Saturday, 5 July 2025

 || श्री स्वामी समर्थ ||




पूर्वापार आपल्याकडे घराच्या मुख्य द्वारापुढे काढलेल्या रांगोळीला अनन्य साधारण महत्व आहे . खेड्यापाड्यातून दरवाजा समोरील रांगोळी मुळे सरपटणारे प्राणी घरात येत नाहीत म्हणून घरातील स्त्रिया आवर्जून रांगोळी काढत असत . तसेच रांगोळी हा पूजेतील एक संस्कार सुद्धा आहे. विविध देवतांसाठी विविध रांगोळ्या काढण्याच्या प्रथा आहेत . 

आपल्या घरात येणारी व्यक्ती मुख्य दरवाज्या सामोरील रांगोळी क्षणभर पाहते तेव्हा तिचे विचार सकारात्मक होतात आणि त्याचा आपल्यालाही फायदाच होतो. कृती लहान असली तरी अगणित फायदे असल्यामुळे वेळ नाही हि सबब न सांगता दरवाज्यासमोर नित्य लहानशी का होयीना रांगोळी काढावी आणि अनुभव घेवून बघावा तसेच रांगोळीचा वसा पुढील पिढीलाही सुपूर्द करावा .


आषाढी एकादशीच्या सर्वाना अनंत शुभेछ्या .


श्री राम कृष्ण हरी 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


No comments:

Post a Comment