|| श्री स्वामी समर्थ ||
माझ्या पत्रिकेत प्रेम विवाहाचे योग आहेत का? असा प्रश्न अनेक जातकांच्या मनात येतो. प्रेम फुलते ते पंचमात आणि त्याची परिणीती होते ती सप्तमात . पंचम भाव प्रेम आणि सप्तम विवाह. पंचमेश आणि सप्तमेश युतीत असतात किंवा एकमेकांच्या दृष्टीत असतात तेव्हा प्रेमविवाहाची शक्यता अधिक असते. शुक्र मंगळ युती सुद्धा प्रेम विवाह सूचित करते . पण ह्यावर सूर्य राहू शनी ह्यांचा प्रभाव असेल आणि ह्या ग्रहांचा षष्ठ भावाशी संबंध आला तर पुढे जावून विवाह सुखाचा होत नाही. विवाह सगळ्यांचेच होतात पण ते किती टिकतात , यशस्वी होतात हे महत्वाचे आहे आणि म्हणूनच प्रेमाची गोडवे म्हणणे वेगळे आणि संसार करणे वेगळे .तसे नसते तर कित्येक वर्ष एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले प्रेमी लग्नानंतर चहा कोण करणार , कपडे कोण वाळत घालणार ह्यावरून तू तू मै मै करणार नाहीत . प्रेयसी पत्नी झाली कि सगळेच बदलते आणि ते जितके लवकर स्वीकारता येयील तितकी संसाराची गोडी वाढेल, अन्यथा...
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment