Saturday, 16 August 2025

तळमळ फक्त एक घोट पाण्याची....

 || श्री स्वामी समर्थ ||


एक विधवा निराधार स्त्री एका गावात राहत होती आणि रोज ती दिवसभर पोटासाठी काम करत असे जेणेकरून तिला एक भाकरी तरी मिळत असे . तिची स्वामींवर खूप श्रद्धा होती . महाराजांना रोज सोने चांदी अनेकविध मिठाया अनेक उंची वस्तू भेट करणारे आणि नेवेद्य ठेवणारे खूप लोक गावात रोज मठात जावून महाराजांना अर्पण करत असत. पण हि स्त्री एका लोट्यात पाणी भरून महाराजांच्या चरणाशी ठेवत असे आणि मनोमन प्रार्थना करत असे कि तुम्हाला द्यायला माझ्याकडे दुसरे काहीच नाही आणि श्रद्धेने नतमस्तक होत असे.

एकदा एक धनिक जोडपे मठात आले आणि महाराजांना अनेक विध पक्वान्ने , फळे वगैरे ठेवत असताना त्या श्रीमंत स्त्रीने ह्या गरीब विधवा स्त्रीकडे पाहिले आणि म्हणाली हे काय स्वामिना ह्या लोट्यांतील पाण्याची गरज नाही . गरीब स्त्री हिरमुसली झाली आणि मनोमन विचार करू लागली कि ह्या अनेकविध उंची नेवैद्य , वस्त्रे ह्यापुढे हे पाणी ..खरच कि. म्हणून ती घरी गेली आणि दुसर्या दिवशी पुन्हा दर्शनाला आली पण काहीही न घेता . महाराज आले आणि म्हणाले हे काय मला तहान लागली आहे पाणी कुठे आहे. मनोमन काय ते ती समजली आणि लोटाभर पाणी आणले. महाराज पाणी प्यायले आणि संतुष्ट होवून तिला आशीर्वाद दिला.

त्यावेळी तिच्या डोळ्यातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या त्या तुम्हा आम्हा सर्वांच्याच डोळ्यात नेहमी येतात इतके आपले महाराजांच्यावर अतोनात प्रेम आहे. तिने आणलेल्या पाण्यात तिचा श्रद्धा भाव होता हे महाराज जाणत नसतील का? अखंड विश्वाची निर्मिती केलेल्या परमेश्वराचे चित्त तुमच्या मोदक आणि पुरणपोळी वर असेल का? त्याला तुमचा निर्मळ खरा भाव हवा आहे .

त्यांच्यासमोर आपल्या अहंकाराची धूळधाण होते , महाराज अहंकारीत व्यक्तीकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीत. तुमची खरी तळमळ असेल तर त्यांचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment