|| श्री स्वामी समर्थ ||
शास्त्रात चतुर्वीद पुरुषार्थ सांगितले आहेत . संपूर्ण जीवन जगताना पायरी पायरीने येणारे हे चारही पुरुषार्थ आपले जीवन परिपूर्ण करत असतात . जो धर्म अर्थ आणि काम हे तीनही त्रिकोण संपूर्णपणे खर्या अर्थाने जगतो किंवा उपभोगतो तोच मोक्षाकडे वाटचाल करू शकतो . जर आपल्या कुठल्याही इच्छा राहिल्या तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो . जो पर्यंत आपण ह्या चक्रातून बाहेर येत नाही तोवर पुनरपि जननं ...चालूच राहणार .
आज आपण अर्थ त्रिकोणातील बारकावे बघुया . अर्थ त्रिकोण हा २ ६ १० भावाने तयार होतो . अर्थ त्रिकोण नावाप्रमाणे अर्थार्जनाशी आणि त्याच्या असलेल्या विनियोगाशी निगडीत आहे . द्वितीय भाव हा कुटुंबाचा आणि इथून आपल्या अर्थ त्रिकोणाची खरी सुरवात होते . आपण जन्माला येतो तेव्हा पैसा घेवून येत नाही पण नशीब मात्र नक्कीच घेवून येतो. कुटुंबातील व्यक्ती आपले पालन पोषण करतात आणि त्यामुळे आपण आपल्या पायावर उभे राहतो . इथे आपली वाणी सुद्धा आहे . मन शुद्ध असेल आणि मनामध्ये चांगले विचार असतील तर आपोआपच माणूस चांगले बोलणार . आपले आप्त , कुटुंबातील सर्व व्यक्ती ह्यांच्याशी आपण आदराने वागलो तर अर्थार्जनाचा ओघ सुरु राहील. शेवटी ज्यांनी कमवायला लायक बनवले त्यांचा आदर केलाच पाहिजे .
षष्ठ भाव हा रोजचे दैनंदिन जीवन त्यात आपले सहकारी , घरातील नोकर माणसे तसेच रोजच्या जीवनात भेटणारे असंख्य जे आपले जीवन पुढे नेण्यास मदत करतात त्यांच्याशीही आपली वागणूक सभ्यतेची , आदरपूर्वक संम्मान देणारी असेल तर रोजच्या जीवनात अडचणी येणार नाहीत . घरातील पाळीव प्राणी , अगदी घरात लावलेली झाडे ह्यांचे संगोपन हि आपली जबाबदारी आहे .त्यांच्या सेवेत , वाढ होण्यात आपण कमी पडत नाही ना हे पाहणे आपले प्रथम कर्तव्य आहे .
दशम भाव हा तर आपले कर्म . आपले कर्म शुद्ध असेल तर ह्याही भावाचे म्हणजे नोकरी व्यवसायाचे फळ उत्तम मिळणार ह्यात दुमत नाही. दशम आणि लाभ हे दोन्ही भाव प्रत्यक्ष शनी महाराजांच्या कडे आहेत . कर्म उत्तम करा ते लाभ पण करून देतील. शनीसारखा दाता नाही हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले सुद्धा असेल.
आयुष्यात शेवटी पैसा महत्वाचा कारण त्यावरून आपले असणे आणि नसणे ठरत असते . कुणाही पुढे पैसा मागून जगावे लागावे ह्यासारखे दुर्दैव आणि लाचारी ती काय . पोटा पुरते कमवणे आणि ते धन संचित करण्यासाठीच तर षष्ठ भावात पृथ्वी तत्वाची कन्या राशी आहे . पृथ वी तत्व हे गोष्टी धरून ठेवणारे आहे . पैसा मिळवणे त्याहीपेक्षा तो योग्य ठिकाणी गुंतवून आयुष्याची संध्याकाळ सुरक्षित करणे हेही महत्वाचे आहे . लक्ष्मी सुद्धा सन्मार्गाने आली पाहिजे .
लग्नाच्या वेळी मुलगी देताना ७ वी मधील गणितातील मार्क कुणी विचारणार नाही पण आज पैसा किती कमावतो ते नक्कीच विचारणार . असा हा अर्थ त्रिकोण जो आयुष्य घडवतो किंवा बिघडवतो .
पत्रिका कुणाची आहे ? तुमची ना म्हणजेच प्रथम भाव म्हणजे तुम्ही स्वतः . ह्या भावातून आपण पाहतो ती आपली बुद्धी आणि त्यातून केलेले विचार . व्यक्तीचा मेंदू योग्य पद्दतीने काम करेल जेव्हा आपले विचार योग्य असतील , ह्याचे वाईट होवूदे त्याला बघून घेयीन हे विचार आयुष्य उतारावर नेतात . म्हणूनच प्रथम भावातून दिसते ती आपली सोच . ती जर निट असेल तर व्यक्तिमत्व उत्तम घडणार आणि त्याची छाप पडल्याशिवाय राहणारही नाही .
अर्थ त्रिकोण आणि त्यातील ग्रह त्यांचे योग महत्वाचे असतात . अनेकदा उत्तम शिक्षण असून नोकरी नाही , व्यवसाय चालत नाही . लक्ष्यात घ्या जसे कर्म तसे फळ . दशमात शनी स्वतः आहे. तिथे गुडघे आहेत . कर्म उत्तम तर आपण पायावर उभे राहू सक्षमपणे नाहीतर सगळेच व्यर्थ आहे . दशम म्हणजेच कर्म चांगली असतील तर लाभ आणि सुखाची निद्रा शनी देणारच .
आपली प्रत्येक कृती काहीतरी विचार देत असते . आणि त्यात कुठे चूक झाली तर शनीचे आपण अपराधी ठरतो .आपले कर्म हे आपल्या हातात आहे पण त्याचे फळ देणे हे शनी महाराजांच्या हाती आहे.
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment