Monday, 14 July 2025

फक्त एक निम्मित्त ( राहूची खेळी यशस्वी झाली )

 || श्री स्वामी समर्थ ||


एक विचित्र घटना एका कुटुंबात घडली . अनेक वर्षाचा संसार अपत्य काहीच कमतरता नाही. आता नवरा बायको मध्ये वाद हे कधीतरी होणारच आणि ते झाले कि सुख अजून वाढतेच. पण घरातील स्त्रीला घरात काहीतरी एक गोष्ट अचानक समजली ज्याच्याबद्दल तिला पुसटशी माहिती नव्हती . ह्याबद्दल इथे अधिक लिहिणे उचित होणार नाही म्हणून लिहिता येत नाही . पण ते महत्वाचे नसून महत्वाचे हे आहे कि ती घर सोडून गेली .राहूची खेळी यशस्वी झाली .

पत्रिका पाहिल्यावर काय दिसले असेल ते तुमच्या लक्ष्यात आलेच असेल. गैरसमजाचे आणि मनात शंका आणि संशयाचे वादळ निर्माण करणारा “ राहू “ पत्रिकेत चांगलाच active होता त्यात दशा राहुचीच पूरक होती . इतक्या वर्षाचा संसार क्षणात मोडायची वेळ आली तर काय चित्र असेल ह्याची कल्पना करता येणार नाही . राहू ची दशा अजून बरीच वर्षाची आहे असे दिसले. राहूच्या दशेत झालेले नाते संबंधातील गैरसमज हे उग्र स्वरूप धारण करतात आणि राहू ते गैरसमज तसेच ठेवून त्यांच्यातील दुरावा कायम ठेवण्यात माहीर आहे. 


राहू हा बेमालूम फसवणारा आहे तुम्हाला काहीही कळायच्या आधीच तुम्ही फसलेले असता किंवा गैरसमजाचे भूत डोक्यात घोंघावत असते . त्यातून बाहेर येणे अशक्य असते. 

सुरळीत चाललेल्या आयुष्यात मोठा धक्का बसावा असे झाले . चतुर्थ भावात राहू आणि त्याचा भावेश शनी तृतीय भावात म्हणजे तो तृतीयाचीही जोरदार फळे देणार आणि तसेच झाले . सुनबाई घरातून निघून गेल्या . 

फक्त संसारात नाही तर आपल्या जवळच्या नात्यात एकंदरीत पारदर्शकता हवी तरच नाती टिकून राहतात नाहीतर उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही . एकदा विश्वास उडाला आणि मन मेले कि पुन्हा सुर जुळत नाहीत तसेच काहीसे ह्या घटनेबाबत झाले. दोघांच्याही पत्रिकेत शुक्र बेताचेच सुख देणारा पण तरीही राहू समोर कुणाचेही चालत नाही .

आयुष्यात फक्त एक निम्मित्त झाले आणि कुटुंबातील माणसांत दरी निर्माण झाली. राहुने आपला डाव साधला . नुसती कुटुंबात नाही तर कुटुंबातील माणसांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज निर्माण करणारा हा राहू आत्ताच कसा काय आपला डाव साधण्यास आला. ह्यालाच म्हणतात राहू दशा . काळ आणि वेळ कुणाला सांगून येत नाही त्यामुळे माणसाने उपासना आणि आपली कर्म शुद्ध ठेवावी . 

ह्या केस मध्ये पत्नी परत येणे कठीण आहे पण आलीच तर आयुष्यभर मनात संशयाची सुई घेवून वावरेल ज्याला खरच काही अर्थ असेल ? आपली सून माप ओलांडून घरात आली कि ती आपली झाली . तिचे कुळ बदलले . आपल्या मुलाच्या संसारात सुखाचे क्षण वेचणारी आणि त्याच्या आनंदासाठी ती आली आहे त्यामुळे तिच्या सोबत नात्यात कुठेही लपवा छापवी नको . तिच्याच नाही तर एकंदरीत नाती सहज सरल असावीत. 

ह्या जगात अनेक लोक आहेत जे बिचारे एकटे एकटे आहेत , त्यांना कुणीही नाही . म्हणूनच ज्यांची आपली माणसे आहेत , घरात गोकुळ आहे त्यांनी त्याची किंमत आणि जाणीव ठेवून तसे वागावे म्हणजे असे प्रसंग उद्भवणार नाहीत .

राहू हा राक्षस आहे आणि तुमचा नातेवाईक अजिबात नाही . राहूची दशा ज्यांनी भोगली असेल त्यांना हे समजेल. 


रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती होते कारण रोज नवीन व्याप आणि डोक्याला ताप . एखाद्या गजर्यातून  फुले निखळून पडावी अशी नाती आणि संबंध रोज = एक एक करून आपल्यापासून दूर जातात तीही केवळ एका गैरसमजाने जो आपण दूर करण्यात अयशस्वी ठरतो . राहू हि अदृश्य शक्ती आहे आणि जन्मभराची नाती एका गैरसमजामुळे कायमची तुटतात तेव्हा राहूच्या ताकदीचा अंदाज आपल्याला येतो . आपण काहीही करू शकत नाही . राहू हा तळतळाट आहे . पूर्वजन्मीचा शाप .महादेवाचे वरदान घेवून नवग्रहात आपली बैठक मांडणारे राहू केतू . आपल्या आयुष्याचे पूर्वीच्या अनेक जन्मांशी संधान बांधणारे राहू केतू . आयुष्यभर आपल्यासोबत वावरणारी आणि “ मी तुला चांगली ओळखते किंवा ओळखतो “ असे म्हणणारी आपलीच माणसे क्षणात परकी होतात कशी काय ? हीच तर आहे राहूची जादू . भ्रमित , संभ्रमित करणारा राहू कितीही सतर्क राहिलात तरी आपला डाव साधतोच .

आज राहूचे शततारका नक्षत्र आहे . पत्रिका बघताना राहू रुलिंग ला होताच

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment