Thursday, 10 July 2025

रेशीम गाठी भाग -१४ विवाहास विलंब

 || श्री स्वामी समर्थ ||



अनेकदा विवाहाला उशिरा होतो . घरातील आर्थिक कौटुंबिक जबाबदार्या , शिक्षण , नोकरीत स्थैर्य नसणे , आर्थिक कुचंबणा , घरासाठी घेतलेले कर्ज , राहत्या घराच्या समस्या , शारीरिक आजार , लहान भावंडांची आणि एकंदरीत कुटुंबाची जबाबदारी ह्या सर्व कारणांमुळे विवाह लांबणीवर पडतो.  


ज्योतिष शास्त्राचा विचार करता लग्नेश , सप्तमेश , धनेश , लाभेश ,चंद्र ,रवी आणि विवाहाचा कारक शुक्र ह्यांचा विचार केला पाहिजे . एकापेक्षा अनेक पापग्रहांचा प्रभाव हा सप्तम स्थानावर असेल तर विवाहास विलंब होतो . सप्तमेशाची दशा , पंचम भावाच्या ही दशा अंतर्दशा ह्यात विवाह होतो. गुरु सारख्या ग्रहाचे गोचर भ्रमण पाहणे आवश्यक असते षष्ठ आणि दशम स्थान सुद्धा विवाहात विघ्न उत्पन्न करू शकतात . सप्तम स्थानात राहू केतू शनी मंगळ हर्शल ह्यासारखे पापग्रह असणे. सप्तमेश ६ ८ १२ मध्ये असणे . सप्तमेश वक्री , निचीचा असणे , सप्तम स्थानात पापग्रहांची युती असणे . २ ४ ८ ह्या स्थानात मंगळ शनी एकत्र असणे , गुरु ग्रहाला बळ कमी असणे . शुक्र ग्रह पत्रिकेत दुषित असणे हे महत्वाचे कारण शुक्र विवाहाचा प्रमुख ग्रह आहे. 

चंद्र आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अशुभ योगात असणे . चंद्र आणि शुक्र शनीच्या अशुभ योगात असणे . सप्तम स्थानात शुक्र राहू ,केतू हर्शल सोबत असणे . सप्तम किंवा पंचम स्थानात हर्शल बलवान असणे . सप्तम स्थानात किंवा स्थानावर ३ पापग्रहांच्या दृष्टी असेल तर विवाहाची शक्यता कमी असते . पत्रिकेतील चंद्राला बळ नसणे , त्यावर २ पापग्रहांच्या दृष्टी असेल तरी जातक विवाहास उत्सुक नसतो . व्यय भावात अस्तंगत शनी बुध सारखा ग्रह आणि तोही अस्तंगत असेल त्याचीच दशा असेल तर विवाहासाठी जातक फारसा उत्सुक नसतो.  शुभ ग्रहांचा कुठल्याही प्रकारे सप्तम स्थानाशी संबंध नसणे . धनस्थान किंवा त्याचा स्वामिग्रह दुषित असणे , मंगळ राहू केतू शनी हर्शल नेप ह्यापैकी कुठल्याही ग्रहाचा सप्तम  स्थानाशी संबंध आला . शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह विवाहास उशीर करणारे मुख्य ग्रह आहेत .


सप्तम स्थानात राहू असेल तर विवाहास उशीर होतो तसेच विवाहाची बोलणी झाल्यावर सुद्धा अडचणी येतात ,विवाह मोडू शकतो. केतू सप्तम स्थानात असेल तर विवाहाच्या दरम्यान अडचणी येतात . अनेक पत्रिकांमध्ये सप्तम भावात केतू असेल तर पत्नी चांगली मिळूनही वैवाहिक सौख्य नसते. पंचम स्थानात शुक्र राहुसोबत असेल तर विवाह 31 किंवा 33 मध्ये होतो . सप्तमातील शनी हा जोडीदार समजूतदार विश्वासू असतो पण विवाहास विलंब होतो. शनी राजयोगकारक झाला तरीसुद्धा .  शनी मंगळ , शनी राहू , मंगळ रवी ,रवी राहू ७ किंवा ८ मध्ये नकोत . मंगळ दोष मंगळ पत्रिकेत प्रथम स्थानात मेष राशीत , चतुर्थ स्थानात वृश्चिक राशीत ,सप्तम स्थानात मकर राशीत आणि अष्टम स्थानात सिंह राशीत आणि व्यय स्थानात धनु राशीत असेल तर मंगळ दोष लागत नाही . शनीचा शुक्राशी किंवा सप्तमेशा सोबत योग असेल तर विवाहास विलंब होतो.  पत्रिकेतील ८ तसेच १२ ह्या स्थानांचा प्रभाव विवाहास विलंब होण्यासाठी होतो. लाभस्थान सुद्धा अशुभ असेल तर विवाहात अडचणी विलंब होतो.

रवी हा सप्तम स्थानात पूर्ण फळे देवू शकत नाही कारण पश्चिम दिशा येते. राहू केतू सप्तम स्थानात त्रासदायक असतात . सप्तम स्थान हे विवाहाचे महत्वाचे स्थान आहे, अष्टम स्थान हे विवाहातून मिळणारा आनंद दर्शवते . ८ व १२ च्या स्वामींचा सप्तम स्थान किंवा सप्तमेशाशी संबंध आला तर विवाहास  विलंब होतो. सप्तम स्थानातील हर्शल , प्लुटो विवाह होऊन देत नाहीत . पितृदोष  आणि दुषित शुक्र ह्यामुळे  विवाह उशिरा होतो किंवा अनेक अडचणी येतात . 

मुळात जातकाला विवाह करायचा आहे कि नाही ? हे महत्वाचे आहे . अनेकांचे व्यय भाव बिघडलेला असतो कारण तोही शय्यासुखाचा भाव आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230



No comments:

Post a Comment