|| श्री स्वामी समर्थ ||
मंडळी एकदा एका मुलाने आई आलेली असताना दरवाजा उघडायला उशीर केला तेव्हा आई त्याच्यावर खूप चिडली. मोबाईल मध्ये डोके खुपसून बसला असेल , ऐकू आला नाही बेलचा आवाज ह्याला असे म्हंटल्यावर लगेच बाबा पण म्हणाले त्या दिवशी छत्री दुरुस्त करायला सांगितली गेला नाही , आतून आजी म्हणाली घराची सगळी शिस्त गेली आहे. तर थोडक्यात म्हणजे मुलाच्यातील सगळ्या दुर्गुणांचा पाढा एका सेकंदात वाचला गेला .
हाच मुलगा पण प्रसंग वेगळा . शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या अहो तुमचा मुलगा गुणी आहे त्याने मला आज रिक्षा करून दिली . परवा भाजीच्या पिशव्या पण घरी आणून दिल्या दमले होते मी म्हणून . लगेच आजी म्हणाली संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला कि सगळ्यांना नमस्कार करतो , गुणी आहे अगदी त्यावर बाबा ..मग मुलगा आहे कुणाचा . तर एका क्षणात त्या मुलातील सर्व चांगल्या गुणांचा अगदी पाऊस पडला .
आपण प्रत्येक प्रसंगात वेगवेगळे वागतो पण त्यावरून आपण चांगले कि वाईट ठरत नसते. बदलत जातो तो आपला दृष्टीकोण. विचार करा .पटतंय का?
मुलाने दरवाजा उघडायला उशीर केला त्यावेळी त्याचे चांगले गुण नाही आठवले का आपल्याला ? असे आहे सर्व .
ग्रहांचेही तसेच आहे . काही चांगले झाले कि शुक्र बुध , नोकरी मिळाली कि अहो तो छान बोलतो बुध छान आहे त्याचा. आयुष्यात काहीही अगदी बस ट्रेन चुकली कि खापर फोडायला एकमेव शनी आहेच कि . दिसेल त्या ग्रहाला धरून त्यावर ताशेरे मारायचे काम आपल्याला अगदी सहज जमते. बोलायला कुठे पैसे पडतात त्यामुळे आपले बोलत राहायचे. शनीला तर अगदी नावडत्या सुनेचा दर्जा दिलेला आहे. अनेकदा राहू दशा म्हणून नोकरी मिळालेली नाही म्हणून राहुला अगदी काळाकुट्ट अगदी वाईट करून टाकतो . पण नोकरी राहूमुळे नाही तर तुमची दशा पंचम किंवा ९ १२ ची आहे म्हणून नोकरी मिळत नाहीय . धनस्थान पैसा टिकून देत नाहीय अशी ग्रहस्थिती त्याला राहू काय करणार .
राहू शनी दिसले कि पकडा त्यांना आणि करा त्यांची धुलाई , बोल लावा त्यांना हे आता पुरे झाले नाही का? मनुष्य जसे चांगल्या वाईट गुणांचे मिश्रण आहे तसेच ग्रह सुद्धा त्यामुळे अपुरा अभ्यास आणि अर्धवट ज्ञानाने आपण आपले आणि इतरांचेही नुकसान करतो. ज्योतिष शिका आणि ज्ञानी व्हा परिपूर्ण सखोल अभ्यास करा पण उठ सुठ कुठेतरी काहीतरी वाचून निष्कर्ष काढू नका. शनीला दोष ठेवायचा अहो तोच घेवून गेलाय तुमच्या मुलाला सातासमुद्रापलीकडे नोकरीसाठी ते कसे विसरलात . पण चांगले झाले कि आमच्या मुलाचे कर्तुत्व आणि वाईट झाले कि पापग्रह .
कर्तुत्व अनेकांच्या मध्ये आहे पण परदेशी फार थोडेच जातात कारण शनी किंवा राहू किंवा अजून कुठल्या ग्रहाची कृपा होते म्हणून . तेव्हा त्या ग्रहाचे राज्य मान्य करा .
मनुष्य हे सर्व गुण अवगुणांचे रसायन आहे अगदी तसेच ग्रह सुद्धा , त्या दशेत , स्थितीत राशीत इतर ग्रहांच्या गोचर भ्रमणात ग्रह नेहमीच वेगवेगळी फळे देतात . ते अनुकूल असतात तेव्हा ते आपले आवडते होतात आणि आपल्या मनासारखे झाले नाही कि आपण त्यांना नावे ठेवायला मोकळे.
खरतर ग्रह काहीच करत नाहीत . ते ओळखतात का कोण कुलकर्णी , साठे , आपटे आहेत त्यांना ? नाही . ते ओळखतात ती फक्त आपली कर्म आणि त्यानुसार ते फळे देण्यास बांधील असतात . ते त्यांचे काम विनम्रतेने , निमुटपणे करतात . आता इतके ज्ञानामृत मिळाल्यावर तरी सोच बदलो... पटतंय का???
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment