|| श्री स्वामी समर्थ ||
यमुना नदीत असलेला विषारी नाग “ कालिया “ ह्याच्या विषामुळे नदी चे पाणी आणि आजूबाजूचा परिसर तर दुषित होत होताच पण गुरेढोरे , वनस्पती सुद्धा मरत होती. कृष्णा ने कालियाच्या फण्या वर मर्दन करून त्याचा पराभव केला आणि त्याला नदी सोडून सागरात वास्तव्य कर असे सांगितले . तेव्हा कालियाने कृष्णाला सांगितले कि मी समुद्रात जायीपर्यंत गरुड मला बरोबर हेरेल आणि त्याची मला भीती वाटते म्हणून मी ह्या डोहात आश्रय घेतला होता.
त्यावर कृष्णाने त्याला सांगितले कि मी तुझ्या फण्यावर मर्दन करताना माझ्या पायांचे ठसे तुझ्या डोक्यावर उमटले आहेत त्यामुळे गरुड च काय कुणी तुला त्रास देवू शकत नाही . येतंय का काही लक्ष्यात ???
अगदी अश्याच प्रकारे भक्ताला जेव्हा त्याच्या साधनेमुळे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांचा वरदहस्त लाभतो तेव्हा आयुष्य वेगळ्याच अध्यात्मिक उंचीवर जाते . मग कश्याचीच भीती वाटत नाही आणि आसक्तीही , मोह सुद्धा वाटेनासा होतो. नामस्मरणाची मजा आयुष्यभर चाखत आणि त्याचा निर्भेळ आनंद घेत भक्त परिपूर्ण जीवन जगतो .
आयुष्यभर सगळे काही गोळा करत राहायचे ते कश्यासाठी ? ह्याची निंदा , त्याची नालस्ती , हेवेदावे , मत्सर हे करूनही काय मिळणार ? बाकी शून्य त्यामुळे ह्या सर्वाची उपरती होणे हि एका नामाची जादू आहे बर का . ती अनुभवण्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतील. आपल्या मनाला बजावत मनाला छडी मारत मारत नाम घ्यायचेच हा निश्चय करायचा . सीरिअल बघायला कसे बसतो तासंतास अगदी तसेच नामस्मरणात आपला जीव ओतला तर आहे तेच आयुष्य अमृतासारखे होयील ह्यात शंकाच नाही.
सतत भाती , भयगंड वाटतो ते अनेक उपाय करतात जसे कुठल्या कुठल्या शांती वगैरे आणि हजारो रुपये घालवतात पण नामस्मरण मात्र करत नाहीत . अहो नाम फुकट आहे पण ते सुद्धा घ्यायचा कंटाळा आहे किंवा त्यावर विश्वासच नाही. नामस्मरण करायला ५ मिनिटे आपण एका जागी बसू शकत नाही म्हणजे किती मन चंचल आहे बघा आपले. आणि ह्या चंचल मनामुळेच आपले आयुष्य देखील सैरभैर आहे .
वादळात असलेल्या नौके सारखे कुठेतरी भरकटत राहतो आपण आणि एकदिवस आपली इहलोकीची यात्रा संपते , पण वजाबाकी शून्य काय मिळवले आपण ह्या जन्मात काहीही नाही . भीतीने ग्रासते ते मन आणि पैसा खर्च करून मन शांत होत नाही तर त्याचा लगाम नामस्मरण हाच आहे . पण आपला विश्वासच नाही देवावर . नुसते महाराज महाराज करायचे अनेक यात्रा करायच्या पण आम्ही अजूनही नर्मदेचे गोटेच. महाराज आणि मी एकच आहोत. माझ्या आजूबाजूला महाराज खडा पहारा ठेवून आहेत कोण काय करणार मला इतका विश्वास असायला हवा प्रत्येक भक्ताला मनोमनी. पण नाही . जप करतो पण त्यात जीव ओतला तर त्यांच्याशी एकरूप होवू .
महाराजांचा वरदहस्त ज्याला लाभला त्याने कश्याचीही भीती बाळगायची गरज नाही . आम्हाला सोपे सोपे सगळे हवे , रत्न घाला , महाराजांना नारळाची तोरणे बांधा सगळे करा पण नाम ते घ्यायचे राहूनच जाते , तिथे लक्ष्यच नाही आहे आपले .
आजच सकाळी एका मुलीची पत्रिका पाहिली . दुसरा विवाहाचा प्रश्न होता . सध्या माहेरी राहते आहे , स्वतःचेही घर आहे . असो पण घरात राहायला एकटेपणाची भीती वाटते. साहजिक आहे , तसे वय फार नाही. मी तिला समजावले आणि म्हंटले दुसर्या विवाहाचीही गत पहिल्यासारखी होणार म्हणून आहे ते आयुष्य ठीक आहे , ह्या भानगडीत नाही पडलीस तर अधिक सुखी राहशील. पत्रिकेत विवाहाचे योगच नाहीत . असो आता राहिला प्रश्न भीतीचा . भीती वाटते म्हणून आपण जगायचे सोडून देतो का ? देणार का ? तर नाही ..वाटेल भीती पण जर महाराज प्रत्यक्ष आपल्या घरात आहेत आपल्या सोबत असा विचार जरी केला तर सगळी भीती क्षणात पळून जायील . तिलाही तेच सांगितले नामस्मरण हि एक जादू आहे , ज्या गोष्टींची भीती वाटते त्या गोष्टी कधीच प्रत्यक्षात घडत नाहीत .
आज दुपारपर्यंत चंद्राचेच नक्षत्र आहे . आज श्रावणी शनिवार आणि पौर्णिमा , उत्तम योग . चंद्र म्हणजेच मन . आज दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा आणि नामस्मरणाला सुरवात करा . महाराजांचा वरदहस्त लाभल्याशिवाय राहणार नाही हा संपूर्ण विश्वास ठेवून नाम घ्या .
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेछ्या .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment