Thursday, 2 January 2025

शरणागती -स्वामी माझा मी स्वामींचा

 || श्री स्वामी समर्थ ||

मी पारायण करते , जप करते , प्रदाक्षणी घालते आणि बरच काही करते ह्यामुळे आपल्याही नकळत आपला अहंकार वाढीस लागतो त्यामुळे स्वतःच तयार केलेल्या ह्या कोशातून बाहेर येवून “ स्वामी माझ्याकडून हि सेवा करवून घेत आहेत “ असा भाव ठेवून अनन्यभावे त्यांना शरण जावून आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांचे स्मरण ठेवून जे जे काही शक्य आहे ती सेवा  त्यांच्यासाठी करत राहिलो तर त्यांच्या आणि आपल्यातील अंतर कमी होत जायील हे निश्चित . “ मी पणा “ ची भिंत प्रत्येक भक्त आणि महाराजांमध्ये असते . जसजसे नामस्मरण साधना वाढत जाते तसतसे हि भिंत धूसर होत जाते , आपले अस्तित्व ( थोडक्यात आपली लायकी ) किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव व्हायला लागते आणि जेव्हा आपण हे मान्य करतो अगदी मनाच्या गाभ्यातून त्याच क्षणी महाराजांचा वरदहस्त आपल्याला लाभतो ह्यात तिळमात्र शंका नाही . 

महाराज आपलेच आहेत म्हणून त्यांचा व्यवहारात वापर करून घेण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही अगदी त्यांनी सुद्धा. हवे तेव्हा स्वामी आणि नाहीतर कुठले स्वामी ? हे प्रत्यक्ष त्यानाही माहित आहे म्हणूनच त्यांनी तारक मंत्रात लिहिले आहे , निशंक हो निर्भय हो मना रे ... तारक मंत्रावर तासंतास बोलता येयील , आयुष्यभर चिंतन करता येयील इतकी प्रचंड शक्ती आणि गूढ अर्थ त्यात आहे. पण आपण कसातरी तो उरकल्यासारखा म्हणतो आणि जणूकाही आता अगदी महाराजांनीच “ thank you “ म्हणण्यासाठी आपले पाय धरावेत अश्याच अविर्भावात वावरत असतो. अहो त्यांनीच जन्माला घातलाय ना आपल्याला म्हणूनच त्यांच्यासमोर कसला हि नाद चालणार नाही. 

साधकांनी साधका सारखे वागणे अपेक्षित आहे त्यांनी आपला विठोबा घाटोळ होवू द्यायच्या स्वतःला सावरले तर हे जीवन अतिसुंदर आहे हे समजेल .  दुसर्यांचे प्रश्न समस्या ऐका मग समजेल आपल्या ओंजळीत त्यांनी किती सुख घातलाय त्याची जाणीव होईल पण आपण रोज रडगाणी गात असतो महाराज मला हे हवे ते हवे न संपणारे आहे हे सर्व . त्यांचे अस्तित्व सर्वत्र आहे अगदी मी लिहित असलेल्या प्रत्येक शब्दात माझ्या श्वासात विचारात सगळीकडे आहे आणि त्याचे भान सुटले कि झाले. आपण निम्मित आहोत सर्व तेच करून घेत आहेत ह्या भावनेने अत्यंत निष्काम भाव ठेवून मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार स्वामीमय होवून जावूया ....ह्या सेवेची संधी दिल्याबद्दल कृतकृत्य होवुया.

प्रत्येक गुरुवारची साधना 

१. मानसपूजा ( वेळ अर्थात कुठलीही पण ती करत असताना सुनबाईना कुकरच्या शिट्ट्या बंद करायला सांगू मंत्र नका , त्या करतील )

२. नामस्मरण ( किती करावे प्रत्येकाने ठरवावे आपल्याला प्रपंच सुद्धा आहे )

३. पोथी वाचन 

४ महाराजांना अभिषेक प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा .

 पहिला गुरुवार ( सकाळ संध्याकाळ कधीही करावा )  दुधाचा 

 दुसरा गुरुवार पंचामृताचा 

 तिसरा चंदन + अष्टगंध + केवडा + अत्तर +हीना + कस्तुरी ह्याचे लेपन

 चौथा गुरुवार सुवासिक फुलांचा अभिषेक जसे चमेली , मोगरा , चाफा , जाई जुई

 प्रत्येक पूजेच्या सुरवातीला आपल्या कुलस्वामिनी आणि कुल देव ह्यांचे स्मरण करण्यास कधीही विसरू नये .

स्वामी हे नाव मुखातून जात आहे हेच आपले भाग्य आहे. त्यांचे आपले नाते प्रेमाचे जसे माय लेकराचे...मला पुढे लिहवत नाही डोळ्यातून अश्रुधारा येत आहेत ...आज इथेच थांबते ...स्वामी आम्हा सर्व भक्तांना तुमचाच आधार आहे , सांभाळा .

शरणागत दिनार्थ परित्राण परायणे |

सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते |

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment