Sunday, 31 August 2025

कर्णबधीर

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या शरीराचे सर्व अवयव शाबूत असणे हीच खरी श्रीमंती आहे ह्याची खात्री , जेव्हा आपण एखादा अपंग , कर्णबधीर व्यक्ती पाहतो , तेव्हा खर्या अर्थाने पटते. हे सुंदर जग पाहता येवू नये किंवा समोरच्या माणसाचे शब्द ऐकायलाच मिळू नये आणि पर्यायाने बोलताही येवू नये ह्याचे दुक्ख खूप मोठे आहे. पण आज विज्ञान आणि संशोधन प्रगत झाल्यामुळे अश्या आजारांवर सुद्धा अनेक उपचार पद्धती पर्याय उपलब्ध होत आहेत हा मोठा दिलासा आहे .

आज आपण कर्णबधीर असणे ह्या विषयावर शास्त्रीय आणि ज्योतिषीय कारणमीमांसा करणार आहोत . अनुवांशिकता हे प्रथम कारण असू शकते . Connexin 26 हे कानाच्या आतील आरोग्यासाठी अति महत्वाचे आहे आणि त्यातील बिघाड अनेक प्रश्न निर्माण करते .

शरीरातील Cx26 प्रथिनांचे कार्य शरीरात जेव्हा योग्य प्रमारे होत नाही तेव्हा कान पोटॅशियमची पातळी नियंत्रित करण्यात असमर्थ ठरते. कानाच्या आतील भागाचा अपूर्ण विकास , जन्मल्यानंतर लगेच झालेले इन्फेक्शन किंवा जन्माच्या वेळेस निर्माण झालेली ऑक्सिजन ची कमतरता हि कारणे सुद्धा असू शकतात , ज्यावर कानाचे डॉक्टर अधिक माहिती नक्कीच सांगू शकतील .

सर्वसाधारण संशोधन केल्यास असे आढळून येते कि अनुवांशिकता हे प्रथम कारण असू शकते. मातेच्या गर्भावस्थेत घेतलेल्या औषधांचा परिणाम किंवा संसर्ग सुद्धा ह्याला कारणीभूत असू शकतो . काही औषधे बाळाच्या श्रवण शक्तीवर कायमची परिणाम करणारी असतात .

ज्योतिषीय कारणे बघताना डोळ्यासमोर येतो तो चंद्र जो संवेदना दाखवतो त्याचा ६ ८ १२ शी असलेला संबंध तसेच दुषित शुक्र . कानाच्या आत असतेली पोकळी . पोकळी म्हणजेच स्पेस ह्याचा कारक ग्रह गुरु अर्थातच डावलून चालणार नाही . शरीरातील प्रत्येक पोकळी हि गुरु ग्रहाच्या अमलाखाली आहे त्यामुळे गुरु हा श्रवण करण्यास मुलभूत मानला जातो.

अनेक वेळा मागील जन्मातील कर्म सुद्धा कारणीभूत असतात कारण बाळ आत्ता कुठे जन्माला आले आहे पण ते मूक बधीर म्हणून . त्याने ह्या जन्मात कुठलेच कर्म केलेले नाही आणि असे असतानाही ह्या गोष्टी त्याला जर त्रस्त करत असतील तर त्याचा पूर्व जन्माशी संबंध असलाच पाहिजे. शेवटी आजचा जन्म हा पूर्व जन्माचा आरसा आहे.

शरीरात असलेले काहीतरी व्यंग हे व्यक्तीला अनेक मानसिक शारीरिक सामाजिक संघर्ष करायला लावते. आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत हि भावना जेव्हा त्यांच्या मनात रुजू लागते तेव्हा कुठेतरी आत्मविश्वास कमी व्हायला लागतो . अशी मुले हि फक्त पालकांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची आहे . त्या मुलांचे अस्तित्व महत्वाचे आहे कारण तोही एक जीव आहे. प्रत्येक जीवात परमेश्वर आहे असे मानले तर त्यांना आपल्यात सामावून घेणे आणि इतरांच्या सारखीच वागणूक त्यांना देणे. त्यांच्यात काहीतरी कमतरता आहे हे भासवून न देता त्यांचे संगोपन केले तर त्यांचेही आयुष्य फुलण्यात मदत होईल. हि एक ईश्वरी सेवा आहे हे समजून प्रत्येकाने त्यात हातभार लावला पाहिजे. आज विज्ञान , शास्त्र प्रगत आहे . अनेक औषधे , कानाची यंत्रे डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात त्यामुळे अश्या समस्यांवर नक्कीच मात करता येते .

आज माझ्याकडे एका कर्णबधीर व्यक्तीची पत्रिका आली होती म्हणून ज्योतिषीय दृष्टीने ह्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. वरती नमूद केलेल्या पत्रिकेतील ग्रह आणि योग तिच्या पत्रिकेशी तंतोतंत जुळत आहेत . मोठ्या जिद्दीने ती ह्यातून बाहेर आलेली आहे हे विशेष कौतुक आहे. त्रिषडाय पापग्रह युक्त असतील तर व्यक्ती आपल्या प्रयत्नांनी आयुष्यात स्वतःला उभी करतेच करते . मंगळ बलवान असेल तर व्यक्ती कितीही खचली तरी पुन्हा उभी राहतेच .

आज गुरूचेच विशाखा नक्षत्र सुरु झाले आणि ह्या व्यक्तीचा फोन आला . आज बुधाच्या नक्षत्रावर लेख पोस्ट करत आहे .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment