Thursday, 2 January 2025

एक पाऊल मोक्षाकडे

 || श्री स्वामी समर्थ ||


फक्त ह्याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो. जन्मोजन्माच्या ह्या फेर्यातून मुक्ती मिळते जेव्हा मोक्षाची प्रवेशद्वारे उघडतात . मागील जन्माच्या कर्माचा हिशोब ह्या जन्मात आणि ह्या जन्मातील कर्माचा हिशोब पुढील जन्मात असे हे चक्र फिरत असते. पुनरपि जननं पुनरपि मरणं म्हंटले च आहे. 

खरतर मोक्षाला जाण्यासाठीच जन्म असतो पण मनुष्य अर्थ काम धर्म ह्या पुरुषार्थात अडकतो आणि मोक्ष दुरावतो . परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचे उद्दिष्ठ असूनही मोक्षाकडे जाण्यास विलंब होतो . मागील जन्मातील कर्म ह्या जन्मात ..मागील पानावरून पुढे चालू . ग्रह ह्या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत थोडक्यात ग्रह कर्मफळ देण्यासाठीचे माध्यम आहेत . जसे कर्म तसे फळ म्हणून ग्रहांना कधीही दोष देण्यात अर्थ नाही कारण ते आपल्याच कर्माचे फळ देत असतात .


पत्रिकेतील षष्ठ भाव पहा . रोग ऋण शत्रू भाव . षष्ठ भाव नोकरीचा आहे. नोकरी मिळाली कि खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि पैश्यामुळे माणसाचा “ अहं “ फुलतो . पैसा आला कि मग काय हवे ते करा आणि उधळा लक्ष्मी , जीवनशैली बदलते कधीही काहीही खावे प्यावे , मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा अजून पैसा मग त्यासाठी घड्याळ्याच्या काट्यावर असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणार्या असंख्य चिंता विवंचना . ह्या सगळ्याचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारात . ह्या सगळ्याचे मूळ बदललेली जीवनशैली आणि विचार सरणी. आहे त्यात समाधान मानणे सध्या कठीण आहे , इर्षा आणि त्यातून निर्माण झालेला आपल्याच लोकांबद्दलचा द्वेष तिरस्कार .एखाद्याचे कौतुक आणि खुल्या दिलाने स्तुती सुद्धा करता येत नाही आपल्याला इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आहोत आपण.

पत्रिकेतील चतुर्थ भाव आपले मन , लग्न म्हणजे आपले शरीर , देह आणि आत्मा म्हणजे सूर्य . साहस , आत्मविश्वास देणारा मंगळ , बुद्धी, अभिव्यक्ती  देणारा बुध , ज्ञान देणारा गुरु , आयुष्यातील सर्व सुखाची बरसात शुक्र , कष्ट , आजार , अपमान देणारा शनी .आयुष्यात अचानक घटना घडवणारा राहू , कोमात नेणारा केतू . हि सर्व मागील अनेक जन्मातील कर्म आहेत जी ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणामांचे फल प्रदान करतात . 

शास्त्रात चातुर्वीद पुरुषार्थ सांगितले आहेत . पंचम भाव आपले पूर्वकर्म , नवम भविष्य आणि प्रथम आपले वर्तमान हे ज्याला समजले त्याला आपल्या जन्माचे रहस्य किंवा उद्दिष्ट समजेल. जन्म हा लादलेला नाही , आपल्या इच्छेतून आपण जन्म घेतला आहे . जन्म घेण्याची प्रबळ इच्छा झाली म्हणून मातेच्या उदरातून जन्म घेतला आहे आपण . षष्ठ भावावर विजय मिळवणे ह्याचाच अर्थ कुटुंबात सुख दुक्खाच्या प्रसंगात एकत्र राहणे , समजून घेणे कुटुंबातील एक होवून राहणे , शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शत्रू निर्माण न करणे आणि आजारांवर मात किंबहुना सुधृढ राहणे , षष्ठ भावावर विजय मिळाला तर सप्तमाचे फळ भोगता येयील. 

ह्या पृथ्वीलोकावर कितीही संकटे दुक्ख असले तरी मनुष्याला मृत्यू नको असतो .  मोक्षप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आणि त्याचा ध्यास असला पाहिजे . चारही पुरुषार्थ जीवनाचे विविध टप्पे दर्शवतात आणि प्रत्येक टप्पा परिपूर्ण पणे जगून झाला तरच मोक्षाकडे वाटचाल होवू शकते. मनुष्य हा इच्छेमुळे जन्म घेतो हे आपण पाहिले. आपले मन चतुर्थ भावात आहे आणि मन म्हणजेच आपल्या मनातील विचार . विचाराना कक्षा नाहीत .मनाला बंधनात ठेवता येत नाही कारण ते उदबत्तीच्या धुरासारखे इथे तिथे भटकत असते. मन हे असंख्य वासनांचे घर आहे. काहीना काही सारखे हवे असते , हे सर्व न संपणारे आहे म्हणूनच मोक्ष मिळणे कठीण आहे. भाव मनात प्रगट होतात आणि विचार मेंदूत . हृदयातील आणि डोक्यातील विचार जेव्हा शून्य होतील म्हणजेच कुठलीच इच्छा राहणार नाही अशी जेव्हा मनाची अवस्था होयील तेव्हा समजून जा कि तुम्ही मोक्षाच्या पायर्या चढायला लागले आहात . म्हणूनच मोक्षाच्या आधीची पायरी एकादश भाव म्हणजेच लाभ भाव. पुढील मोक्षाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यापूर्वी मिळालेले सर्व लाभ तिथेच ठेवून जावे लागते . इच्छांचे परिमार्जन होणे सोपे नाही आणि म्हणूनच मोक्ष मिळणे सुद्धा तितकेसे सोपे नाही कारण आपले मन संसारातून बाहेरच येत नाही. संसार म्हणजे सार जे नेहमीच पातळ असते , न आटणारे प्रेम तिथे आहे. अजून हवे हे संपत नाही , त्यात अडकत जातो आणि मोक्ष दुरावतो.

इच्छा आहेत तोपर्यंत मुक्ती नाही . षडरिपू , इच्छा आपले पाय मागे ओढतात म्हणूनच साधना , नामस्मरण आपल्याला ह्यातून बाहेर काढण्यास मदतच करते .


पुढील वर्षात एक उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करुया. कुणी बघितलाय मोक्ष पण खरच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा  दृढनिश्चय करुया . 

महाराजांनी सांगितलेच आहे “ अशक्य काहीच नाही “ आपल्या जीवनात सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील फक्त एकच गोष्ट हवी ती म्हणजे “ दुर्दम्य इच्छाशक्ती “.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

Monday, 21 October 2024

“ आर्थिक सुबत्ता “ हाच पसंतीचा प्राथमिक निकष

 || श्री स्वामी समर्थ ||



विवाह जुळवताना वधू आणि वर ह्या दोघांच्या पत्रिका बघाव्या लागतात ..त्यात गुणमिलन हि पारंपारिक पद्धती डावलून चालत नाही पण फक्त गुणमिलनावर पत्रिकेचा निकष न काढता ग्रह मिलन , दशा , इतर ग्रहस्थिती ह्यांचाही विचार करावाच लागतो.. दशा स्वामीला डावलून पत्रिका मिलन करणे अत्यंत धोक्याचे ठरते .


दोघांच्याही पत्रिकांचा विचार करताना दोघांची विचारसरणी एकमेकांशी जुळणार कि नाही ते पाहण्यासाठी दोघांचे लग्न , लग्नेश तसेच मनाचा कारक चंद्र पाहावा. 


लग्न हे उर्वरित आयुष्यात दोघानाही सुख प्रदान करणारे आहे का ? त्यांना संतती होईल का? वंशवेल वाढेल का ? आर्थिक स्थैर्य मिळेल का ? , संसारातील गोडवा जपला जायील का? संसारातील कुरबुरी , चढउतार , अचानक उद्भवणाऱ्या संकटाना दोघेही एकत्रित पणे सामोरे जातील का? थोडक्यात दोघानाही  मानसिक , वैचारिक क्षमता आहे का? आयुष्यमर्यादा , उधळपट्टी करण्याची वृत्ती आहे कि  संचय करण्याची वृत्ती अनेक पेहलू अभ्यासावे लागतात . थोडक्यात पुढील 25-30 वर्षाचे वैवाहिक सौख्य कसे असणार आहे ह्याचा मागोवा घ्यावा लागतो .वैचारिक , आर्थिक , मानसिक क्षमता त्याचसोबत लैंगिक क्षमताही महत्वाची आहे. 


अनेकदा पत्रिकात मंगळ आहे म्हणून अनेक चांगली स्थळे हातातून निसटून जातात . पृथ्वीवरच्या 90% लोकांमध्ये मांगलिक दोष असू शकतो मग त्यांनी लग्न करायची नाही का? शास्त्रात त्यावर अनेक उप गोष्टी सुचवल्या आहेत . मंगळ क्षीण आहे का , कुज दोषात आहे का? हे सर्व न बघताच फक्त मंगळाची पत्रिका म्हणून नकार घंटा वाजवण्यात अर्थ नाही . मंगळा च्या पत्रिकांचे उगीच स्तोम करू नये .


पत्रिकेतील प्रत्येक ग्रहाचे नवमांश बळ सुद्धा पाहिले पाहिजे.  संतती सौख्य हि विशेष बाब आहेच .

अनेकदा पत्रिका चुकीच्या पद्धतीने पहिली जाते तसे नसते तर मग वर्षभरात घटस्फोट कसे होतात असा विचार मनात येतो. पत्रिकेतील सर्व ग्रहांचा विशेषकरून पाप ग्रह , त्यात सप्तमेश पापग्रह असेल तर अगदी नक्कीच अभ्यास केला पाहिजे .


संसारिक सुखाचा कारक शुक्र सुस्थितीत आहे का? गुरूची बैठक योग्य आहे का? अनेकदा संसारात कलह होतील अशी ग्रहस्थिती असते पण त्यातून सुद्धा पुढे जायचे असेल तर कुटुंब भाव आणि चतुर्थ भाव चांगला हवा . तो नसेल तर संसार टिकवण्याकडे कल नसतो. 


आजकाल विवाह होणे कठीण झाले आहे त्याला अनेक कारणे सुद्धा आहेत . दोघांच्यात शारीरिक , मानसिक आकर्षण , ओढ , प्रेम , एकमेकांसाठी जगण्याची अनेकदा समर्पण त्यागाचीही वृत्ती असली पाहिजे त्यासाठी चंद्र शुक्र मंगळ योग्य दिशा दाखवतील.  दोघांचे लग्न एकमेकांच्या षडाष्टकात असेल तर विचारच जुळणार नाही . सरतेशेवटी दशा महत्वाची आहे. 


विवाह हा फक्त त्या दोघांचा नसून दोन कुटुंबियांचा त्यात समावेश होणार असतो. अनेक नाती गोती बदलणार असतात . प्रत्येक नाते खुल्या दिलाने स्वीकारावे लागते तरच पुढची वाटचाल सुखकर होते . आपण समोरच्याला स्वीकारले तर समोरचा सुद्धा आपल्याला स्वीकारेल ह्याची खात्री ठेवा. प्रत्येक नाते फुलायला बहरायला वेळ लागतो आणि तो द्यावा लागतो त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. आज आपण सुनेच्या भूमिकेत आहोत उद्या सासुच्याही असणार आहोत हा विचार आत्ताच केला पाहिजे नव्हे तो करणे आपल्याच हिताचे ठरेल. प्रत्येक नाते अनेक अपेक्षा घेवून येते त्या सर्वच पूर्ण होतील असे नाही. आपणही इतरांच्या सर्व अपेक्षांच्या कसोटीवर १००% उतरणार नाहीच कि . संसाराचा मार्ग कधी सोपा तर कधी खडतर असतो. तिथेच आपली साधना उपयोगाला येते , सद्गुरू आपल्याला संयमित करतात.


नवरा बायको चे नाते समर्पणाचे सुद्धा आहेच कि. एकमेकांसाठी जगण्यात गोडवा असतो . कधी तुझे आणि कधी माझे हे चालायचेच . लग्नात सुंदर दिसणारी बायको कायम सुंदर दिसणार नाही , आपणही बदलणार आहोतच , देह रंग रूप दिसणे हे शाश्वत नाही ह्याचे भान असले पाहिजे .आपण बदलणार तसे समोरची व्यक्ती सुद्धा .


आज एका मुलीने लग्नाची अट सांगितली कि “ मला सासूसासरे वयाने 55 च्या आत असणारे हवेत ..” काय हेतू असेल हे सांगण्यामागे तिचे तिलाच माहिती .


विवाह संस्था टिकवायची आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्या अनेक विचारणा मुरड घालावी लागणार हि खुणगाठ लग्नाला उभे असणार्या सर्व मुलामुलीनी करावी असे सुचवावेसे वाटते .

आज पालक आपल्या मुलांच्या डोक्यावर पडणार्या अक्षतांसाठी आतुर आहेत . शिक्षण घेतले , मोठ्या पगाराच्या नोकर्याही आहेत सर्व आहे. पण आपणच घातलेल्या नको त्या अटींच्या डोंगराखाली आपणच घुसमटत आहोत , वये पुढे जात आहे . कुठे थांबायचे ते ज्याला समजले तो जिंकला , ज्याने तडजोड केली सामंजस्याने विचार केला तर तो पुढे जायील , आता माझ्या मुलाला किंवा मुलीला स्थळेच सांगून येत नाहीत हि अवस्था तुमच्या आईवडिलांना पाहायला लावू नका. तुमची बाळलेणी तुमच्या मुलांच्या अंगावर घालायचे सुख त्यांच्या पदरी पडू दे . 


आपण जोडीदार शोधात आहोत जो आपल्याला माणूस म्हणून वागवेल , आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी खंबीर उभा राहील , आपले मन जपेल आणि विचाराना मान देयील असा हवा. आपण विकत घ्यायला जात नाही जोडीदार लग्नाच्या बाजारात . दुर्दैवाने तसे आहे नाहीतर मुलीनी पगार अमुक अमुक च्या वरती हवा अशी अट घातलीच नसती . कुठून आल्या ह्या अटी ? पगार ह्या एकाच निकषावर विवाह होणार कि काय ? भले शाब्बास . अश्या अटी पूर्ण करणारा नवरा मिळेलही पण तो प्रेम करणारा असेल का? कारण दोघांचेही विश्व भावना प्रेम नसून पैसा हे असेल. पैसा हीच पसंती असे सध्याचे चित्र आहे. 


विचार करा पुन्हा पुन्हा विचार करा . आपण सुख शोधत आहोत , नवरा मुलगा विकत नाही घेत आपण , हि प्रेमाची देवाण घेवाण आहे पैशाचा सौदा नाही .लग्नाचा बाजार मांडू नका , पूर्वीच्या काळी मुली मिळवत सुद्धा नव्हत्या तेव्हा नाही ती केली कुणी पगाराची भाषा . ह्या कोशातून लवकर बाहेर या आणि सहजीवनाचे स्वागत करा इतकेच सांगायचे आहे. नाहीतर पुढे येणाऱ्या स्थितीला तुम्ही स्वतःच जबाबदार असला. वय वाढले कि शरीरातील ताकद , सौंदर्य , उमेद सर्व काही कमी होत जाते . विवाहासाठी पैसा पगार हे निकष कधीपासून झाले ? सुख समोर आहे त्याला आपलेसे करा , त्याच्याकडे पाठ फिरवू नका नाहीतर हा अहंकार तुमच्या पुढील आयुष्यातील एकटेपणाला कारणीभूत असेल . आपल्या मागे आपली मुले एकटी राहणार ह्या चिंतेने तुमचे पालक सुद्धा चिंताग्रस्त आहेत ह्याचा विचार करा .  श्री स्वामी समर्थ  


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  



Wednesday, 16 October 2024

Aura Cleansing

 || श्री स्वामी समर्थ ||


“लहानपणी आपण आणि आता आपली मुले सांगत असत आई आत्ताच्या आत्ता दे “आठवतंय ना? अगदी तशीच स्थिती प्रत्येक गोष्टीत आजकाल आपल्या सर्वांची झाली आहे . आजकाल सगळ्यांना सगळे लगेच हवे असते . संयम संपलाय ... घरी काही पदार्थ करू नका , बाहेर सगळे मिळतंय आणा खा आणि मोकळे व्हा. बदलत्या जगात जुन्या सर्वच गोष्टी हळूहळू विरून जात आहेत तरीही जुने ते सोने...आपले मोदक बघा पारंपारिक पदार्थ आहे . आहे का त्याला मोमो ची सर ? कधी येणारही नाही . मोदक ह्या नावामध्ये  जे सौंदर्य आहे ते मोमो मध्ये कसे येणार ? असो. तर सांगायचे असे कि सगळ्यात शोर्टकट चालत नाहीत . उदा. अध्यात्मात शोर्टकट ला वाव सुद्धा नाही .

परमेश्वराला आपली गरज नाही आपल्याला आहे म्हणून आपण देवदेव करत असतो हे खरे आहे . मला देवाकडून काही नको असे नसते मोठ्या याद्या आहेत आपल्या . असो तर जे मनात आहे ते घेण्यासाठी आपण पूजा अर्चा देव धर्म जपतप करतो पण त्यात जीव ओतला नाही तर गजानन विजय सारखा ग्रंथ म्हणजे गोष्टीचे पुस्तक किंवा कादंबरी होईल. श्री गजानन विजय ग्रंथ महाराजांचे अस्तित्व दाखवणारा ग्रंथ आहे अर्थात तुमची तितकी निष्ठा हवी . दिवाळी अंक सारखा तो वाचलात तर कसे महाराज मदत करतील तुम्हाला ?

हे सर्व सांगण्याचे तसेच कारण आहे. मध्यंतरी एका बाईला काही उपाय सांगत असताना त्या म्हणाल्या हनुमान चालीसा youtube वर ऐकली तर चालेल का? मी म्हंटले का नाही चालेल कि सगळे चालतंय आपल्याला . पण मग असे करा भूक लागली कि वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे फोटो video सुद्धा अगदी तसेच youtube वरती बघा. बघा ते पाहून पोट भरते आहे का . त्या मनोमन काय ते समजल्या . 

पूर्वी होते का youtube? आपल्या लहानपणी शुभम करोति , मनाचे श्लोक , परवाजा , पाढे , अडीचकी दिडकी आपल्याकडून आईबाबा घोकंपट्टी करून पाठ करून हेत असे.  आठवतंय का? थोडक्यात आपल्या मुखातून ते श्लोक म्हणण्याला सुद्धा काहीतरी अर्थ असल्याशिवाय का हे आपण म्हणत असू ? येतंय का लक्ष्यात ? 

आपली वाणी सुस्पष्ट व्हावी , एका जागी बसण्याची सवय व्हावी , एकाग्रता वाढावी आणि आपण म्हणत असलेल्या श्लोकात आपले संपूर्ण लक्ष्य असावे जेणेकरून त्याची गोडी लागेल उच्चार स्पष्ट येतील आणि त्या देवतेची अखंड कृपा आपल्यावर होईल . स्वतः म्हणत असल्यामुळे ताठ बसायची सवय ( तेव्हा शेजारी मोबाईल नव्हते  ते नशिबच आहे त्या पिढीचे ) , श्कोलांचा अर्थ समजून म्हणायची सवय लागायची आणि एकंदरीत मनाचे चित्ताचे शुद्धीकरण होत असे. इतके ढीगभर फायदे होते पण त्याही पेक्षा मोठा फायदा म्हणजे आपला आत्मा आणि मन एकचित्त ,स्थिर होत असे. आजकाल जे जरा काही झाले कि झाले मन अस्थिर असे तेव्हा होत नसे कारण मुळातच आजकाल लोकांना एका जागी दोन मिनिटे सुद्धा बसता येत नाही इतके मन राहुने चंचल केले आहे.  

आता हा राहू कोण ? तर तो तुमचा मोबाईल , थोडक्यात सगळी हि आधुनिक इलेक्ट्रोनिक उपकरणे , त्या सर्वात आपण आजकाल आपले आयुष्य शोधायला लागलो आहोत , त्या शिवाय श्वास सुद्धा नाही बरे आपला अशी आजकाल वेळ आहे. असो . पूर्वीच्या काळी स्त्रिया भाजी निवडताना स्वयपाकघरातील कामे करताना ओव्या म्हणत श्कोल म्हणत त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहत असे , देवाचे नाव घेण्यासाठी वेगळा असा वेळ काढण्याची गरजच निर्माण होत नसे पण आता स्त्रिया स्वयपाक करताना कानात ते यंत्र घालून ऐकत स्वयपाक करतात . असो . तर हे सर्व वेद रुचा स्वतः तोंडाने म्हणणे हे सर्वार्थ प्रगतीचे लक्षण मानले जाते कारण ह्यामुळे आपल्या मनाची आत्म्याची शुद्धीक्रिया म्हणजे आजकालच्या भाषेत आपला “ Aura Clean “ होतो , आपला “ Aura “ सकारात्मक होण्यास मदत होते आणि मग कुठल्याही परीस्थित आपण न डगमगता मन विचलित होवू न देता सामोरे जावू शकतो . थोडक्यात एकाग्रतेने मन सुद्धा खंबीर होते आणि खंबीर मन योग्य स्थितीत योग्य विचार करू शकते . ह्या सर्वासाठी आपल्याला हे श्लोक मग ते श्री सुक्त असो अथवा अथर्व शीर्ष असो . रामरक्षा असो अथवा हनुमान चालीसा असो आपल्याला ते स्वताहून म्हणायचे आहे . आधी ऐका कुणाकडून त्याचा अर्थ समजून घ्या , आजकाल सगळे गुगल वर आहे. अर्थ श्लोक , उच्चार समजून म्हणा , तालासुरात म्हणा जेणेकरून आपल्यालाही ऐकायला आवडेल आणि गोडी लागेल . शब्द स्वर रुचा चुकल्या तरी चालतील , चुकत चुकत येयील पण येयील आणि ह्या प्रयत्नांना यश जेव्हा येयील तेव्हा गगनात आनंद मावणार नाही कारण ज्या देवतेचे करता ती तुमच्यावर प्रसन्न होवून आपल्याला आशीर्वाद देणार हे नक्की.

म्हणूनच अध्यात्मात शॉटकट नाहीत . प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते , कलियुग आहे आणि कित्येक जन्माच्या पापांचा हिशोब चुकता करायचा आहे , त्यामुळे एक माळ करून काहीही होणार नाही. एका माळेने सुरवात करा पण पुढे हा जप वाढवत न्या. खाताना विचारतो का? किती बटाटे वडे खावू ? ते जसे अमर्यादित आहे तसेच जे अध्यात्म कराल तेही तसेच असुद्या . 

परमेश्वर द्यायलाच बसला आहे , आपण त्याच्या दृष्टीक्षेपात आलो कि तो आपल्याला देणारच हा विश्वास ठेवा . दृष्टीक्षेपात कसे येणार , मनापासून नामस्मरण केल्यामुळे , पटतंय का ?

बघा जीवनात सगळीकडे शोर्टकट नाहीत , निसर्ग सुद्धा हेच शिकवतो आपल्याला. त्याचे उत्तम उदा म्हणजे , बाळाचा जन्म नऊ महिने नऊ दिवस , तिथे आपले काहीही चालत नाही .ज्याला जितका वेळ लागणार तो लागणार त्यात आपले विज्ञान उपयोगाचे नाही .  निसर्ग आपल्या जीवनाचा जसा भाग आहे तसेच अध्यात्म आणि ज्योतिष सुद्धा हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच . 

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेछ्या . चांदोमामा फक्त आमच्याच जीवनात नाही तर संपूर्ण जगात , विश्वास तुझ्या शीतल चांदण्याने  शांतता नांदूदे अशी विश्व प्रार्थना करुया .


श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क 8104639230




Tuesday, 15 October 2024

सांभाळ आपल्या भक्तजना ....

 || श्री स्वामी समर्थ ||


मनुष्याला कुठे थांबायचे ते समजत नसले तरी आपल्या गुरुना आपल्याला कुठे थांबवायचे ते बरोबर समजते . त्याची प्रचीती आपल्याला आयुष्यभर पदोपदी येत असते , पण त्या वेळी आपल्याला ती समजत नाही कारण ती समजेल इतकी अध्यात्मिक उंची आपल्या साधनेने गाठलेली नसते . जसजसे आपण ह्या मार्गात पुढे जात राहू तसे प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेचे अवलोकन करण्याची क्षमता आपल्यात येत असते . 

मन का हो तो अच्छा , लेकीन ना हो तो और भी अच्छा...ह्याची प्रचीती येते . अनेकदा आपण आपल्या नातेवाईकांकडे जायला निघतो पण बस रिक्षा काहीच मिळत नाही . आपले जाणे रहित होते कारण त्या दिवशी तिथे न जाणे हेच आपल्या हिताचे असते . एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही कारण कदाचित तिथे मित्र संगत चांगली मिळणार नसते. 

अनेकदा अगदी मनापासून आवडलेल्या स्थळा कडून नकार येतो कारण कदाचित मुलगी सतत online खरेदी करून नवर्याचे दिवाळे काढणारी असते . काही लोक आपल्याशी अचानक बोलायची बंद होतात , कारण आपल्याला समजत नाही पण त्यांचे आपल्या आयुष्यात असणे पुढे जावून आपल्याला किंवा त्यानाही त्रासदायक होणारे असते म्हणून त्यांना आपल्याशी न बोलायची बुद्धी देणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष गुरूच असतात . आयुष्यातील घटनांचा क्रम लक्ष्यात घेतला तर प्रश्न समस्या निर्माण होतात पण त्यातून आपण सही सलामत बाहेरही पडतो ते केवळ त्यांच्यामुळेच . 

जे जे काही होते आणि होणार आहे ते सर्व त्यांच्या लीला आहेत म्हणूनच ...संताच्या जे जे असेल मनी तेच येयील घडोनी , भरवसा त्यांच्या चरणी ठेवुनी स्वस्थ राहावे. अनेकदा आपण करत असलेल्या कामातून आपल्याला अलगद बाहेर काढून आपल्याला दुसर्याच कामात व्यस्त करून मार्गस्थ करणारे गुरूच असतात . महाराज आपले कधीही वाईट करत नाहीत आणि आपल्याकडून इतरांचे सुद्धा नुकसान होवून देत नाहीत . 

अनेकदा आपल्याला खूप बोलण्यासारखे असते , पण ते तोंडातून चकार शब्द काढूनच देत नाहीत , आपल्या जीवाची घालमेल होते पण कालांतरानी अश्या काही घटना ते घडवतात कि विस्मयचकित व्हयायला होते . त्यांची इच्छा हि अंतिम इच्छा हे समजून जीवन जगणाऱ्या भक्तांचे कधीही नुकसान होत नाही . त्यांनी आपल्यासाठी जे योजलेले आहे ते सर्वोत्तम असणार ह्यावर आपला संपूर्ण विश्वास आणि गुरूंवर अढळ , नितांत श्रद्धा असली पाहिजे. 

एखादी गोष्ट विलंबाने होते तेव्हा समजून जायचे ह्यात काहीतरी आहे, ह्या विलंबित काळात अनेकांचे अहंकार धुळीला मिळतात , मी मी म्हणणारे दिसेनासे होतात , आपण सर्व काही करू शकतो हा विचार किती बिनबुडाचा आहे पोकळ आहे ह्याची प्रचीती तेच दाखवतात , सहज वाटणाऱ्या गोष्टी कर्म कठीण करून ठेवतात आणि मग तो क्षण येतो जेव्हा आपलेच आपल्याला उमगू लागते आणि शेवटी आपण जेव्हा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो तेव्हा सगळा गुंता ते अलगद सोडवतात आणि प्रश्न मार्गी लावतात .

त्यांचे अस्तित्व आहेच आहे , कुणी ते मानो अथवा न मानो . क्षणोक्षणी मिळणारी त्यांची प्रचीती आपल्याला हतबुद्ध करते , अनेकदा आपल्या बुद्धीला न झेपणाऱ्या घटना प्रत्यक्ष घडतात तेव्हा डोळ्यातून नुसते अश्रू येतात आणि आपण त्यांचे अस्तित्व मान्य करू लागतो . 

ह्या ब्रम्हांडातील एका धुळीच्या कणा इतकेही अस्तित्व नसलेले आपण किती माज करत असतो , संपत्तीचा , ऐश्वर्याचा , शिक्षणाचा कि अजून कश्याचा . अरे ह्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्यांच्या समोर कसला आलाय माज . क्षणात उतरवतात ते आणि आपण आणि आपले अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सुद्धा करून देतात .

आयुष्यातील प्रत्येक घटना अर्थपूर्ण असते , आयुष्यात येणारी माणसे त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या वेळा सर्व काही ठरलेले असते फक्त ते आपल्याला माहित नसते . जे होते आहे ते आणि होणार आहे हे त्यांच्या कृपेने हे मनात पक्के झाले कि मग काश्याचेही काहीही वाटत नाही . कारण अखेरच्या क्षणापर्यंत तेच आपल्याला सांभाळणार असतात .

श्री स्वामी समर्थ 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230