवम भाव डावलून कसा चालेल. मित्र मैत्रिणी लाभातून म्हणून लाभ भाव नजरेत येतोच.

एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत लागते , पुढाकार घेणे मंगळाचे काम तसेच रिती रिवाज आणि धर्माने सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण न करता धर्माच्या विरुद्ध आचरण करणारा राहू सुद्धा पत्रिकेत काम करत असतो . गुरु शनी हेही विचारात घ्यावे लागतात .


अनेकदा सप्तम भाव शनी राहू मंगळ केतू ह्यांनी दुषित होऊन विवाहाची आसक्ती उरत नाही म्हणून मग शोर्टकट म्हणजे लिव्ह इन . पंचम भाव सुस्थितीत असेल तर रोमान्स फुलतो , प्रेम होते पण तरीही बंधन नको असते अश्यावेळी त्या मुक्त स्वरूपाचे प्रेम लिव्ह इन हा पर्याय स्वीकारते . 


लिव्ह-इन रिलेशनशिप ही जन्मकुंडलीतील सप्तम , पंचम भाव आणि शुक्र हा राहू केतू ह्यांच्या प्रभावाखाली त्यात धैर्य आणि साहस देणाऱ्या मंगळाच्या  प्रभावाखाली दिसते. पारंपरिक विवाहाच्या अडचणी, स्वतंत्र विचार, आणि शारीरिक/मानसिक आकर्षण यांचा मिलाफ असलेली ग्रहस्थिती असल्यास अशी नाती प्रबळ होतात. राहू हा रूढी विरुद्ध वागणारा आणि नेहमीची चौकट तोडून बंधने झुगारून देणारा आहे . त्याचसोबत हर्शल . 

शिस्त बंधन कुणालाच नको असते. साधे घरात आल्यावर चपला नीट ठेवणे , घरातील शिस्त वेळच्या वेळी झोप हेही कुणाला नको असते . शारीरिक आकर्षण पण बंधन नको हे समीकरण म्हणजे लिव्ह इन . आपल्याला जे हवे ते मिळवणे पण विवाह टाळून हा सोपा विचार म्हणजे “ लिव्ह इन “ जो आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. 

पाश्चिमात्य कुठल्याही संस्कृतीचे , विचारांचे अनुकरण जरूर करावे पण त्यासाठी आपल्या संस्कृतीचे उल्लंघन होवू नये . नवे विचार रुजवावेत पण जुन्या विचारांना फाट्यावर न मारता . आपल्या घरात दोन तीन पिढ्या असतात . प्र्तायेकाला हे नवीन विचार सहज मानवतील , झेपतील का हा विचार तरुणांनी नक्कीच सर्व प्रथम केला पाहिजे. ज्यांच्या अंगावर खेळून लहानाचे मोठे झालो त्यांनाच अक्कल शिकवायची म्हणजे त्यांना दुक्ख देण्यासारखेच आहे. मुळात कश्याला कुणाचे अनुकरण करायचे ? आहे ते काय वाईट आहे. पिढ्यान पिढ्या जे चालत आहे त्यात कुणाचे नुकसान झाले आहे का? नाही ना. आपल्या संस्कृती आपले हितच पाहणाऱ्या आहेत . उगीच समोरचा करतो म्हणून आपणही करायचे हे अर्थहीन आहे . 

विवाह हे एक बंधन आहे आणि ते स्वीकारणे हीच आपली संस्कृती आहे. उठसुठ दुसर्याचे अनुकरण करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमानच म्हंटला पाहिजे . लोक आपले कुठे अनुकरण करतात , परदेशस्थ लोक त्यांच्या धर्माला धरून असतात मग आपण ह्याच त्यांच्या गुणाचे का नाही अनुकरण करत . भलतेच वागून प्रसिद्धी मिळत नाही आणि सुख तर त्याहून नाही . आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक समाजाची रचना केलेली आहे. काळ कितीही बदलला तरी आपली संस्कृती तीच आहे आणि आपल्या संस्कृतीने जे काही सांगितले आहे ते आपल्या कल्याणासाठीच आहे . आधुनिकतेच्या नावाखाली ते झुगारून देणे म्हणजे शहाणपण नाही . लिव्ह इन हा एक व्यवहार आहे आपल्या नको त्या भोगांच्या तृप्तीसाठी निवडलेला पर्याय.  जिथे कुणालाच उत्तर देण्यास आपण बांधील नाही , नाही पटले चला ब्याग भर आणि निघा हे तर भेकडपणाचे लक्षण झाले. 


समाजाचे हित जपणे हे आपलेही सर्वांचे कर्तव्य असल्यामुळे ह्या गोष्टीना अजिबात खतपाणी , प्रोत्चाहन न देणे हे समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. प्रेमाची भावना अत्यंत नाजूक कोमल आहे . फुलपाखरासारखे प्रेम हे प्रेम नसते ते फक्त वासनेने भरलेले आकर्षण असते. हे प्रेम खरे असूच शकत नाही जे आज हिच्यावर उद्या तिच्यावर होत जाते . खरे प्रेम जबाबदारी कधीही टाळणार नाही . माणूस हा आयुष्यात प्रेमाच्या भावनेचाच भुकेला असतो , कुणीतरी आपले असावे , आपल्याला आपले म्हणावे आणि त्याची साथ आयुष्यभर मिळावी ह्या साठी प्रयत्नशील राहावे पण त्यासाठी लिव्ह इन हा चुकीचा मार्ग स्वीकारू नये. अनेकदा ह्यातून काहीच निष्पन्न होत नाही , आयुष्याची कुटुंबियांची वाताहत तर होतेच पण बदनामीही होते , कारण समाज हे सहज स्वीकारत नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही . सहमत ??

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

 



आपला आतला आवाज - केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या सद्गुरूंवर आपली नितांत श्रद्धा तर हवीच पण त्याहीपेक्षा अधिक हवा तो विश्वास. गुरु आपले कधीतरी वाईट करतील का? विचारा प्रश्न स्वतःच्याच मनाला. आई आपली गुरु आहे ती जेवणात विष कालवून देयील का नाही अगदी तसेच जेजे होते आहे ते त्यांच्या इच्छेने ह्याची खुणगाठ एकदा मनात पक्की झाली कि आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर आपले आपल्यालाच मिळत जाते. आत्मचिंतन हाही एक अध्यात्माचा भाग आहे. स्वतःच्या आत मनात डोकावले तरी सुद्धा अनेक प्रश्नांची उकल सुटते .

आज चंद्र केतुच्याच नक्षत्रात आहे . केतू ला दिसत नाही पण त्याच्याकडे मन आहे आणि स्पर्शज्ञान सुद्धा आहे. बाह्य जगातील कुठल्याच गोष्टीचा आस्वाद दृष्टी नसल्यामुळे घेता येत नाही म्हणूनच मग स्वतःच्या आतमधील सुंदर जग आणि स्वतःच्या असीम व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्याचा केतू प्रयत्न करतो. ज्यांचा केतू चांगला असतो त्यांना गुरुसारखीच फळे मिळतात .

स्वतःच्या आत पाहायला शिकवणारा हा केतू असामान्य ताकदीचा आहे . माणूस सगळ्यात दुर्लक्षित करतो ते आपला श्वास आणि आपल्या आतील आवाज . आपला आवाज सतत आपल्याला काहीतरी सांगू पाहत असतो पण भौतिक सुखात मश्गुल झालेले आपल्यापर्यंत तो आवाज पोहोचताच नाही . कुठल्याही अगदी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर कोण देवू शकतो तर आपले मन , पण त्याला न विचारता जगभर आपण विचारत बसतो . दहा लोक हजार गोष्टी सांगतात आणि आपण अजूनच बुचकळ्यात पडतो . पण आपल्या आतला आवाज आपल्याला नेहमीच वास्तव दाखवतो , आपल्या मनाने दिलेला कौल माणसाने नेहमीच ऐकावा कारण तो सौ टक्का खरच असतो .

