Monday, 31 March 2025

पवनपुत्र

 || श्री स्वामी समर्थ ||

एकदा मारुतीराया सीता मातेच्या दर्शनाला गेले होते . त्यावेळी त्या आपल्या भांगेत सेंदूर लावताना त्यांनी पहिले . त्यांनी त्याबद्दल विचारले असता माता सीता म्हणाल्या कि हा सेंदूर लावला कि माझ्या पतीचे म्हणजेच रामरायाचे आयुष्यमान वाढते . हे ऐकल्यावर मारुतीरायाना हर्ष झाला आणि त्यांनी आपला सर्व देहावर सेंदुराचे लेपन केले आणि श्री रामाच्या दर्शनाला गेले. 

रामाने मारुतीचे हे नवीन रूप पाहून ह्याबद्दल त्यास विचारले असता मारुतीरायाने सीता माते सोबत झालेला संवाद विस्तृत कथन केला. त्यावर राम मनापासून आनंदित झाले. मारुती रामाचा निस्सीम भक्त होता हे ते मनोमनी जाणत होते पण हि त्यांच्या प्रेमाची उत्कटता  पाहून त्यांनी आपला हस्त त्याच्या डोक्यावर ठेवला आणि आशीर्वाद दिला ,म्हणाले तुझी अंतकरणापासून केलेली सेवा पाहून मी निशब्द झालो आहे. जो कुणी भक्त मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करेल त्याच्या वर माझी सदैव कृपा राहील .

म्हणूनच साडेसाती असो , शनी दशा असो अथवा नसो मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करायचे व्रत आजन्म करावे . श्री रामरायाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास ठेवावा .मारुतीच्या पायावर शेंदूर अर्पण करावा ( कुठल्या पायावर ?? असा बालिश प्रश्न नको ) प्रदक्षिणा घालता आली तर उत्तम आणि सरळ घरी यावे.  देवळातून नेहमी घरी यावे .

ह्याचा अनुभव आणि प्रचीती आल्याशिवाय राहत नाही . अनुभवाचे बोल. 

ओं शं शनैश्चराय नमः 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment