Friday, 14 March 2025

तुला नाही देत जा....( शनी हेच आपले गुरुकुल )

 || श्री स्वामी समर्थ ||


काहीही झाले तरी “ तुला नाही देणार ...जा “ असे म्हणवून प्रत्येक गोष्टीत आपल्याला रडवतो , वाट बघायला लावतो आणि आपल्याला संयम शिकवतो तो शनी आणि असे म्हंटल्यावर आपण थैमान घालतो , सैरभैर होतो तो काळ म्हणजे साडेसाती किंवा शनी महादशा . त्याचे ऐकले तर दशा सुकर जाईल नाहीतर दशा जीवनाची दिशा बदलून दैन्य अवस्था करेल. 

पैसा फेको ...कि सगळे विकत घेता येत पण देव आणि त्याचे प्रेम नाही. शनी महाराजांचे , आपल्या कुलस्वामिनीचे मन चांगली कर्म करून जिंकायला लागते , त्यांचा आशीर्वाद सहज पणे मिळत नाही त्यासाठी प्राण पणाला लावून त्यांची आराधना करावी लागते , तन मन धन त्यांना अर्पण करावे लागते , त्या देवतेशी एकरूप होवून जगावे लागते तर कुठे काहीतरी जीवनाची गाडी हलते .

सारखे काय मागत राहायचे . हे दे ते दे कधी संपणार आपल्या मागण्या ?? तो देणार आहे हा विश्वास मनात अभंग हवा आणि घेण्यासाठी संयम . हा संयम म्हणजेच शनी . सर्जरी करताना दोन सुया टोचल्या आपल्याला कि कुणाला काय काय बोललो आहोत , कसे दुसर्यांचे अपमान केले आहेत , कुणाचे पैसे दिले नाहीत सगळे आठवते आणि मग देव देव करायला लागतो , माफीनामे लिहितो ...काहीही उपयोग नाही त्याचा . मुळातच हे कर्म केलेच का? करताना नाही आठवला का देव. विचार करा ....आणि इतरानाही विचार करायला प्रवृत्त करा.

माणूस असो किंवा ग्रह मनासारखे झाले नाही कि थैमान घालायचे हा आपला मुलभूत स्वभाव आहे ज्याला शनी खो घालतो आणि म्हणतो देणारच नाही जा बस बोंबलत. पण हाच शनी जर काबाड कष्ट केलेत , संयमाने वागलात , माणसातील देव ओळखून माणुसकीने वागलात , पाठीचा कणा लवचीत ठेवलात म्हणजेच नतमस्तक झालात आणि सर्वात मुख्य मी मी मी चा पाढा सोसून साधनेत जीवन व्यतीत केलेत , चतुर्थ श्रेणीला मदत केली , धान्य , शिधा रोजच्या गरजेच्या वस्तू देवून एखाद्याच्या संसाराला मदतीचा हात पुढे केलात आणि मी केले मी दिले ह्याची वाच्यताहि नाही केली तर तो त्याच्याकडे मागायची वेळ आणतच नाही. छप्पर फाडके मिलेगा ..हे नक्की.

आपल्याला आज सगळे इंस्तंट हवे असते . पण ते आपले झाले. इंस्तंट देव कुठून आणणार ? तो त्याला हवे तेव्हाच देणार म्हणून संयम हवा. भौतिक सुखासाठी आसुसलेला माणूस देवाकडे धाव घ्यायला जरा उशीरच करतो कारण त्याचे महत्व दुक्ख गळ्याशी आल्याशिवाय कळत नाही. 

आपल्याला लहानपणापासून “ कराग्रे वसते लक्ष्मी ...” , “ गुरुब्रम्हा गुरुर्विष्णु ..” , ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ...”, ह्या सारखे श्लोक शिकवून आयुष्याला वळण देण्याचा प्रयत्न केला तो उगीच नाही . आपल्याला दिलेल्या दोन हातानी अपिरीमित कष्ट करावेत , चोरी करू नये आणि तशी बुद्धीही होवू नये ह्यासाठी परमार्थ आवश्यक आहे जीवनात . कुठल्या वाटेने जायचे ते साधने शिवाय कळत नाही . वाट चुकलेल्या वाटसरूला मार्ग दाखवण्याचे काम शेवटी त्यालाच करावे लागते .महाराजांना उसाने मारणाऱ्या पाटील मंडळीना समोर बसवून त्याच उसाचा रस चरख्या शिवाय हाताने पिळून काढून दिला तेव्हा त्यांच्या दैवी शक्तीची प्रचीती त्यांना ह्याच देही ह्याच डोळा आली आणि ते महाराजांच्या समोर नतमस्तक झाले. उगीच नाही पाटील वंशावर महाराजांचा वरदहस्त .

येत्या चैत्र गुढी पाडव्याला , हिंदूंच्या नव वर्षाच्या दिवशीच शनी महाराज आपला कुंभ राशीतील मुक्काम हलवून मीन राशीत आपले बस्तान ठोकणार आहेत . गुरूच्या राशीत शनी . साधना , परमार्थ , योग ह्यासाठी उत्तम. शनी काय करेल तिथे जावून ते करो आपण त्याच्यासाठी काय काय करू शकतो ते करुया. शनी कुठल्याही राशीत असला तरी आपण आपले कर्म शुद्ध सात्विक ठेवूया .

“ विनम्रता “ हा दागिना फार कमी लोकांकडे असतो इतका तो अनमोल आहे. शनीला तोच प्रिय आहे. जमणार आहे का आपल्याला विनम्र होण्यास. छे छे काहीतरीच . तोंडाचा पट्टा चालवणे , समोरच्या शाब्दिक चकमकी करून दुखावणे हे केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. तू कसा मूर्ख आणि मी किती शहाणा  हे आपल्या वाचेने आणि देहबोलीतून जोवर वारंवार प्रगट होत नाही तोवर दिवस जात नाही आमचा. कुणाला नामोहरम करणे , त्याच्या अपयशामुळे मन सुखावणे , सततचा मत्सर , द्वेष ह्यातच जन्म जाणार आहे का आमचा ? मग शनी ला दोष देण्यात काय अर्थ आहे. तुमचे कर्म तुमच्या हाती आहे. शनी ला कष्टकरी जनता आवडते म्हणून चतुर्थ श्रेणीचे प्रतिनिधित्व तो करतो, एखादा गरीब मजूर त्याच्या झोपडीत चार घास खावून कधी उपाशीपोटी पडल्या पडल्या झोपतो , त्याला डास चावत नाहीत ना त्याच्याकडे AC असतो. आम्ही AC लावून झोपतो पण तरीही आम्हाला झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात . पैसा सहज मिळतो , शांत झोप ती चांगल्या कर्माने मिळवावी लागते .अहो वर जाताना कुठे ती मनावरची जड जड ओझी घेवून जाणार , टाकून द्या ती इथेच आत्ताच अगदी ह्याच क्षणी . मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये अशी महाराजांची शिकवण आहे आपल्याला ती विसरायची नाही. 

पंचम भाव म्हणजे आपले पूर्व कर्म आणि नवम म्हणजे भाग्य जे पुढील जन्मीचे कर्म असणार आहे. आजचे नवम ते पुढील पंचम येतंय का लक्ष्यात ? 

आपली कुलस्वामिनी , इष्टगुरु  आणि त्याच सोबत शनी महाराज ह्यांची नित्य उपासना आयुष्यातील कठीण काळ सुद्धा पार करेल. अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे पण त्याचे अवडंबर नको , मी केले मी केले सोडून द्या तिथेच आपण अडकतो आणि मोक्ष बाजूलाच राहतो . त्याने सेवेची संधी दिली मी त्याच्यासमोर नतमस्तक आहे आणि दिलेल्या संधीचे सोने करीन  ह्याकडे मनाचा कल असला पाहिजे. 

साडेसाती , शनी दशा हे आपले गुरुकुल आहे. त्याचा त्रास कधी होईल जेव्हा आपली कर्म शुद्ध नसतील तेव्हा . अन्यथा शनी मित्र आहे तुमचा , बेस्ट बडी. जे जे हृदयाशी कवटाळून ठेवलं ते तो काढून तुम्हाला सर्व बंधनातून मुक्त करतो . म्हणूनच अनेकदा साडेसाती च्या काळात आपल्या डोक्यावरचे मातृ पितृ छत्र हरवते . चोवीस तास दिले आहेत देवाने , कुठे फालतू गोष्टीमध्ये अडकता . वेळ कुठे कसा घालवायचा हे गणित आपले आपल्यापाशी आहे. 

Choice is yours.... बरोबर ना? क्षणाचे आयुष्य आपले. सगळ्यांची तिकिटे काढली आहेत फक्त कधी जाणार ते माहित नाही, प्रत्येक क्षण परिपूर्ण जगा , आनंद घ्या आणि आनंद द्या . कश्याला कुत्सित बोलायचे , सतत टोमणे मारायचे....हेच सर्व परत शंबर पट अधिक होऊन येणार तुमच्याकडे .कुणाचा केलेला द्वेष त्याचे रुपांतर मोठ मोठ्या जागीच खिळवून ठेवणाऱ्या आजारपणा त होते ह्याची कल्पना तरी आहे का? 

शनीचे मन जिंकणे कठीण पण अशक्य नाही . तो अनेक संधी आपल्याला देत आहे ज्या आपल्याला आपल्या खोट्या अहंकारामुळे दिसत नाहीत . लहान लहान गोष्टीतील आनंद पण आपण गमावतो आहोत ते पोकळ बडेजाव केल्यामुळे.  आहात कोण तुम्ही ???? सतत आपला वरच्या पट्टीतील आवाज ? क्षणात बंद करतील ते आवाज लक्ष्यात असुदे. पैशाची घमेंड , शिक्षण , पैसा , मोठी घरे , ऐश्वर्य हे शेवटी त्यांनी दिले आहे आणि दिले तसे काढूनही घेतील. आणि घेतात , आपल्या चुका समजायला . माणूस अक्षरश एकटा राहतो कारण सर्व सुखाचे आगारु मनुष्य आहे आणि दुख्खात फक्त परमेश्वर . तोच आपला सोबती असतो आपल्या पडत्या काळात .

अहंकार यायला काहीही चालते आजकाल आपल्याला. त्यांच्या दृष्टीतून काहीच सुटत नाही आणि मग भोग आपल्या कर्माची फळे . सगळा माज साडेसातीत उतरतो , जे आवडते ते आपल्यापासून दूर होते , एकटे राहतो आपण मनाने आणि शरीरानेही तेव्हा उपरती होते पण वेळ निघून गेलेली असते. एकटेपणा आला कि आपण आपल्याशीच संवाद साधतो आणि तो आयुष्यातील सगळ्यात खरा संवाद असतो. आपलाच आपल्याशी केलेला. १६ आणे खरा . सोबतीचे महाव , माणसांचे महत्व शनी शिकवतो . एकटेपणा बोचतो कारण मनुष्य समाजप्रिय आहे एकता राहू शकत नाही . एकांत असेल तेव्हा मन शांत होते आणि स्वतःच्या चुका समजतात त्या स्वीकारताही येतात .स्वीकारल्यात तर शनीची कृपा होते नाहीतर आहेच मग पुढे भयाण भकास आयुष्य . मिळवलेले सर्व ओंजळीतून निघून जाणे म्हणजे शनी . 

शनी विलंबाचा कारक आहे . मृत्यू सुद्धा विलंबाने येतो , एका जागेवर खंगत ठेवतो , मृत्यू समोरच्याच्या डोळ्यात दिसतो पण येत नाही हि अवस्था कठीण असते. भूगर्भा खाली शनी आहे. तसेच कमरेखालील शरीराचा भाग विकलांग होणे , अर्धांगवायू , परालीसीस , गुडघे दुखी , संधिवात , हाडांची दुखणी , कोड , कफ , छातीत पाणी होणे ह्या सर्व गोष्टी शनीकडे आहेत . त्याच्या शिक्षा कठोर आहेत , जागेवर बसवून ठेवेल , हालचाल सुद्धा करू देणार नाही मग काय कराल ? आयुष्यभराचा धडा शिकवणाऱ्या शिक्षा करणारा हा न्यायाधीश आहे आणि त्याचा धाक आपल्याला असायलाच हवा. 

मीन राशीतील येणारा शनी काय फळे देयील ? ह्यासाठी आधी स्वतःच्या पत्रिकेतील शनी कुठे कसा किती अंशावर कुठल्या नक्षत्रात आहे ते पाहायला पाहिजे. मूळ शनीवरून होणार गोचर शनीचे भ्रमण हे संघर्ष देते असा अनुभव आहे.  हा काय सांगतो आणि तो काय सांगतो ह्यात वेळ वाया न घालावता मनापासून शनी च्या सेवेत दाखल व्हा , हनुमान चालीसा रोज कमीत कमी ७ वेळा म्हणा ...निश्चित फरक पडेल. पण म्हणणार कोण ? ज्यांना फटके खायचे नाहीत किंवा निदान त्याची तीव्रता कमी व्हायला हवी आहे ते आज पासून म्हणतील इतर ...कालाय तस्मै नमः 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

 

   


No comments:

Post a Comment