केतू म्हणजे आत्मिक प्रेरणा , आंतरिक शक्ती , गूढता , अध्यात्मिक ज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञानाचे दालन . शुभ केतू ध्यान धारणा , योग ह्याकडे आपले लक्ष्य केंद्रित करायला मदत करतो. ध्यानात आपल्या सद्गुरूंची गाठभेट करून देणारा हा केतूच तर आहे .

ज्यांचे मन सदैव अशांत किंवा बेचैन असते किंवा एखाद्या अनामिक भीतीने ग्रासलेले असते त्यांनी योग , साधना केली तर मन स्थिर होण्यास मदत होते . पत्रिकेत केतू बिघडलेला असेल तर भ्रमात राहणे , मन अशांत , उदासी , भीती , निर्णयक्षमता नसणे , एकलकोंडेपणा , मानसिक तणाव आणि त्यातून निर्माण होणारे मनाचे आजार ह्या गोष्टीना व्यक्तीला सामोरे जावे लागते . केतू अध्यात्मिक प्रगतीचे मार्ग खुले करून देतो पण त्या मार्गावर चालणे सोपे नसते. दुर्दम्य इच्छाशक्ती लागते . केतूचा परिणाम अनेकदा पायातील नसा आणि नर्व्हस सिस्टीम वर होताना दिसतो . केतू म्हणजे मंदिरावरील कळस त्यामुळे शुभ असेल तर कीर्ती यश शिखरापर्यंत करिअर जावू शकते अन्यथा मानसिक ताणताणाव आणि आजार मागे लागतात .

केतूचा मुख्य गुण म्हणजे विरक्ती , धन भावात केतू असेल तर अश्या व्यक्ती विरक्त किंवा एकट्या एकट्या राहतात . कुटुंबाबद्दल फारश्या आसक्त नसतात . केतू आपल्याला अंतर्मुख होवून स्वतःच्याच आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहायला शिकवतो . शेवटी हे आपले आयुष्य आहे आणि आपल्या प्रश्नांची उकल शेवटी आपली आपल्यालाच करावी लागते ..

आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या मधेच आहेत बाहेर शोधायची गरजच नाही . अंतर्मुख होवून बघितले तर आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल आणि आपली स्वतःचीही नव्याने ओळख होयील . प्रयत्न करा आणि अभिप्राय सुद्धा कळवा.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी मार्गदर्शन : 8104639230

Monday, 4 August 2025

फलित

 || श्री स्वामी समर्थ ||


आपण घरात असतो तेव्हा सगळ्या खोल्यातील दिवे पंखे चालू ठेवत नाही. ज्या खोलीत असतो तिथलाच दिवा पंखा चालू असतो , दुसर्या खोलीत जाताना दिवे पंखे बंद करून जातो कारण आता तिथून आपण दुसर्या खोलीत जाणार असतो. ग्रहांचेही अगदी तसेच आहे . सगळे नवग्रह आपल्या आयुष्यात एकाच वेळी काम करत नाहीत किबहुना त्याची फळे एकाच वेळी मिळत नाहीत . एखादी घटना घडवण्याचा हक्क दशा स्वामीकडे असल्यामुळे ज्या ग्रहाची दशा असते त्या ग्रहाची सत्ता आपल्या पत्रिकेवर त्या कालावधीत असते , तसेच त्यातील अंतर्दशा , विदशा ह्या सुद्धा बलवान असतात आणि फलिते देतात .

अपुरा अभ्यास किंवा शास्त्राची अर्धवट माहिती तसेच न समजलेले वाचन ह्यामुळे अनेकदा आपण आपले वाईट करणारे “ पापग्रह “ असतात असा चुकीचा समज करून घेतो . हा समज जनमानसात इतका खोल रुजलेला दिसतो कि काहीही वाईट झाले कि माझी साडेसाती आहे , माझी राहू दशा आहे लगेच सुरु होते .

एखाद्या पत्रिकेत जातक मुळातच घाबरट किंवा कमकुवत आत्मविश्वास नसलेला असेल , एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी उत्सुक किंवा आत्मबल नसलेला असेल तर अश्यावेळी सर्वप्रथम लग्न लग्नेश आणि चंद्र कमकुवत असतो असे दिसून येते . मग इथे राहू केतू शनी कुठे आले ? येतंय न लक्ष्यात . अनेकदा चोर सोडून संन्यासाला फाशी असाच काहीसा प्रकार घडतो कारण अर्धवट ज्ञान . पत्रिकेत उधळपट्टी करणारे ग्रह योग असतील तर व्यक्ती कायम धन अर्जित करेल पण त्याचा संचय नाही करू शकणार मग दशा कुठलीही असो.

चंद्र शुक्र गुरु हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत . पण तेही जर बिघडले तर तेही शनी राहू पेक्षाही वाईट फलित देतात हे लक्ष्यात ठेवले पाहिजे . उदा. चंद्रच पत्रिकेत दुषित किंवा बलवान नसेल तर मन कमकुवत असेल. उदा चंद्र नेप युती किंवा चंद्र हर्शल युती ती मानसिकता बिघडवणारी आहे. पण हा ह्या माणसाचा स्वभाव होईल आणि तोही कायमचा . मग राहू दशा असो अथवा बुध किंवा मंगळ ,व्यक्ती चा चंद्र हर्शल युतीमुळे असलेला विक्षिप्त स्वभाव कमी होणार नाही तो तसाच राहील. कारण तीच ग्रहांची बैठक घेवून जातक जन्माला आलेला आहे.

आजचेच उदा बघा . एका स्त्रीने जिचा घटस्फोट झालेला आहे तिने दुसर्या विवाहाचा प्रश्न केला . मी तिला म्हंटले नाही केले तर अधिक सुखी राहाल . तर म्हणाली मग आधीचा नवरा पुन्हा येयील का माझ्यासोबत. आता काय बोलायचे कळेना . चंद्र किती बिघडला असेल हे ह्या उदा वरून समजेल.

व्ययात मंगळ अनेकदा नुकसान , पैशाचा अपव्यय दर्शवतो . मग अश्यावेळी दशा कुठलीही असो , खर्चिक वृत्ती जातकाची अमुक अमुक ग्रहस्थितीमुळे असते त्याला वाईट दशेची जोड मिळाली तर ती वाढेल कमी होणार नाही .

विवाहा साठी पत्रिका पाहताना मुळात वैवाहिक सौख्य आहे कि नाही ते शुक्रावरून समजते . मग शुक्र कन्या किंवा सिंह राशीत वा नवमांशात असेल , तसेच हर्शल , राहू नेप ह्या ग्रहांच्या सोबत असेल तर वेगळे फलित मिळते. लग्न आणि नवमांश पत्रिकेत शुक्र सिंहेत असेल तर विवाहच होत नाही किंवा झालाच तर टिकत नाही . शुक्र लग्नी असेल तर जातक सुंदर असेल पण त्यासोबत पापग्रह असतील तर त्या पापग्रहांची दृष्टी सप्तम भावावर जावून वैवाहिक सौख्य बिघडवणारा शुक्र तर बिघडेलच पण सप्तम भाव सुद्धा बिघडेल हे लक्ष्यात आले पाहिजे . आता अश्यावेळी दशा कुठली असेल ते महत्वाचे पण फळ फक्त दशाच देत नाही हि अशी मुळात पत्रिकेत असलेली ग्रहस्थिती सुद्धा देते ह्यासाठी हा लेखन प्रपंच .

वैवाहिक सुखाचा शुक्र सौख्य देत नसेल तर कितीही दशा आल्या तरी विवाह सौख्य नाही ते नाहीच कारण शुक्र दुषित असणे हा पत्रिकेतील मोठा दोष आहे .

अनेकदा पत्रिकेत असलेली मुळ स्थिती डावलून आपण दशेला दोषी ठरवतो . दशा ज्या ग्रहाची असेल तो ग्रह त्या दशेत संपूर्णपणे कार्य करणारच पण म्हणून प्रत्येक दशा भीती दडपण न्यूनगंड देयील असे नाही . मूळ पत्रिकेतील चंद्राची स्थिती त्याला कारणीभूत असेल हे लक्ष्यात घेतले पाहिजे .

बाबा नेहमीच रागावतात , फटके मारतात त्यामुळे ते शालेय जीवनात जणू व्हिलन असतात जसे आपले पापग्रह पण अति झाले कि कधीही न ओरडणारी कायम पदराखाली घेणारी आणि माया करणारी आई सुद्धा रौद्र रूप धारण करून मुलाला उपाशी ठेवते जसे आपले शुभग्रह . अनेकदा पापग्रह आयुष्य पुढे नेतात जसे भाग्यातील राहू परदेशी नेण्यास उत्सुक असतो . चांगली नोकरी मिळाली दुबईला तरीही राहू वाईट का?

मूळ ग्रहस्थिती दशेनुसार बदलत नाही . पत्रिकेतील ग्रह आपल्या पूर्व कर्मानुसार फलित प्रदान करणारच . फक्त त्या फलिताचा कालावधी ठरवतो तो दशास्वामी इतकेच .

प्रत्येक वेळा दोष दशेला न देता मूळ ग्रहस्थिती सुद्धा तपासावी लागते तेव्हाच नेमके फलित देणारे ग्रह आरशासारखे स्वछ्य दिसतात .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

Sunday, 3 August 2025

रहस्य अर्थ त्रिकोणाचे

 || श्री स्वामी समर्थ ||


शास्त्रात चतुर्वीद पुरुषार्थ सांगितले आहेत . संपूर्ण जीवन जगताना पायरी पायरीने येणारे हे चारही पुरुषार्थ आपले जीवन परिपूर्ण करत असतात . जो धर्म अर्थ आणि काम हे तीनही त्रिकोण संपूर्णपणे खर्या अर्थाने जगतो किंवा उपभोगतो तोच मोक्षाकडे वाटचाल करू शकतो . जर आपल्या कुठल्याही इच्छा राहिल्या तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो . जो पर्यंत आपण ह्या चक्रातून बाहेर येत नाही तोवर पुनरपि जननं ...चालूच राहणार .

आज आपण अर्थ त्रिकोणातील बारकावे बघुया . अर्थ त्रिकोण हा २ ६ १० भावाने तयार होतो . अर्थ त्रिकोण नावाप्रमाणे अर्थार्जनाशी आणि त्याच्या असलेल्या विनियोगाशी निगडीत आहे . द्वितीय भाव हा कुटुंबाचा आणि इथून आपल्या अर्थ त्रिकोणाची खरी सुरवात होते . आपण जन्माला येतो तेव्हा पैसा घेवून येत नाही पण नशीब मात्र नक्कीच घेवून येतो. कुटुंबातील व्यक्ती आपले पालन पोषण करतात आणि त्यामुळे आपण आपल्या पायावर उभे राहतो . इथे आपली वाणी सुद्धा आहे . मन शुद्ध असेल आणि मनामध्ये चांगले विचार असतील तर आपोआपच माणूस चांगले बोलणार . आपले आप्त , कुटुंबातील सर्व व्यक्ती ह्यांच्याशी आपण आदराने वागलो तर अर्थार्जनाचा ओघ सुरु राहील. शेवटी ज्यांनी कमवायला लायक बनवले त्यांचा आदर केलाच पाहिजे .

षष्ठ भाव हा रोजचे दैनंदिन जीवन त्यात आपले सहकारी , घरातील नोकर माणसे तसेच रोजच्या जीवनात भेटणारे असंख्य जे आपले जीवन पुढे नेण्यास मदत करतात त्यांच्याशीही आपली वागणूक सभ्यतेची , आदरपूर्वक संम्मान देणारी असेल तर रोजच्या जीवनात अडचणी येणार नाहीत . घरातील पाळीव प्राणी , अगदी घरात लावलेली झाडे ह्यांचे संगोपन हि आपली जबाबदारी आहे .त्यांच्या सेवेत , वाढ होण्यात आपण कमी पडत नाही ना हे पाहणे आपले प्रथम कर्तव्य आहे .

दशम भाव हा तर आपले कर्म . आपले कर्म शुद्ध असेल तर ह्याही भावाचे म्हणजे नोकरी व्यवसायाचे फळ उत्तम मिळणार ह्यात दुमत नाही. दशम आणि लाभ हे दोन्ही भाव प्रत्यक्ष शनी महाराजांच्या कडे आहेत . कर्म उत्तम करा ते लाभ पण करून देतील. शनीसारखा दाता नाही हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले सुद्धा असेल.

आयुष्यात शेवटी पैसा महत्वाचा कारण त्यावरून आपले असणे आणि नसणे ठरत असते . कुणाही पुढे पैसा मागून जगावे लागावे ह्यासारखे दुर्दैव आणि लाचारी ती काय . पोटा पुरते कमवणे आणि ते धन संचित करण्यासाठीच तर षष्ठ भावात पृथ्वी तत्वाची कन्या राशी आहे . पृथ वी तत्व हे गोष्टी धरून ठेवणारे आहे . पैसा मिळवणे त्याहीपेक्षा तो योग्य ठिकाणी गुंतवून आयुष्याची संध्याकाळ सुरक्षित करणे हेही महत्वाचे आहे . लक्ष्मी सुद्धा सन्मार्गाने आली पाहिजे .

लग्नाच्या वेळी मुलगी देताना ७ वी मधील गणितातील मार्क कुणी विचारणार नाही पण आज पैसा किती कमावतो ते नक्कीच विचारणार . असा हा अर्थ त्रिकोण जो आयुष्य घडवतो किंवा बिघडवतो .

पत्रिका कुणाची आहे ? तुमची ना म्हणजेच प्रथम भाव म्हणजे तुम्ही स्वतः . ह्या भावातून आपण पाहतो ती आपली बुद्धी आणि त्यातून केलेले विचार . व्यक्तीचा मेंदू योग्य पद्दतीने काम करेल जेव्हा आपले विचार योग्य असतील , ह्याचे वाईट होवूदे त्याला बघून घेयीन हे विचार आयुष्य उतारावर नेतात . म्हणूनच प्रथम भावातून दिसते ती आपली सोच . ती जर निट असेल तर व्यक्तिमत्व उत्तम घडणार आणि त्याची छाप पडल्याशिवाय राहणारही नाही .

अर्थ त्रिकोण आणि त्यातील ग्रह त्यांचे योग महत्वाचे असतात . अनेकदा उत्तम शिक्षण असून नोकरी नाही , व्यवसाय चालत नाही . लक्ष्यात घ्या जसे कर्म तसे फळ . दशमात शनी स्वतः आहे. तिथे गुडघे आहेत . कर्म उत्तम तर आपण पायावर उभे राहू सक्षमपणे नाहीतर सगळेच व्यर्थ आहे . दशम म्हणजेच कर्म चांगली असतील तर लाभ आणि सुखाची निद्रा शनी देणारच .

आपली प्रत्येक कृती काहीतरी विचार देत असते . आणि त्यात कुठे चूक झाली तर शनीचे आपण अपराधी ठरतो .आपले कर्म हे आपल्या हातात आहे पण त्याचे फळ देणे हे शनी महाराजांच्या हाती आहे.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230