Friday, 4 July 2025

रेशीमगाठी भाग १२- सप्तम भाव शुक्र आणि जोडीदार

 || श्री स्वामी समर्थ ||


स्त्री आणि पुरुषामध्ये लैंगिक आकर्षण हे नैसर्गिक आहे. स्त्री आणि पुरुष एकत्र आले कि त्यांच्यात आकर्षण होणेही अपरिहार्य आहे आणि त्यातून नवीन जीव तयार होतो ह्यातूनच विवाहसंस्था निर्माण झाली असावी थोडक्यात काय तर समाजाने स्त्री आणि पुरुषाला एकत्र राहण्यास दिलेली अधिकृत परवानगी म्हणजेच विवाह.

सप्तम अष्टम हे मुख्यतः लैंगिक भावनांवर परिणाम करणारे हे स्थान आहे त्यामुळे व्यक्तीला वैवाहिक सुख कसे मिळेल जोडीदारापासून शारीरिक आणि मानसिक सौख्य कसे असेल ते सांगते.  जोडीदाराचे रंग रूप स्वभाव प्रेम आपुलीकी मतभिन्नता द्वेष आजार मृत्यू घटस्फोट सर्व गोष्टींचे ज्ञान सप्तम स्थान देते .विवाह दोघांचाही असतो त्यामुळे सर्वच गोष्टी दोघांच्याही मनासारख्या झाल्या पाहिजे. सुख ओरबाडून घेण्यात अर्थ नाही . 

शुक्र आणि मंगळ हे कामप्रधान ग्रह आहेत .अनेकदा ज्यांची कामवासना प्रबळ आहे त्यांचा विवाह उशिरा होताना दिसतो. घटस्फोट हि घटना नसून स्वभाव आहे. जबाबदारीचे पालन न करणे किंवा न पेलवणे . शुक्र वृषभ किंवा तूळ राशीत असता कामभावना जास्ती असते.शुक्र मंगळाच्या राशीत असताना सुद्धा कामवासना अधिक असते. मिथुनेतला शुक्रही कामी असतो. शुक्र मंगळ ७ किंवा १० मध्ये असता अनैतिकता वाढते. शुक्राच्या सप्तमात वक्री मंगळ ,शुक्रवार मंगळाची दृष्टी,शुक्र मंगळाच्या राशीत आणि त्यावर हर्षलचे कुयोग असतील तर पालकांनी मुली वयात येताना त्यांना सांभाळावे. 

शुक्राचे सप्तमात चंद्र असेल तर जोडीदार मन मिळाऊ असतो , गोरा , कलासक्त , सेवाभावी ,चंचल ,गोड बोलणारा असतो . शुक्राचे सप्तमात मंगळ असेल तर विवाह उशिरा होतो त्यात मंगळ मेष वृश्चिक राशीत असेल तर जोडीदार सत्ता हुकुम गाजवणारा, शिस्तप्रिय असतो . शुक्राचे सप्तमात धनु किंवा मीन राशी असतील तर जोडीदाराशी वैचारिक मतभेत असतात . शुक्रापासून सातव्या स्थानात तूळ रास असेल तर संसार सुखाचा करतील .रसिकता शुक्राच्या सप्तमात सिंह रास असेल तर जोडीदार घमेंडी , मानी ,आतल्या गाठीचा प्रेम पण करतील पण शिस्तीत.  राहू असेल तर जोडीदार महत्वाकांक्षी , वयात अंतर असणारा धार्मिक असेल  मकर राशी असेल तर कष्टाळू असेल . बुधाच्या राशी असतील तर उदार , बुद्धिमान ,बोलका , विनोदी स्वभावाचा  असतो .

विवाह हे दोन मनाचे मिलन आहे तेव्हा विवाह ठरवताना इतरांना काय वाटते त्याही पेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटते ह्याचा विचार करत आपला आतला आवाज ऐकावा . मग शास्त्राचा आधार घ्यावा पण सर्वच सारासार विचार करून निर्णय घ्यावा. आपल्या घरातील मांडली आपले हितच बघणार तेव्हा त्यांचाही विचार अवश्य झालाच पाहिजे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230




No comments:

Post a Comment