|| श्री स्वामी समर्थ ||
लग्नभाव म्हणजे व्यक्ती स्वतः आणि त्याचा देह . पत्रिकेतील इतर अकरा भाव त्याला देणारे आहेत तर लग्न भाव हा घेणारा आहे . आई तुमची , कुटुंब तुमचेच , शिक्षण , मुले विवाह , पैसा धन , आजार , शत्रुत्व , अचानक उद्भवणारी संकटे , व्यवसाय नोकरीमधील यश , लाभ आणि व्यय हे सर्व तुमचेच तर आहे आणि म्हणूनच लग्न भाव आणि लग्नेश पत्रिकेत बलवान असणे आवश्यक आहे.
लग्न कुणाचे आहे त्याचा स्वामी कोण आहे आणि पत्रिकेत तो कुठल्या भावात आहे. लग्नाचे नक्षत्र कुठले आहे , उप नक्षत्र स्वामी नक्षत्र स्वामी कोण आहे , कुठल्या नक्षत्रात जन्म झाला आहे त्याचे कुठले चरण आहे , चरणाचा स्वामी कोण आहे ह्या सर्व गोष्टी आपलाच परिचय करून देत असतात . पूर्व जन्मात आपण काय कर्म केली आहेत त्यानुसार आपल्याला हा जन्म आणि हा देह प्राप्त झालेला आहे . ह्यावरून आपल्या ह्या जन्मातील अनेक गोष्टींचा बोध होत असतो . म्हणूनच सर्वार्थाने लग्न हे सर्वश्रेष्ठ आहे .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment