Wednesday, 7 January 2026

प्रणयाचे वारे जेव्हा वाहू लागतात....

 || श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष हे प्रचीती देणारे शास्त्र आहे . अनुभव मिळाला कि अभ्यास आणि विश्वास दोन्हीही वृद्धिंगत होतो. आज राहूचे शततारका नक्षत्र आहे . त्या दोघांना विवाह करायचा होता म्हणून आज समोर पत्रिका आल्या . दोन्ही बघून त्यांना पहिलाच प्रश्न विचारला आपले आपले जमवले कि काय शुक्र राहू युती दोघांच्याही पत्रिकेत प्रणयाचे संकेत देत होती . इतकेच नाही ते प्रेम वयातील बराच मोठा फरक सुद्धा पार करू पाहत होती. 

मुलगा संस्कारित पण अजूनही विवाह योग नव्हता पण मुलगी वयाने खूप लहान असूनही त्यांचे जमले. जमले म्हणजे काय जमले तर हे निव्वळ आकर्षण दुसरे काहीही नाही. मुलाच्या मनात ह्याबद्दल भीती शंका कुटुंबाचा विचार होता हे पाहून मला खरतर बरे वाटले. तिला मंगळ आणि त्यात शनीचा प्रतियोग . मी म्हंटले हि जराजराश्या कारणाने हि चिडणार आणि भरपूर अपेक्षा घेवून येणारे हे प्रेम क्षणात रौद्ररूप धारण करणार ह्यात शंकाच नाही. दोघांचीही लग्ने भिन्न. मुलीचे कुटुंब आणि सुखस्थान दोन्ही बिघडलेले . मुलीला मंगळ आणि मुलाला नाही . त्यात भर म्हणून शुक्र राहू अंशात्मक युती . मुलाच्याही पत्रिकेत अंशात्मक शुक्र राहू युती त्यात शुक्र अस्तंगत .

प्रेमात सगळे माफ असते ह्या युक्तीला धरून वयातील फरक त्यांच्या प्रेमात पडलेल्या दृष्टीने दृष्टीआड केला होता ते समजले. मुलगा जितका विचारी तितकीच ती अल्लड आणि समंजस पणा कोसो दूर असणारी . 

शुक्र राहू प्रणयाची आसक्ती देते पण अनेकदा समोरच्या कडून फसवणूक सुद्धा . असो फार खोलात न शिरता मी त्यांना म्हंटले अहो इतक्या अल्लड वयाचा मोठा फरक आहे . तुम्ही स्वतःही तापट आहात कसे होणार पुढे. गुण सुद्धा जुळत नव्हते. म्हंटले पुढील वर्षी तुमचा विवाहाचा योग नक्की आहे पण हे प्रकरण पुढे घेवून जबू नका . इथे सोयरिक झाली तर कुठून लग्न केले असे होणार त्यामुळे कुटुंबाला सुद्धा त्रास मतभेत . कश्याला ओढवून घेता संकटे . ह्यावर जितक्या लवकर पूर्णविराम देता येयील ते बघा आणि कोरी पाटी करून पुढे जा . पुढील वर्षी तुमचा विवाह योग नक्कीच आहे. शनी सुद्धा आता मार्गी आहे. जिथे सुरवाती पासून मन साशंक आहे तिथे पुढे काय होणार . असो.

विवाह हा सुखासाठी असो , आयुष्याचे ते एक आनंदाचे पान आहे पण पुढे ते पानच फाटले तर काय . म्हणून प्रत्येक गोष्टीचे निराकरण आधीच झाले पाहिजे . वयातील मोठा फरक, आणि एकंदरीत पत्रिका पाहून हे प्रेम नसून आकर्षण आणि क्षणिक भूल होती हे स्पष्टच दिसत होते . प्रेमाचे वारे वाहू लागतात तसे तेच वारे पुढे कुठे उडून जातील दिशाहीन होतील सांगता येणार नाही.

प्रेमाची भावना त्याग पण करायला शिकवते . ती असेल तर संसार टिकवण्या मागे कल असतो. संसारात वाद असतात पण ते पेल्यातील असावे , संसार मोडणारे नसावेत आणि म्हणूनच त्याला मनाची परिपक्वता लागते जी ह्या मुलीत येणार कुठून .काही दिवसातच आकर्षण संपून जायील जेव्हा खर्या संसाराला सुरवात होईल आणि मग स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप करायची वेळ येयील . काही दिवसात हे विसरून जायला होयील हे नक्की कारण मुळातच हे आकर्षण आहे. असो.

राहूची ताकद प्रचंड असते , त्याचे आकर्षण सुद्धा तितक्याच ताकदीचे असते मती गुंग होते आणि विचारांची कवाडे बंद होतात . आज राहुचेच नक्षत्र आहे आणि राहू शुक्र रुलिंग ला आहेत . वैवाहिक सुखाचा शुक्र राहूच्या अंशात्मक युतीत दोघांच्याही पत्रिकेत आहे. 

कुणी कितीही काहीही म्हणा हे दैवी शास्त्र आहे जे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आहे. त्याचा योग्य वेळी केलेला उपयोग आनंदाची अनेक दालने उघडून देतो . तुमचा विश्वास आहे कि नाही ह्यावर ग्रहतारे आकाशात नाहीत त्यांना तुमच्या विश्वासाशी काहीही घेणे देणे नाही ते त्यांचे काम करतात म्हणजेच तुमच्याच कर्माची चांगली वाईट फळे तुमच्या पदरात टाकतात .

आज एक विवाह आणि दोन आयुष्य वाचवण्याचा मनापासून प्रयत्न केला . पोटतिडकीने त्यांना समजावून सांगितले . शेवटी ज्योतिषी हा पण माणूस आहे आणि पत्रिका नेहमी तळमळीने सदिच्छेने पाहाव्या असे वाटते . 

स्वामींच्या फोटोकडे पाहिले आणि म्हंटले आता तुम्हीच त्यांना चांगली बुद्धी द्या .

शुभं भवतु 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

No comments:

Post a Comment