Thursday, 2 January 2025

सीमारेषा

 || श्री स्वामी समर्थ ||


इतर अनेक शस्त्रासारखे आहार शास्त्र आहे आणि ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे . आहार शास्त्राची आज ज्योतिष शास्त्राशी सांगड घालायची म्हंटले तर असे सांगता येयील कि आपल्या पानात प्रत्येक जिन्नस किती घ्यावा तर तो आपल्या शरीर प्रकृतीला मानवेल इतका म्हणजेच पचेल इतकाच . चटणी , लोणचे चवीपुरते चमचाभर तर भाज्या अधिक प्रमाणात कारण त्यातून मिळणारे घटक अधिक उपयुक्त असतात जसे प्रोटीन वगैरे. 

भाजी इतकी चटणी आणि चटणी इतकी भाजी शरीरातील पचनसंस्थेचे संतुलन बिघडवू शकते . अगदी तसेच आपला अहंकार सुद्धा चटणी इतका असेल तर ठीक पण तो जेव्हा भाजी च्या प्रमाणात वाढतो तेव्हा आयुष्य उतरणीला लागते आणि पदोपदी अपमान , निराशा , पराभव अनुभवायला मिळतो. मी इतरांपेक्षा वेगळा हि भावना म्हणजेच “ अहंकार “ अशी सोपी परिभाषा मी करीन . पण मग अश्या व्यक्ती एकट्या पडतात , स्वतःच्याच कोशात राहून स्वतःचाच अहंकार अधिक जोपासू लागतात . माणूस समाजप्रिय आहे. आज माणूसच माणसाला नकोसा झाला आहे त्यात , आपण आपल्या वर्तनाने , बोलण्याने कश्याला त्यात भर घाला .  व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत , सगळ्यांच्या गुणांचे स्वागत करा त्यांना प्रोत्चाहित करा आणि आयुष्याचा प्रवास सुरेल करुया .

त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला असलेला अहंकार सीमित ठेवावा . तसेही प्रत्येक गोष्टीत आवश्यक आहे ती “ सीमारेषा “. अनेकदा ती ओलांडून आपण दुसर्याचा अवमान करतो , दुखावतो पण त्यातून हाती काहीच लागत नाही . 

लेखनालाही “ सीमारेषा “ असल्यामुळे तूर्तास इथेच थांबते .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment