Saturday, 5 August 2023

त्याच्या अस्तित्वाला सलाम

 || श्री स्वामी समर्थ || 



आपल्यापैकी अनेक देवाला मानणारे आणि काही न मानणारे असतील. अनेक जण म्हणतील आमचा कर्मावर विश्वास आहे . बरोबर पण कर्म कोण करवून घेत आहे आपल्याकडून तर तोच जो वरती बसलाय . त्याला बघितलाय का कुणी ? नाही पण तो आहे . कुठे आहे ? ह्या आसमंतातील प्रत्येक अणुरेणूत आहे, आपल्या श्वासात आहे, आपल्या असण्या आणि नसण्यात सुद्धा तोच आहे. आपल्या प्रत्येक कृतीत , हालचालीत , हसण्यात बोलण्यात शब्दात सर्वत्र त्याचाच तर संचार आहे. ह्या लेखातील प्रत्येक शब्दात आहे , तुम्हाला वाचावे असे वाटावे ह्या भावनेत सुद्धा तोच आहे. 


लहानपणी आपल्यावर आई संस्कार करताना सांगत असे , बघ हा खोटे बोललास तर देवबाप्पा रागवेल तो शिक्षा करतो. अगदी हेच कुणीतरी आहे मग त्याला देव , ईश्वर काहीही म्हणा . अस्मिता. आपल्या आयुष्याला कुणाचातरी धाक आहे हेच ह्यातून आईला अभिप्रेत करायचे नसेल ना? वाटेल तसे वागून चालणार नाही कुणीतरी आहे ज्याने आपल्या आयुष्याचा सुकाणू हाती घेतला आहे. अस्मिता.त्याच्या अस्तित्वाची जाणीव तो वेळोवेळी आपल्याला करून देत असतोच . अस्मिता प्रगत जगात तर उलट ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवणार्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 

तुही बिगाडे तुही सवारे ...आजचा जन्म हा पूर्व जन्माचा आरसा आहे. पूर्वी कित्येक जन्मात केलेले अपराध चुकांची शिक्षा भोगण्यास आपण येतो आणि पुन्हा नवनवीन चुका करतो ..मग आहेच पुनरपि जननं पुनरपि मरणं. अनेकदा आपल्याला आपल्या चुकांचा , केलेल्या अपराधाचा पश्चात्ताप होतो आणि शेवटी एक मस्तक आणि दोन हस्तक आपण ह्याच ईश्वरी शक्तीसमोर जोडतो. संकट आले कि त्याचीच आठवण येते . अस्मिता. आपल्या आयुष्यातून ह्या दैवी शक्ती वजा केल्या तर आयुष्य शून्य होयील. एकदा मला महाराजांचा खूप राग आला काहीतरी मनासारखे झाले नव्हते. मनात आले आता उद्या सगळ्या पोथ्या जपमाळा विसार्जीतच करते . सकाळी उठल्यावर विचार आला कि हे सर्व केले तर मग माझ्याजवळ आणि घरात राहिले तरी काय ???? सर्व रिते होऊन जायील. महाराजांची क्षमा मागितली. ह्या अध्यात्माने आपले आयुष्य किती भारावून टाकलेले आहे ते बघा . आई सांगते ना देवाला हात जोड आणि त्याला म्हणावे मला चांगली बुद्धी दे म्हणजे तो आहे . अस्मिता. आईच्या आईने तिला शिकवले आता ती आपल्याला ,उद्या आपणही तिच्याच पावलावर पाऊल टाकून आपल्या मुलांना हेच शिकवणार आहोत कारण आपल्याला मनोमनी पटलेले आहे कि परमेश्वरी शक्तीचा ह्या जगतात , विश्वात संचार आहे आणि त्याची अनुभूती आपण प्रत्येक क्षणी अनुभवत आहोत . 

आम्ही बाई so called modern म्हणणारे भले भले ना रक्त तयार करू शकत ना पाऊस पाडू शकत , ना कुणाला जन्माला घालू शकत ना कुणाचा मृत्यू थांबवू शकत . अस्मिता.काहीच नाही आहे आपल्या हातात . आपल्याला थोडे फार जे काही त्याने दिलेले आहे त्याने आपण इतके मिजासखोर झालेलो अहो कि सगळेच त्याने आपल्याला बहाल केले असते तर आपली काय अवस्था झाली असती. अस्मिता. भारतात कायदा सुव्यवस्था आहे म्हणून सामान्य माणूस जगतोय . अस्मिता.कुणीतरी वाली आहे आपला जी भावनाच आपल्याला जागवते आधार देते अगदी तसेच आपल्या सर्वांच्या वरती आपल्यावर त्याचा वरदहस्त आहे म्हणून आपण आहोत . अस्मिता. वरवर कुणी काहीही म्हणूदेत पण मनोमन आपण त्याचे अस्तित्व स्वीकारले आहे आणि तेही 100%.

आयुष्यात त्याच्या असण्याची अनुभूती आपल्याला कधीतरी येतेच आणि मग डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागतात . कुठे आहे हा ईश्वर ? आपल्या अगदी जवळ आपल्या अवती भवतीच तर आहे. अस्मिता.आपला जन्म हा त्याच्या सेवेसाठीच झालेला आहे हा भाव मनात रुजला कि मग सगळेच सोपे होऊन जाते .

ईश्वराशी अनुसंधान आपण अनेक साधना , उपासनेतून करू शकतो . अस्मिता. त्याच्याशी घट्ट मैत्री करू शकतो , त्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व त्याच्या असण्यात आपले असणे आणि त्याच्या इच्छेत आपल्या इच्छा विलीन करण्यासाठी उपासना हा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे आणि त्या करून घेण्यासाठीच येत आहे श्रावण .अस्मिता.आपल्या उपासनेस आरंभ करण्यासाठी  सोन्यासारखा मास श्रावण मास . 


पुढील लेखात श्रावणातील उपासना .अस्मिता.पण त्या आधी ज्याची उपासना करायची त्याचे अस्तित्व तर मान्य झाले पाहिजे म्हणून हा लेखन प्रपंच . 

आपल्याजवळ कुणीच नसते तेव्हा तो मात्र आपल्या अगदी समीप असतो ..आपल्याला आधार देण्यासाठी हे कटू सत्य आहे .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment