Thursday, 29 May 2025

पुनर्वसु नक्षत्र –देणे माहित आहे घेणे माहित नाही .

 || श्री स्वामी समर्थ ||


ह्या वर्षातील पुनर्वसु नक्षत्राच्या सर्व तारखा लेखाच्या अंती दिलेल्या आहेत त्याचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. 


श्रीरामाचा जन्म हा पुनर्वसु नक्षत्रावर झालेला आहे. ह्या नक्षत्राची ओतप्रोत वैशिष्ठे श्री रामात सातत्याने पाहायला मिळतात .मिथुन राशीत १० अंशात विस्तारलेले असून कर्क राशीत 3 अंश 20 कला एक चरण आहे. गुरु आणि रवीची नक्षत्रे त्रिपाद आहे. रविचे नक्षत्राचे प्रथम पाद अग्नितत्वाच्या राशीत असून शेवटचे ३ चरण पृथ्वीतत्वाच्या राशीत आहेत . गुरुचे ३ चरण वायुतत्वाच्या राशीत असून शेवटचा पाद हा जल तत्वाच्या राशीत आहे.  गुरु हा आकाशतत्वाचा ग्रह आहे. आकाशाचे मोजमाप करता येत नाही .

आकाश म्हणजे एक पोकळी ज्याला आपण स्पेस म्हणतो. मला माझी स्पेस हवी आहे असे आजकाल जो तो म्हणत असतो . आकाश इतके असीम आहे अमर्याद आहे .आकाश हे पाण्यात मिसळलेले दिसते . आकाश कधी पाण्यात तर भूमीवर टेकलेले दिसते  आणि तिथे संपलेले दिसते . गुरु ह्या शब्दातच गुरुतत्व आहे. ह्या नक्षत्राचा स्वामी गुरूच आहे. 

गुरु म्हंटले कि ज्ञानाचे विद्वत्तेचे तेज . गुरु म्हंटले कि सुशील ज्ञानी देणारा शांत सुस्वभावी सगळ्यांचा विचार करत जीवनात पाऊल टाकणारी गुरुतुल्य व्यक्ती . ह्या सर्व गुणांची रेलचेल ह्यात असणारच . पुनर्वसु हे गुरुचे पहिले नक्षत्र देवगणी आहे. विशाखा हि आकाशातील वीज आहे आणि पूर्वा भाद्रपदा हे सुद्धा पुनर्वसु ची बरोबरी करू शकणार नाही. 

नक्षत्राची देवता अदिती आहे ती आदिशक्ती आहे जगन्माता आहे. ती सर्वांची माता आहे. अदिती म्हणजे न भंग पावणारी न तुटणारी आहे. निश्चल अखंड विशाल विस्तृत अश्या प्रकारचे प्रेम म्हणजे अदिती म्हणजे माता आणि माताच देवू शकते . अदिती सोशिक सहनशील स्वतः त्रास सहन करणारी गुरु तत्वाची देवता आहे. अदिती हि देण्याच्या मनोवृत्तीची आहे. 

पुनर्वसू ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाची मनोवृत्ती कशी असेल . ह्या नक्षत्रात विश्वव्यापकता आहे. मनापासून देण्याची वृत्ती आहे. दया ओलावा आहे. जेजे आपल्याशी ठावे तेते दुसर्याशी द्यावे शहाणे करून सोडावे सकलजन . हे साधेभोळे आहे. कृत्रिमता नाही. विचार वागणे स्वछ्य आहे.  नैसर्गिक सौंदर्याची आवड आहे मेकअप करणार नाहीत . सुशीलता ,  मांगल्याचे पावित्र्याचे सौंदर्य इथे आहे.  कृत्रिम काहीच नाही तर originality आहे. 

ह्या नक्षत्राचे ३ चरण बुधाच्या आणि १ चरण चंद्राच्या राशीत आहे. कर्क राशीमध्ये येणारे पुनर्वसुचे चौथे चरण पुष्कर योगात आहे . गुरु तत्वाचे नक्षत्र आणि चंद्राची रास आहे. पहिले ३ चरण हे बुधाच्या नक्षत्रात येतात . नक्षत्र बुधाचे म्हणू बुध ,वायू तत्वाची रास आहे. वायुगतीचा ह्या नक्षत्रावर परिणाम दिसतो. स्वामी बुध नक्षत्र गुरुचे , देवता अदिती , पुष्कर योग आहे. बुधाची बुद्धिमत्ता चलाख पणा ,त्याशिवाय तो व्यापारी होऊ शकत नाही , बुद्धिमान आहे. 

ह्या नक्षत्रात गुरूचे ज्ञान आणि जोडीला बुधाची बुद्धी आहे .  माता अदिती देवता आहे. मेष वृषभ मिथुन हे चरण स्वामी आहेत . राशी बुधाची नक्षत्र गुरुचे चरण मेषेचे वृषभ मिथूनेचे. योनी मार्जार आहे . मांजर कसेही पडले तरी पटकन उडी मारून उभे राहते तशीच वृत्ती ह्या लोकांचीही असते , काहीही संकटे आली तरी त्यातून उडी मारून पूर्वपदाला येतात , मार्ग काढतात .

पहिल्या ३ चरणावर बुधाने शिक्का मारला आहे आणि चौथ्या चरणावर चंद्राचा सहवास मिळाला आहे. माणूस भावनेच्या आहारी जातो तेव्हा तो फक्त भावनेत डूबतो.

रामाचा जन्म पुनर्वसू च्या चवथ्या चरणात झालेला आहे. गुरुतत्व म्हणजे देण्याची मनोवृत्ती . घेणे माहित नाही .पुनर्वसू नक्षत्राला देणे माहित आहे घेणे नाही हे महत्वाचे आहे .

वेळू म्हणजे बांबू वृक्ष हे त्याचे प्रतिक आहे. कृष्णाने बांबूची बासरी केली आणि त्यातून उमटणारे स्वर त्या क्षिद्रातून सर्वत्र जातात .बांबू हि वनस्पती पाण्यासारखी आहे. बासरीत जे सूर भरू ते ती प्रगट  करील. आकाशतत्वाची हि वनस्पती आहे. अदिती आणि गुरु सुद्धा स्वागत आदरातिथ्य करणारे आहे. जिथे देण्याला वाव आहे divotion आहे तिथे असतात . देताना घडवणे आणि शिकवणे हे वैशिष्ठ आहे. आई काय करते सदैव देते ,तशीच अदिती माता आहे आणि तश्याच मुलांना जन्म दिला आणि त्यांना घडवले.

बुधाचे बौद्धिक तेज , गुरूच्या सात्विक मनोवृत्तीचे आणि अदितीचा मातृत्व भाव बुधाच्या पहिल्या ३ चरणातून प्रगट होते.  चौथे चरण राशी स्वामी चंद्र इतरांच्या सुखासाठी काम करतो कारण हि चर राशी आहे सारखी फिरत असते. जीवनात चढ उतार असतातच . परिणामांचे भोग भोगायला लावतो. 

पुनर्वसू म्हणजे पुन्हा पुन्हा वसवणे ,स्थापन करणे.  श्री रामाचे चौथे चरण होते गुरुचे , वर्गोत्तम नवमांश पुष्कर नवमांश होता आणि तरीही लग्नात लग्नेश होता रामाचे जीवन इतके कष्टप्रद दुक्खमय होते. 

हे गुरुचे नक्षत्र आहे . निसर्ग कुंडलीत गुरु भाग्याचा कारक आहे. बहुप्रसव असून अत्यंत सन्मानित असे हे नक्षत्र आहे. गुरूच्या सर्व वैशिष्ठ्यांचे मूल्य ह्यात आपल्याला जाणवते. मेष राशीचा नवमांश पुनर्वसू नक्षत्रात मंगळ आणि बुधाची जोड गणितज्ञ आणि त्यावर गुरुचे वर्चस्व . अशी माणसे व्यवहारी असतात ,गणित उत्तम असते .मातृत्वाची जाणीव असते . तपाचरणी असतात . निष्ठावान कर्तव्यनिष्ठ असतट , देणे माहित असते पण शांत असतात . रागवत नाहीत . निंदा करणारे स्तुती करणारे सगळे त्यांना आवडतात . व्यवहारी असतात बुधाच्या राशीत असतो. एखाद्या ज्ञानपीठाचे ते उपासक असतात . व्यापाराचे ज्ञान असते. मिथुन राशी हि बडबडी आहे. मेष राशी गुरुचे नक्षत्र आणि आदिती सारख्या देवतेचा वरदहस्त अत्यंत devotional व्यक्तिमत्व . मेष राशीत असणारे प्रथम चरण जरा तापट व्यक्तिमत्वाचे पण मंगळ आणि गुरु आहेत त्यामुळे इलेक्ट्रोनिक इंजीनियर, बँकेत काम करणारे गणित उत्तम असते. 


कुटुंबवत्सल असतात . ह्या नक्षत्राला इतर पापग्रहांची मिठी पडायला नको . त्यांनी ह्या नक्षत्रात आपले पाय पसरले तर ह्या लोकांना कुबुद्धी आणि कुमार्गाचा स्पर्श होतो.  जीवन जगायचे असेल तर जीवन त्यांना कळले हो मी पण पापग्रह आले तर जीवन प्राजक्त फुलापरी गळले हो.

बुधाजवळ अग्नितत्वा जवळ अहंकार आहे घमेंड आहे. इतरांना मी काय समजतो मी श्रेष्ठ आहे. मेष नवमांशातील लोक अहंकारी असतात ,करून दाखवीन अशी वृत्ती आहे. 

मंगळाच्या संपर्कात आलेला गुरु शुभ फळे देत नाही असे पाराशरीनी सांगितले आहे. एखाद्या मुलीच्या जिवनाची सेसेहोलपट थांबवायची असेल तर बुध आणि मेषेचे गुण लक्ष्यात ठेवून विवाह करावा लागेल.

पहिले चरण आव्हानात्मक आहे. करायचे आहे पण होत नाही अश्या अनेक गोष्टी प्रथम चरणात आढळतात . द्वितीय चरणात शुक्राचे नक्षत्र . हळूहळू भौतिक जगाकडे शुक्राचा कल जातो .ह्या राशीत येणारा ग्रह बुध शुक्र आणि गुरु ह्यांचे एकत्र जोड आहे. मंत्र विद्येचा कारक . शुक्राची कठोर परिश्रम करण्याची वृत्ती नाही जी प्रथम चरणात मंगळाची आहे. शुक्र हा गाद्यांवर लोळणारा ग्रह आहे ऐशोआरामात राहणारा आहे. पण हे गुरुचे नक्षत्र आहे त्यामुळे सत्शील मनोवृत्ती आणि निष्पाप असणारे कृत्य आहे. 

तिसर्या चरणात मिथुन नवमांश आहे. वायू तत्वाच्या राशीत वायू तत्वाचा किंवा आकाश तत्वाचा ग्रह म्हणजे नैसर्गिक कुंडलीतून मिळणारे फायदे .अलीकडे ग्रहांची भ्रमणे आणि त्यातून होणारी विनाशाची सूत्रे पृथ्वीवर घडताना दिसतात . दुसर्या चरणात स्वार्थ सुटत नाही. स्वतःच्या गरजा पूर्ण करून मग दुसर्याला देण्याची मनोवृत्ती आहे, शुक्राची वृषभ रास हि भौतिक सुखाची रास भौतिक जगाशी निगडीत आहे. बुध मित्र आहे शुक्राचा .अदिती देवता जरी असली तरी ऐशोआराम मजा मस्ती  सर्व आहे. 

पुनर्वसू नक्षत्र म्हणजे देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे .अश्या स्वभावाचे म्हंटले तर वावगे ठरू नये.

देण्याची वृत्ती अधिक आहे. गुरुचे नक्षत्र आहे आणि पहिले १० अंश बुधाच्या राशीत आहेत . बुध थोडा मिश्कील खोडकर बुद्धिमान पण टोपी बदलणारा ,लबाड आहे . योग्य वेळेला काय करायचे ह्याची चलाखी पण त्याच्याकडे आहे. बुध आणि गुरूचा संगम ज्ञान आणि बुद्धी . एखादे महत्वाचे कार्य करायचे असेल आणि मतभेद होणारे लोक एकत्र आले तरी सूर जुळवून त्या कार्याची यशस्विता साधण्याचे गमक निर्माण होते. ज्ञानी माणसे अंतर्मनाने एकमेकांचा आदर करतात . आपुलकी असते आतून . बुधाबद्दल तिरस्कार वाटत असला तरी त्याचे सौंदर्य मोहकपणा हे गुरूला भावला आणि त्याने बुधाला आपलेसे केले. गुरु हा ग्रहच असा आहे कि गुरु ह्या शब्दातच त्याचे गुरुत्व साठलेले आहे. गुरुचे हे पहिले नक्षत्र आहे . दुसर्याला आनंद देणारे आणि पुन्हा पुन्हा तेच काम करणारे.

कर्णाचे  व्यक्तिमत्व आहे. दानशूर आहे. देण्याची वृत्ती आहे. देवता आदिती आहे तिच्या मात्वृत्वाची भावना जास्ती आहे. गुरुतत्व असून चालणार नाही पण त्यात असलेला सखोलतेच किंवा विस्तृत शक्तीचा भाग समजून घ्यायला पाहिजे.म्हणून पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये अनेक गुण आहेत पण कुठल्या वेळेला कुठल्या गुणांचा वापर करून व्यक्तिमत्वाची समृद्धता वाढवायची ह्यासाठी गुरु तत्वाच्या व्यक्तीचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.योग्य दिशा दाखवणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणूस भरकटत राहतो.  वाल्मिकी ऋषींच्या अंगी जी क्रूरता होती त्याचप्रमाणे त्यांच्या अंगी चिकाटी , जिद्द सहनशीलता , श्रद्धा आत्मविश्वास संयम होता म्हणून नारदासारखा गुरु मिळाला आणि म्हणून त्याचेही एखादे पुनर्वसू नक्षत्र असेल म्हणून अत्यंत निष्ठेने राम हा शब्द माहित नसूनही मरा  मरा म्हणून आपल्या जीवनाची पूर्तता केली. 

अश्या प्रकारे एका खालच्या स्थरातून तो उच्च कोटीच्या स्थरापर्यंत जाऊन पोहोचला. पुनर्वसू नक्षत्रातील लोकांना हि गोष्ट सहज साध्य होण्यासारखी आहे. समाज सेवेत सुद्धा कार्य करणारे महान व्यक्तिमत्व ह्यात आहेत . देणे हे ज्या नक्षत्राला माहित आहे ते नक्षत्र त्या व्यक्ती मत्वाला उंचीवर घेवून जावे. 

ह्या जगात आपण आलेलो आहोत तर जे आपल्या व्यक्तिमत्वातील देता येयील ते द्यावे. अमर व्हायचे असेल तर देता यायला हवे.  ज्ञान द्या सेवा द्या विचार द्या . अंतकरणातले प्रेम द्या.  कुणाचेही कल्याण करा .पुनर्वसू नक्षत्र आदिती ह्या देवतेकडे गेले आहे. अदितीची श्रद्धा पुत्र साठी केलेली तपश्चर्या , संयम , सारासार विचार , धार्मिकतेचा सुगंध , प्रत्येक गोष्टीच्या निर्मिती मागे असलेली तत्वज्ञानाची बैठक तिच्यात आहे. ती देवांची पुत्री आहे तिने देव निर्माण केला म्हणजेच पुनर्वसू. फुल गळते बीज तयार होते आणि त्यातून असंख्य वृक्ष पुन्हा तयार होतात . 

म्हणूनच एखाद्या कार्याची पुनरावृत्ती जर आपल्याला हवी असेल तर जसे गाडी घेणे भाषण देणे , घर घेणे . गुरुचे हे पहिले नक्षत्र ,मोहक आकर्षक आणि सर्वांसाठी हितकारक आहे. देवगणी नक्षत्र आहे. विशाखा  पूर्वाभाद्रपदा ह्या तुलनेने कमी पडतात . प्रत्येक नक्षत्राच्या अंतकरणात जावून त्याचे काय स्वरूप आहे ते समजून घेतले पाहिजे त्याशिवाय त्याला आपण वाईट म्हणून शकत नाही. 

गुरु हि व्यक्ती नाही तर हे एक तत्व आहे. तत्त्वातून व्यक्तिमत्व निर्माण झाले. इतके मोठे अंतरीक्ष त्याने कवेत घेतले आहे त्याचा तो राजा आहे गुरु . 

गुरु तत्वाच्या नजरेतून जगाकडे बघू तेव्हा मनोरम असे शांत व्यक्तिमत्व दिसेल.  बुधाच्या राशीतील हे ३ चरण अतिशय बुद्धिमान आहेत . वेगवेगळे शोध लावणे. ग्रह्परत्वे, ग्रहांच्या दृष्टी प्रमाणे त्यात वेगवेगळे पदर उलगडले जातात हे निश्चित. मोठ्या विस्तृत प्रमाणात एक नक्षत्र किंवा ग्रह पूर्ण फलित देवू शकत नाही त्याला इतरांचीही साथ असावी लागते.  ह्याला इतरांनी चांगली साथ दिली तर त्याचे गुणांना प्रकाशाचे वलय प्राप्त होईल.

ज्यांच्याकडे हे नक्षत्र आहे त्यांची स्मरणशक्ती तीव्र आहे. अश्या लोकांच्या वयाला बुद्धीचे बंधन नाही . ३ वर्षाची मुलगी गीता पाठ म्हणून दाखवते. उत्तम स्मरणशक्तीला दिलेला गुरूचा आशीर्वाद . ह्या नक्षत्राचे वैभव किती मोठे आहे बघा . व्यावहारीकता असली तरी दुसर्यासाठी झिजणे हि गोष्ट इथे आहे. हे अमर्याद आहे त्याला बंधन नाही चौकटी नाही सिमाविहीन आहे. अनंत हस्ताने देणारे हे नक्षत्र आहे. अशी माणसे भारतात किती होवून गेली .संत एकनाथ तुकाराम हे गुरुतत्वाचे आहेत. 

ह्या नक्षत्राला आत्म्याचे नक्षत्र म्हंटले जाते. गुरु आणि गोविंद दोन्ही खडे आहेत मी प्रथम कुणाला नमस्कार करू. प्रत्यक्ष गोविंद सांगतो कि गुरूला नमस्कार कर कारण तोच तुला घडवणार आहे.

तोच तुला माझ्यापर्यंत कसे यायचे ह्याची वाट दाखवणारा आहे म्हणजे तू पटकन माझ्यापर्यंत येशील नाहीतर आधांतरी राहशील. किती मोठी उदात्त भावना आहे हि. म्हणूनच गुरुचे नक्षत्र हे आत्म्याचे ,मोक्षाचे नक्षत्र आहे कारण आत्म्याच्या मधूनच वाट जाते ती पारलौकिक जगापर्यंत देव तत्वापर्यंत , गोविंदापर्यंत . हे नक्षत्र प्राप्त झाले तर देवाची कृपा समजा. 

वेळू हि वनस्पती दिली आहे. वेळू हा गरिबांची झोपडी बांधायला उपयोगी येणारा तर जाताना आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली साथ देणारा . गुढ्या तोरणे बांधणारा ,गरीब आणि श्रीमंत सर्वांसाठी कृपाछत्र धरणारा असा हा वृक्ष आहे. वेळू हा वृक्ष हा दिला आहे वाढतो किती उंच त्याला खात पाणी लागत नाही एकदा लावला कि वाढत जातो आभाळाला स्पर्श करायची त्याची मनोकामना असते.  पुनर्वसू नक्षत्राची लोक अशीच असतात त्यांना ना कुणाचे प्रेम हवे ना कुणाची स्तुती नाही मिळाली तरी रडत बसणारी माणसे नाहीत . स्वतःच्या व्यक्तिमत्वाची उंची हि स्वतःच्या कर्तुत्वाने अशी आभाळाला स्पर्श करण्याची त्यांच्या ह्या नक्षत्राच्या गुणांमुळे ताकद असते .

हि माणसे कुणाची निंदा नालस्ती करत नाहीत ,हर्ष उल्हासित होत नाहीत. जो आवडतो सर्वाना तो आवडे देवाला. हाच आहे पुनर्वसू नक्षत्राचा देवदूत आहे. परमेश्वर म्हणजे काय ? जी दिसत नाही तो कसला देव . मग कश्याला देव मानायचा आम्ही मानीत . हे तत्व आहे माणुसकीचे उद्धाराचे , चांगुलपणाचे आणि तोच आहे देव आणि तेच आहे पुनर्वसू नक्षत्र आहे. ज्याच्याकडे आले आहे तो समृद्धता घेवून आला आहे ,लक्ष्मी घेवून आला आहे. कर्क राशीत एक चरण वर्गोत्तम होवून पुष्कर नक्षत्रात गेले आहे. ह्या २ पदांना वर्गोत्तम होण्याचा मान मिळाला आहे. तिसरे पद मिथुनेत आणि चौथे पद पुष्कर नवमांशात कर्केत वर्गोत्तम आहे. कुठल्याही नक्षत्राला हा बहुमान मिळाला नाही.

उत्तम बुद्धीने लेखन करून उत्तम उत्कृष्ट साहित्य निर्माण करणारे ज्ञानी लोक कवी साहित्यिक आहेत. साहित्य निर्माण करणारे ज्ञानी लोक आहेत .  उत्त्पन्न निर्माण करून सृजनशीलता  , सहनशीलता निर्माण करणारे लोक इथे आहेत .ज्याला मुले होत नाहीत त्यांना अपत्य होत नाही त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरवात ह्या नक्षत्रावर करायला हरकत नाही. पुनर्वसू नक्षत्र हे देणारे आहे ,अपत्य प्राप्तीचे आहे. समतेचा भाव आणि आनंदाचा परमोत्कर्ष देणारे हे नक्षत्र आहे. 

चंद्रभागेच्या वाळवंटात भागवत धर्माची पताका फडकवणारे 18 पगड जातीचे लोक एकत्र आले आणि माऊलींचा गजर करू लागले. मुक्ताबाई होती ज्ञानेश्वर होते गोरा कुंभार , सावतामाळी , पितांबर शिंपी , जनाबाई होती, कान्होपात्रा होती.हे सर्व एकत्र एकाच धाग्याने बांधले होते हे आहे पुनर्वसू नक्षत्र . देणे आणि समतेचा भाव असणारे . हि आहे पुनर्वसू नक्षत्राची खरी थीम.हे त्याचे खरे अंतकरण.हि आहे प्रेमाच्या उत्पन्नाची शक्ती हि आहे एक एकमेकाच्या आदराची आणि एकमेकासाठी समर्पित भावना निर्माण करणारी शक्ती. इतके सुंदर नक्षत्र मानवतेच्या जागी जगणारे नक्षत्र मिळाले तर स्वतःला धान्य मानायला हरकत नाही.

इथे मांजरीचे प्रतिक आहे हे चर नक्षत्र आहे. मांजर कशी आहे जो विनाश करतो धनधान्याची वाट लावतो त्याचा विनाश करणारी आहे. समाजात वाईट कृत्य करून समाजाचा विनाश करणारी जी लोक आहेत त्यांचा विनाश करणारी लोक इथे आहेत . गुरुतत्व आहे . इथे पापग्रह असतील तर दुर्घटना घडेल.

वसुदेव कुटुंबकम ह्या भावनेने प्रेरित झालेले हे गुरुतत्व.अंतकर्णातून समाज घडवणे हे पुनर्वसू आहे. हे नक्षत्र म्हणजे दया क्षमा शांती अध्यात्माचा धागा , ज्ञान ग्रहण करून ज्ञान देण्याची वृत्ती.  प्रबोधनकार कीर्तनकार हे ह्या नक्षत्राचे आहेत . बुधाच्या नवमांशाला विचक्षनांश म्हंटले आहे म्हणजे अति बुद्धिमान .

इथे मुख्य गुरु आहे. एखादा अवयव वाढणे , गाठी वाढणे. जिथे वाढ होत असेल तिथे गुरूचा प्रभाव असतो. कावीळ होणे. घशाचे विकार कफ होणे नुमोनिया होणे फुफुसाचे विकार होणे. tonsil सुजणे. हे नक्षत्र बिघडले तर हे आजार होतात. पापग्रहाच्या सोबत , पाप ग्रहांच्या दृष्टीत हे आजार विकार उत्पन्न होतात. 

संगती संग दोषेण. पुनर्वसू नक्षत्राचे उत्तम फळ मिळण्यासाठी महादेवाची सेवा करावी. जप करावा. हे लोक अंतर्स्फुर्तीने बोलतात त्यांना ६थ सेन्स असतो.ते बोललेले खरे होते. 

पुनर्वसू नक्षत्र पुन्हा वसणे , ह्या नक्षत्रावर केलेली एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होते म्हणूनच आयुष्यात आनंद देणाऱ्या घटना ज्या पुन्हा अनुभवायला आवडतील जसे घर खरेदी , परदेशगमन , वास्तू , वाहन , जमीन विकत घेणे , दागिने , FD करणे ह्या गोष्टी ह्या नक्षत्रावर कराव्यात ज्या पुन्हा पुन्हा होतील . विवाहाला हे नक्षत्र वर्जित आहे . विवाह म्हणजे शुक्र आणि गुरु अध्यात्म मोक्ष त्यामुळे ह्या नक्षत्रावर विवाह करू नये . एखादी सर्जरी केली तर पुन्हा होईल म्हणून तीही करू नये. 

२०२५ सालातील पुनर्वसू नक्षत्र ज्या दिवशी आहे त्यांचे दिवस वेळ देत आहे म्हणजे त्या दिवसाचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करू शकता जसे एखादा संकल्प करणे , दानधर्म करणे , घर वाहन दागिने खरेदी वगैरे .

२९ मे- रात्री १०.३८ ते ३० मे रात्री ९.२८ पर्यंत २६ 

२६ जून – सकाळी ८.४६ ते २७ जून सकाळी ७.२१ पर्यंत 

२३ जुलै  - संध्याकाळी ५.५४ ते २४ जुलै संध्याकाळी ४.४३ पर्यंत 

२० ऑगस्ट -  पहाटे १.०७ ते २२ ऑगस्ट १२.२७ ( मध्यरात्री ) पर्यंत 

१६ सप्टेंबर  - सकाळी ६.४६ ते १७ सप्टेंबर सकाळी ६.२५ पर्यंत 

१३ ऑक्टोबर - दुपारी १२.२६ ते १४ ऑक्टोबर सकाळी ११.५३ पर्यंत  

९ नोव्हेंबर  रात्री ८.०४ ते १० नोव्हेंबर संध्याकाळी ६.४७ पर्यंत 

७ डिसेंबर  सकाळी ६.१३ ते ८ डिसेंबर  पहाटे४.११ पर्यंत

पुनर्वसू ह्या गुरूच्या शुभ पवित्र नक्षत्रावर आपल्या कुलस्वामिनी , सद्गुरू , इष्ट देवतेचे नामस्मरण सुरु करावे म्हणजे ते पुन्हा पुन्हा होत राहील. कुठल्याही शुभ गोष्टी वृद्धिंगत व्हाव्यात हीच सदिछ्या . 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


  


No comments:

Post a Comment