Thursday, 7 August 2025

राजाची शेळी

 || श्री स्वामी समर्थ ||

एका राजाने राजदरबारात घोषणा केली कि कुणीही विद्वानाने माझ्या लाडक्या शेळीला रानात दिवसभर पोटभर चारावयाचे आणि संध्याकाळी परत आणायचे . आणल्यावर मी स्वतः तिला चारा देईन. जर तिने चारा खाल्ला तर तिचे पोट भरलेले नाही असे समजून त्या विद्वानाला मी देहदंड देयीन .आता ह्या साठी कुणीच पुढे यायला तयार नाही , आपला जीव कोण धोक्यात घालेल नाही का .

एक माणूस पुढे आला आणि म्हणाला मी प्रयत्न करतो त्याने शेळीला दिवसभर रानात खूप फिरवले आणि खा खा चारा खायला दिला . संध्याकाळी दरबारात आल्यावर राजाने विचारले पोट भरले आहे कि हिचे त्याने मान डोलावली. तेव्हा राजाने पुन्हा तिला चारा खायला घातला. शेळीने चारा खाल्ल्यावर राजा म्हणाला पोट भरले असेल तर ती कश्याला खाईल . असे म्हंटल्यावर आपली आता धडगत नाही म्हणून तो माणूस खूप घाबरून गेला. बघा शेळी हे असे जनावर आहे कितीही पोट भरले तरी चारा दिसल्यावर ती त्याला तोंड लावणारच . असो .

दिसरया दिवशी अजून एक व्यक्ती पुढे आला आणि त्याने शेळीला रानात नेले . जाताना त्याने आपल्या हातात एक दंडुका घेतला . शेळीने चार्याला तोंड लावले कि हा तिच्या तोंडावर तो दंडुका मारत असे. असे दिवसभर त्याने केले. अश्यामुळे शेळी उपाशीच राहिली आणि दिवसभर त्या दंडुक्याचा प्रसाद खात राहिली. संध्याकाळी राजासमोर तिला आणल्यावर त्याने तिला पोटभर चारा खायला घातला का असे विचारले आणि पुन्हा तिच्या तोंडाशी चारा नेला . शेजारी हा दंडुका ठोकत उभा. काय बिचार्या त्या शेळीची हिम्मत तो चारा खायची .

झाले देह्दंड बाजूला राहिला राजाच्या बक्षिसाचा तो मानकरी ठरला.

ह्यावरून आपण काय बोध घ्यायचा तो घ्यायचा .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment