|| श्री स्वामी समर्थ ||
लग्न भाव म्हणजेच तनुस्थान हे महत्वाचे आहे , त्यात राशी बदलल्या तरी भाव महत्वाचा .जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली राशी हि जातकाच्या लग्नात येते. पूर्व क्षितिजावर सूर्य उगावतो तो लग्न बिंदू असतो . जन्म लग्नातील उदित राशी तिचा स्वामी आणि लग्नातील ग्रह हे जातकाच्या आयुष्यावर स्वभाव टाकतात जसे प्रथम दर्शनी असलेले रूप रंग , शरीरयष्टी बांधा तसेच मन आणि स्वभावावर परिणाम करतात . लग्न बिंदू आत्यंतिक महत्वाचा आहे कारण ह्यातून आपण जन्म घेत असतो आणि त्यासोबत आलेल्या आपल्या चांगल्या वाईट वासना देखील ह्या जन्मात प्रवेश करत असतात . ह्या स्थानाला महत्व आहे कारण ह्या भावातील ग्रह बलवान असतात . केंद्रातील हे प्रथम आणि प्रमुख स्थान आहे.
लग्न बिंदू निश्चित करणे महत्वाचे असते. परवा एक पत्रिका पाहिली त्यात लग्न भावात शून्य अंशावर मेष लग्न उदित होते . आता मेष घ्यायचे कि मीन हा प्रश्न होता तेव्हा रुलिंग ची मदत घेतली . त्या दिवशी रुलिंग ला केतू असल्यामुळे मेष लग्न निश्चित केले आणि त्यानुसार केलेल्या पत्रिकेचे विवेचन सुद्धा बरोबर ठरले.
लग्न जेव्हा शून्य अंशावर उदित होते तेव्हा रुलिंग प्लानेट ची मदत देवासमान समजावी .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment