Tuesday, 15 July 2025

आयुष्याचा शेवटचा काळ कसा जायील ?

 || श्री स्वामी समर्थ ||


शनी वार्धक्याचा कारक आहे. रवीपासून सगळ्यात दूर असलेला हा ग्रह आपल्याला आयुष्याच्या संध्याकाळी भेटतो . थोडक्यात वार्धक्य दर्शवतो. शनी हा मंद गती ग्रह , शनै शनै प्रगती करणारा आणि म्हणूनच तो संयम ठेवायला शिकवतो. शनी प्रत्येक गोष्टीला विलंब करतो पण तो विलंब आपल्याला वाटत असतो खरा तो विलंब बसून प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळीच शनी करतो . तो जेव्हा गोष्टी घडवतो ती वेळ आपल्यासाठी उत्तम असते हे फक्त त्यालाच माहित असते . आपला संयम संपल्यामुळे आपल्याला तो उशीर वाटत राहतो . उशिरा देतो पण देत नाही असे कुठे म्हणतो ? जे देतो ते सर्वोत्तम देतो. पण तरीही आपण त्यालाच दुषणे ठेवतो कारण आपल्यात संयम नाही . 


एखाद्या मुलाचा विवाह जरी उशिरा झाला तरी ते त्याच्यासाठी उत्तम असते कारण कदाचित आधी होवून त्याला लाभणारा नसतो पण कारण पुढील काळ मात्र सुखाचा असतो . एखादा आजार झाला तरी विलंबाने बरा होतो . कारण शेवटी आजार हा आपल्या कर्माचा आरसा आहे. जितकी कर्म वाईट तितका विलंब अधिक . दवाखाना डॉक्टर दिसले आणि सुई टोचली कि कुणाला काय काय बोललो आहोत , कसे वागलो आहोत ते सगळे समोर उभे राहते आणि मग ३३ कोटी देवांच्या चरणी शरण जातो . 


ह्या सगळ्याची जाणीव करून देण्यासाठी आजार लगेच शनी कधीही बरे करत नाही. लगेच बरे झालात तर मग पुन्हा वाट्टेल तसे उधळायला मोकळे. सहमत ?


पत्रिकेत शनी धनु किंवा मीन राशीत असेल तर आयुष्याची संध्याकाळ शांततेत जाते. अश्या लोकांचा नोकरीत मान असतो सुस्थितीत सतत , सामाजिक कार्यातही भाग घेताना दिसतात . अष्टम भावात शनी असेल तर अनेकदा दीर्घ मुदतीचे आजार पण आयुष्यमान चांगले असते . शनिवार गुरूची शुभ दृष्टी असेल तर परिणामांची दाहकता कमी होते 

शनी हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे . आयुष्यभर केलेल्या चुका , कुकर्म शेवटीच आठवतात तोपर्यंत मनुष्य मदमस्त , बेताल , बेफिकीरीत जगत असतो . कुणाचा बाप माझे वाकडे करणार आहे हाच अविर्भाव असतो . पण तुमचा बाप तुमच्या आधीच देवाने जन्माला घातला आहे हे विसरून कसे चालेल . कर्म शुद्ध असावे हाच शनीचा संदेश आहे. कुणाचे ५ रुपये जरी ठेवले तरी कर्म वाढले आणि त्याची परतफेड करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. 

ओम शनैश्चराय नमः


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment