Monday, 15 September 2025

सहजक्रिया

 || श्री स्वामी समर्थ ||

नारदमुनी स्वतः मोठे साधक होते .सदैव “ नारायण नारायण “ जप करत असत. एकदा श्री विष्णूंच्या भेटीला ते गेले आणि महा विष्णुना नमस्कार करून म्हणाले कि मी आपला महान भक्त आहे कारण मी सदैव आपलेच स्मरण करत असतो . तेव्हा विष्णू मनोमन समजले कि ह्याला आपल्या भक्तीचा अहंकार झालेला आहे . त्यांनी नारदाला सांगितले अजूनही एक भक्त आहे पृथ्वी लोकात जो माझा परम भक्त आहे. तेव्हा नारदांनी ते सरळ नाकारले आणि कोण आहे तो अशी विचारणा केली.

त्यावर वेश बदलून दोघे पृथ्वी लोकात एका शेतात आले जिथे एक शेतकरी नांगर चालवीत होता . पण नुसताच नांगर चालवत नव्हता तर मुखाने सदैव विष्णूंचे नाम घेत होता .

विष्णूनी नारदाला सांगितले कि ह्या भक्तापेक्षा तू मोठा भक्त आहेस हे सिद्ध करण्यासाठी तू हा नांगर चालव . फक्त एक फेरी मार पण तो चालवताना एका हातात तेलाने भरलेले मातीचे भांडे घे ज्यातील तेल नांगर चालवताना खाली सांडले नाही पाहिजे आणि एकीकडे मुखाने नामस्मरण सुद्धा केले पाहिजे . इतकेच ना हे तर सोपे आहे असे म्हणून नारदमुनी एका हातात तेलाचे भांडे घेवून नांगर ओढू लागले पण इथे तिथे तेल सांडणार तर नाही ना ह्या भीतीने खरच थोडे तेल सांडले. विष्णूनी त्यांना काय शिकवले ते त्यांना समजले आणि आपल्या अहंकाराला तिलांजली देत नारदमुनी त्यांच्या समोर नतमस्तक झाले.

प्रपंच करून परमार्थ करणे हि सहजक्रिया जरी वाटत असली तरी त्यात सर्वस्व ओतावे लागते . प्रपंचातील सर्व कर्म करताना परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे लागते . प्रत्येक कर्म करताना त्याला हृदयात स्थान द्यावे लागते . क्षणभर सुद्धा त्याला न विसरता प्रपंच करत राहणे हे खचितच सोपे नाही . हि कठोर परीक्षा आहे कारण नाम घेणे म्हणजे भौतिक सुखापासून परास्त होणे आणि ते जमणे महाकठीण असते .

सातत्य आणि श्रद्धा असेल तर हेही जमते . नाम घेण्यासाठी वेगळे काहीही करावे लागत नाही इतकी हि क्रिया सहज होवून जाते . आपणही रोजच्या आपल्या प्रपंचात “ वेळ नाही “ हि सबब सांगतो त्यात तथ्य नाही. पोळ्या करताना , कपडे वाळत घालताना , स्वयंपाक करताना , चालता बसता उठता झोपता , आपली नित्य कर्म करताना नाम घेत राहणे हि क्रिया तितकीच आपल्याही नकळत सहज होवून जाते . फक्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हवी .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 11 September 2025

तनुस्थान

 || श्री स्वामी समर्थ ||


लग्न भाव म्हणजेच तनुस्थान हे महत्वाचे आहे , त्यात राशी बदलल्या तरी भाव महत्वाचा .जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली राशी हि जातकाच्या लग्नात येते. पूर्व क्षितिजावर सूर्य उगावतो तो लग्न बिंदू असतो . जन्म लग्नातील उदित राशी तिचा स्वामी आणि लग्नातील ग्रह हे जातकाच्या आयुष्यावर स्वभाव टाकतात जसे  प्रथम दर्शनी असलेले रूप रंग , शरीरयष्टी बांधा तसेच मन आणि स्वभावावर परिणाम करतात . लग्न बिंदू आत्यंतिक महत्वाचा आहे कारण ह्यातून आपण जन्म घेत असतो आणि त्यासोबत आलेल्या आपल्या चांगल्या वाईट वासना देखील ह्या जन्मात प्रवेश करत असतात . ह्या स्थानाला महत्व आहे कारण ह्या भावातील ग्रह बलवान असतात . केंद्रातील हे प्रथम आणि प्रमुख स्थान आहे.

लग्न बिंदू निश्चित करणे महत्वाचे असते. परवा एक पत्रिका पाहिली त्यात लग्न भावात शून्य अंशावर मेष लग्न उदित होते . आता मेष घ्यायचे कि मीन हा प्रश्न होता तेव्हा रुलिंग ची मदत घेतली . त्या दिवशी रुलिंग ला केतू असल्यामुळे मेष लग्न निश्चित केले आणि त्यानुसार केलेल्या पत्रिकेचे विवेचन सुद्धा बरोबर ठरले.

लग्न जेव्हा शून्य अंशावर उदित होते तेव्हा रुलिंग प्लानेट ची मदत देवासमान समजावी .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 10 September 2025

स्थित्यंतरे दाखवणारा अष्टम भाव

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यात काहीही वाईट झाले किंवा उलथापालथ झाली कि आपण सर्वात खापर फोडतो ते शनी राहू केतू मंगळ ह्यांच्यावर . पण अनेकदा ह्यातील कुणीच त्याला जबाबदार नसून इतर अनेक योग त्या घटना घडवत असतात . उदा द्यायचे झाले तर अष्टम भाव , त्यातील ग्रह किंवा अष्टमेशाची दशा . एखादा ग्रह जेव्हा अष्टमेशाच्या नक्षत्रात असतो तेव्हा जीवनात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळतात . अष्टम भाव हा प्रामुख्याने लग्नापासून आठवा असल्यामुळे मुख्यतः शारीरिक पीडा तसेच आर्थिक मानसिक शांतता हरवून टाकतो . नको ते व्याप आणि मनस्ताप मागे लागतात .नोकरीत निलंबन ,पैसे अडकणे , उधारी , व्यसने , व्यवसाय अचानक बंद पडणे , शारीरिक त्रास उद्भवणे आणि त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे ह्या गोष्टीना जातकाला सामोरे जायला लागते.

अष्टम भाव हा सप्तमाचा धन भाव आहे अनेकदा आपला जोडीदार आपल्यामागे समर्थपणे उभा असतो त्यामुळे नेहमीच अष्टम भाव नकारात्मक फळे देयील असे नाही . भावेश आणि भावातील ग्रह जर अष्टमेशाच्या नक्षत्रात असतील तर काय फळे मिळतात ते बघुया .

प्रथमेश किंवा प्रथम भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , तीव्र डोकेदुखी, नैराश्य, आळशी , आत्मघातकी वृत्ती असते . धनेश किंवा धन भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उधळपट्टी , बोलण्यात अडखळणे , कौटुंबिक सौख्य नसणे , आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक होते. तृतीयेश किंवा तृतीय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर खोट्या बातम्या पसरवणे , खोट्या सह्या , करारात फसवणूक , भागीदार फसवतील.

चतुर्थेश किंवा चतुर्थ भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर घरात दडपण , शिक्षणात अडथळे , आईशी न पटणे , मनाची ताकद कमी आणि घरात एकटे राहायला भीती वाटणे , वाहन अपघात , घराची चुकीची कागदपत्रे . भाग्येश किंवा भाग्यातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उच्च शिक्षणात अडथळे , वडिलांशी वितुष्ट , देवधर्म न होणे , न्यायालयीन कामात अडथळे , लाभेश किंवा लाभतील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर मित्र आप्तेष्ट ह्यांच्याकडून नुकसान , कुसंगती . व्ययेश किंवा व्यय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , सर्जरी , चुकीच्या गुंतवणुकीतून तोटा , मनस्ताप , परदेशी कंपन्यांच्या व्यवहारात फसवणूक होते.

अष्टम भाव अनेक कंगोरे देत असतो त्यामुळे अभ्यास करावा तितका थोडाच आहे. एखादा नियम अनेक पत्रिकातून अनुभवला तर त्याची अनुभूती मिळाली असे समजायला हरकत नाही . एखादी घटना फक्त एक ग्रह घडवत नाही तर त्यास अनेक योग , ग्रह दशा कारणीभूत असतात . एखादा ग्रह भरभरून देणारा तर एखादा अडथळे निर्माण करणारा. सगळे रंग समजले पाहिजेत . असाच अभ्यास करत राहूया . तूर्तास इथेच पूर्णविराम .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Tuesday, 9 September 2025

भाकीत म्हणजे ब्रम्हवाक्य नाही

 || श्री स्वामी समर्थ ||

ज्योतिष शास्त्राचा आवाका प्रचंड मोठा आहे त्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा तितकाच सखोल आहे. एखाद्याच्या पत्रिकेबद्दल भविष्य कथन करणे सोपे नाही. प्रचंड दांडगा व्यासंग आणि उपासना असेल तरीही केलेलं भाकीत अनेकदा चुकू शकते कारण हे शास्त्र पूर्णपणे परिपूर्ण नाही. शास्त्र हे कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. भविष्य कथन करण्याच्या अनेक पद्धती प्रचीलीत आहेत पण पद्धत कुठलीही वापरली तरी उत्तर बरोबर आले पाहिजे हे महत्वाचे आहे .

सर्वच कुंडल्या काही सोप्या नसतात . अनेक कार्यशाळा करून ज्योतिष येयील का? तर नाही. त्यातून मिळालेले ज्ञान आपल्याला अभ्यासाची दिशा दाखवेल. पण तुमचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला परिपूर्ण ज्ञान देयील ह्या मताशी बहुतांश सहमत होतील. पुस्तक आणि प्रत्यक्ष आयुष्य हे वगळे आहे आणि म्हणूनच पुस्तकात दिले आहे २ ७ ११ लागले कि विवाह होईल पण त्याचा दशा लागूनही जेव्हा विवाह होत नाही त्याचे कारण आपला स्वतःचा अभ्यासच देवू शकतो .थोडक्यात ग्रंथात दिलेले नियम आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवताना कसे लावायचे ते समजले पाहिजे . जसे मेष लग्नाला कन्येचा शुक्र हा प्रनायासाठी उत्तम नसेल पण कन्येसारख्या पृथ्वी तत्वाच्या राशीत तो आर्थिक दृष्टीने चांगले फलित देयील. अवास्तव पैसा खर्च करणारी व्यक्ती नसेल तर पैशाचा संग्रह करील.

प्रत्येक पत्रिका हे ज्योतिष अभ्यासका समोर असलेल एक आव्हान असते जिथे आपल्या ज्ञानाची आकलन शक्तीची अक्षरशः कसोटी लागते. जातक आपण दिलेल्या निर्णयावर विश्वास ठेवून पुढील मार्ग आखणार असतो त्यामुळे सांगणाऱ्या ज्योतिषाचीही जबाबदारी वाढते . सप्तम भावाचा सब बुध असेल तर दुसरा विवाह होईल हे नेहमीच शक्य होत नाही हे लक्ष्यात आले पाहिजे

अनेक वेळा पत्रिकेतील ग्रह आपल्यासमोर पेच निर्माण करतात , गुगली टाकतात अश्यावेळी आपली वयक्तिक उपासना उपयोगी पडते . आपल्या ज्ञानाचा कस लागतो तिथे आपला आतला आवाज सुद्धा ऐकावा लागतो . ज्योतिषाची तळमळ जातकाचा प्रश्न सुटावा अशी असेल तर प्रश्न निश्चित सुटतो .

एखाद्या पत्रिकेचे उत्तर उदा. विवाहाचा प्रश्न असेल आणि विवाह हि घटना जातकाच्या आयुष्यात घडणार नसेल असे संकेत जरी ग्रह देत असतील तरीही ती खुबीने त्याला न दुखावता सांगणे हे कौशल्य असते . अनेकदा आपण वर्तवलेले भाकीत जरी नकारात्मक असले तरी ते खरे झाल्यामुळे जातकाचा आपल्यावर विश्वास बसतो आणि अश्याही अवस्थेत तो पुन्हा आपल्याकडे प्रश्न घेवून निश्चित येतो असा अनुभव आहे.

सांगितलेले खरे झाले ना? मग ते कदाचित आपल्या मनासारखे नसेलही असो , भाकीत खरे झाले हे महत्वाचे असते. शास्त्राला मर्यादा आहेत त्यामुळे वाटेल त्या गोष्टीचे मुहूर्त काढून द्या हे जरी सांगितले तरी ते देणे उचित ठरणार नाही जसे घटस्फोट लवकर व्हावा असे प्रश्न हे न हाताळलेले बरे. निसर्गासमोर माणसाने नतमस्तक व्हावे हेच योग्य .

काही आपले प्रारब्ध भोग सुद्धा असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो . जपताप्य , नामस्मरण , अनेकदा घटनेचा क्रम बदलवू शकत नाही पण आपली मनोधारणा बदलवू शकतात . आपले मतपरिवर्तन होवू शकते . एखादी गोष्ट

आयुष्यात घडणार नाही हे आपले मन स्वीकारते हाच नामाचा महिमा आहे. जसा काळ पुढे सरकतो तसे आयुष्य नव्याने सुरु करण्याची उमेद उपसना देत असते . आपले आप्त कुटुंबीय हे जग सोडून गेले तरी मागे राहिलेल्या व्यक्तींना जगावेच लागते तेही असलेल्या दुक्खाला दूर करून . कुणी कुणासाठी थांबत नाही हा संदेश आपल्याला ह्या घटनातून मिळतो.

ज्योतिष हे चमत्कार करणारे आणि होत्याचे नव्हते करण्याची ताकद असलेले शास्त्र नाही , ते परिपूर्ण शास्त्र आपल्याला पुढील घटनांचा फक्त संदेश देत असते . ग्रह आपल्या पुर्वकर्मांचा आरसा आहेत आणि त्याची फलिते देण्यास समर्थ आहेत म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्या त्या भावात ठाण मांडून बसले आहेत . सारीपटावरील सोंगट्या प्रमाणे आपण त्यांना हलवू शकत नाही .आपल्या कर्मांनी आपल्या आयुष्याची जी वाट लावलेली असते ते आपले आयुष्य वाटेवर राजमार्गावर आणण्याचा प्रयत्न शास्त्र करते म्हणून त्याला मार्गदर्शक घटक म्हंटलेले आहे.

आजकाल लोकांना ज्योतिष हा एक छंद झालेला आहे. बर सांगितलेले उपाय करतील कि नाही हे ज्योतिषाला जातकाची पत्रिका बघूनच समजलेले असते पण तरीही मोठ्या आशेने तो उपाय सांगतो . उपाय करणे हे ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे.

शास्त्राची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारू नयेत आणि ज्योतिष सांगूही नये. तितकी आपली पात्रता नाही हे नक्की. शास्त्र अनुभूती देणारे आहे आणि ते देतेच देते . ज्योतिष शास्त्रावर तुमचा विश्वास असो अथवा नसो सूर्य उगवायचा राहत नाही . निसर्ग ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात . आपण सामान्य माणसे आहोत

आकाशातील ह्या लुकलुकणाऱ्या तारकांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यांचे जन्मापासून असलेले विलक्षण आकर्षण आपल्याला त्यांचा अभ्यास करण्यात प्रद्युक्त करते . एखादे भविष्य चुकले तर पुन्हा अभ्यास करावा शेवटी भविष्य वर्तवणारा सुद्धा माणूसच आहे . खरतर स्वतःला ज्योतिष न म्हणवून घेता अभ्यासकच म्हंटले पाहिजे . हे तर्कशास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा . आपले वेद , पुराण , ग्रंथ , उपनिषदे ह्या सर्वच अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा .

ग्रहतारे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला भाकीत वर्तवताना उपयुक्त होतो. पण म्हणून आपण केलेले प्रत्येक भाकीत हे ब्रम्हवाक्य असेल असे नाही आणि तसा अट्टाहास सुद्धा नसावा.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230