Saturday, 28 June 2025

शीघ्रकोपी दीर्घद्वेषी

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रगती ,समाधान , आरोग्य आणि आनंदाला ग्रहण लावणारे – मत्सर , द्वेष , इर्षा , निंदा , तिरस्कार

समाजात अनेक विविध  स्वभावाची माणसे असतात आणि प्रत्येक माणूस हा षडरीपुनी प्रेरित आहे हे नाकारता येणार नाही. हे रिपू कमी अधिक असतील पण असतात . पण हे रिपू प्रमाणाच्या बाहेर असतात तेव्हा त्यातून मग असूया , मत्सर , द्वेष , दुसर्याला पाण्यात बघणे , निंदा , इर्षा , संताप अश्या अनेक गोष्टींची अपोआप निर्मिती होते . आपल्याला जेव्हा एखाद्याबद्दल मत्सर , द्वेष , तिरस्कार वाटतो त्याचे खरे कारण काय आहे माहित आहे का? आपण त्याचे श्रेष्ठत्व मनोमन स्वीकारलेले असते . त्याचे चालणे बोलणे लोकांच्यात सहजतेने मिसळणे , समाजातील त्याची उठबस , श्रीमंती , त्यांची बुद्धी विद्वत्ता , समाजातील दर्जा मानसन्मान ह्याची बरोबरी आपण करू शकत नाही आणि मग त्या व्यक्ती बद्दल मनात इर्षा , जळफळाट , मत्सर उत्त्पन्न होते . त्याला जे जमले ते मला नाही हि खंत असते .

 

“ मी त्याच्यासारखा का नाही ? “ ह्या प्रश्नाला उत्तर नाही. खरतर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले असतेच पण ते विसरून सतत दुसर्याची बरोबरी करायला आपण जातो आणि तिथेच संघर्ष स्पर्धा सुरु होते . त्यापेक्षा आपल्यातील चांगले गुण अधिक कसे विकसित होतील आणि आपल्याला ते आनंद कसा देतील ह्यावर लक्ष्य केंद्रित केले तर आयुष्य बदलून जायील . शिक्षण कमी असो अथवा अधिक द्वेष मत्सर करणे हि एक मानसिकता , मनोवृत्ती आहे . दुसर्याचा द्वेष मत्सर करून आपण आपल्या मनातील नको त्या विचाराना  खतपाणी घालतो पण हाती काहीच लागत नाही . उलट ह्या चुकीच्या विचारातून बर्या न होणार्या आजारांची निर्मिती मात्र होते . का सतत दुसर्याला पाण्यात बघायचे ? कुणाच्यातील काहीच चांगले दिसत नाही का आपल्याला ? 

सततचा राग काही जणांच्या डोक्यात असतो कारण त्यांना हवे तसे सुख आनंदी आयुष्य मिळालेले नसते. पण दुसर्याचा द्वेष करून ते मिळणार आहे का? नाही . उलट शुक्लकाष्ट मागे लागतील. बघा विचार नक्की करा.  आपण दुसर्याचा हेवा करून वाईट चिंतून आपलीच कर्मे वाढवून घेतो आणि ती फेडायला मग पुनरपि जननं . हे असे आहे सर्व .

आपले आयुष्य जे आणि जसे आहे ते आपण स्वीकारले तर अधिक आनंदी होवू आणि निरोगी आयुष्य जगू . देवाने प्रत्येकाचा एक कोपरा रिता ठेवला आहे. सगळ्यांना सगळे नाही दिले. प्रत्येकाला काहीतरी प्रश्न विवंचना आहे अनेकदा ती आपल्याला माहित नसते . पण एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून दुसर्याचा हेवा करणे हे त्यावर उत्तर असूच शकत नाही . प्रचंड मेहनत करणाऱ्या दोन व्यक्तींचे आयुष्य वेगवेगळे असते कारण त्यांचे प्रारब्ध वेगळे आहे . 

एखादा स्वामीना मनोभावे पुजतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते पण एखादा जन्मभर माळ ओढत राहतो पण प्रश्न सुटत नाहीत. सगळे प्रश्नही आपले आणि उत्तरही आपल्याकडेच असतात . श्री गजानन विजय ग्रंथात एक सुरेख वाक्य दासगणू महाराजांनी लिहिले आहे. कायिक वाचिक मानसिक जी पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया ... म्हणजे काय तर अगदी मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये . कारण हिशोब सगळ्याचाच होणार आहे. कुणाचे पैसे दिले नाहीत त्याचाही आणि कुणा वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत केली त्याचाही .

त्यामुळे दुसर्या सारखे यश मिळत नाही म्हणून त्याचा मत्सर करणे म्हणजे त्याच्यातील चांगले गुण स्वीकारणे पण उघड नाही तर मनोमनी . त्याला वाहवा मिळते मला नाही , त्याला सन्मान मिळतो मला नाही , त्याच्याकडे पैसा आहे संपत्ती ऐश्वर्य दारात चार गाड्या आहेत पण माझ्याकडे नाही...म्हणून त्याचा राग करून ते सर्व वैभव आपल्याला मिळणार आहे का ? नाही . 

बुद्धीची कीव करावी अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात . का मिळत नाही आहे हे सर्व आपल्याला कारण आपण कायम दुसर्याची निंदाच करतो कुणाला चांगले म्हणणे , कुणाच्या चांगल्या गुणांचे कौतुक कधी केले आहे आपण ? मोठे मन लागते त्यासाठी ते करा निदान प्रयत्न करा बघा मनावरचा ताण जायील, लोकांना आपलेसे करा सतत खोचून टोचून बोलण्यापेक्षा आणि मी इतरांच्या पेक्षा कसा शाहणा आहे हे दाखवण्यात आयुष्य व्यर्थ खर्च करण्यापेक्षा इतरांचे शहाणपण  मान्य केलेत तर सगळे तुम्हाला आपलेसे करतील ते समजणार सुद्धा नाही . शेवटी परमेश्वर हा माणसातच आहे . 

कुणा नातेवाईकाने घर घेतले अहो कष्ट केले आहेत त्यांनी करा कि जरा त्यांचे कौतुक , सदा सर्वकाळ सगळ्यांनी तुमचीच वाहवा करायची कि काय ? दुसर्या कुणाला अक्कल नाही का? सगळी अक्कल फक्त आणि सगळे चांगले गुण तुम्हालाच दिले आहेत कि काय देवाने ? डोळे उघडा जरा आजूबाजूला बघा , मन मोठे करा , सतत देश करण्यापेक्षा कौतुकाने पाठीवर शाबासकीचा हात फिरवा बघा हीच शाबासकी काही दिवसात तुम्हालाही मिळेल . कुणी विद्यार्थी पास झाला करा कि त्याचे अभिनंदन . कुणी नवीन ड्रेस घेतला , घर सजवले , नवीन वास्तू घेतली , कुणाचे लग्न ठरले , कुणाला कसले बक्षीस मिळाले त्यांचे भरभरून कौतुक करा , आनंद साजरा करा त्यांच्यासोबत कारण जे जे द्याल तेच दुप्पट होवून तुम्हालाच परत मिळणार आहे . द्वेष कराल , मत्सर कराल तेच तुमच्याही कडे परत येयील तेही दाम दुप्पटीने. सृष्टीचा नियम आहे जे द्याल तेच परत मिळणार .

दुसर्याच्या आनंदात सहभागी होवून आपली कर्म कमी करण्याची संधी देव आपल्याला देत असतो आणि सोबत आपली परीक्षाही पाहत असतो ज्यात अनेकदा आपण पूर्णतः नापासच होत असतो. 

द्वेष , मत्सर हा मनाला जडलेला आजार आहे. दुसर्याचे चांगले न बघवणे हा मानसिक आजार आहे ज्यातून फक्त आणि फक्त मोठ्या आजारांची नांदी मात्र होते. म्हणतात न घरचे विचारात नाही , दिव्याखाली अंधार तसे जग आहे आता . आपल्या अगदी लहान सहान गोष्टींचे कौतुक जगभर होते पण घरचे विचारत नाहीत. ज्यांच्या सोबत वाढलो मोठे झालो त्यांच्याबद्दल प्रेम नाही उलट तिरस्कार द्वेष का? कश्यासाठी ? जो तो आपापले जगतोय , कोण कुणाचे खातो आपला राम आपल्याला देतो. 

निंदा नालस्ती करून आजार निर्माण होतात शरीरात आपण आपली कर्मे पापे वाढवून घेतो . असा जळफळाट करून समोरच्याचे काही वाईट होत नाही , वाट लागते ती आपली तीही कायमची. आहे ती संपत्तीही जाते आणि मनावर पापांचे थर चढून शरीर मन दुर्बल होते . आपला राग समोरच्याची प्रगती थांबवेल इतके पुण्य नाही आपल्या पदरी . 

मत्सर करणे हि एक वृत्ती आहे जी अर्थात वाईट आहे आणि आपण काहीही चांगले करू शकत नाही ह्याची पोचपावती सुद्धा आहे. कुणाचेही चांगले पाहवत नाही कारण आपले काहीच चांगले नाही , जो तो आपापले नशीब घेवून येणार आणि जाणार . आपण निंदा करून न सूर्याचे तेज कमी होणार ना इतर ग्रहांच्या गतीत फरक पडणार , आपल्या आनंदाला , आयुष्यातील प्रगतीला ग्रहण मात्र नक्कीच लागेल .

दीर्घद्वेषी आणि शीघ्र कोपी माणसांनी दुसर्याचा केलेला द्वेष , मत्सर अनारोग्याच्या पायर्या आहेत मग आहेच BP, पक्षाघात आणि अजून बरच काही ...अश्या माणसांचे आयुष्य बघा खायची जगायची भ्रांत असते. दुसर्याच्या उपकारावर जगावे लागते .नखशिखांत अहंकार शरीर मन पोखरून काढतो आणि ओंजळीतून सगळेच निघून जाते ...

हवी कश्याला दुसर्याची बरोबरी . आपण जसे आहोत तसे छानच आहोत कि .

वेळीच सावरा ...परमेश्वर माफ करायलाच बसलेला आहे .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


Friday, 27 June 2025

राजेशाही थाट ( सिंह लग्न )

 || श्री स्वामी समर्थ ||




काही दिवसात बर्याच सिंह लग्नाच्या पत्रिका पहिल्या म्हणून आज ह्या लग्नाविषयी लिहावेसे वाटले. सिंह म्हणजे वनाचा राजा आणि राजा म्हंटला कि सगळा तामझाम आलाच . राजासारखा राजाच असतो नाही का. सिंह हि राजराशी आहे राशीचा स्वामी ग्रह हा रवी आहे आणि रवी चे अस्तित्व अबाधित आहे सर्व ग्रहानी त्याचे वर्चस्व , अधिपत्य मान्य केले आहे म्हणूनच त्याच्या भोवती सौर मंडळात सर्व ग्रह त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत आपापल्या गतीने भ्रमण करत असतात .

सिंह राशी हि पाचवी राशी असून काल पुरुषाच्या कुंडलीत ती पंचम भावात येते. पंचम भाव हा धर्म त्रिकोणातील गाभा असून पुर्व जन्माशी जोडलेला आहे तसेच त्याला कोण स्थान सुद्धा म्हंटलेले आहे. चतुर्थ ( काही ग्रंथ ), पंचम भावावरून आपण आपले हृदय पाहतो आणि म्हणून पंचम भाव शुद्ध असेल तर हृदय दुसर्यासाठी धडकत राहते शेवटपर्यंत. पंचम भाव म्हणजे प्रेम प्रणय विद्या संतती कला खेळ ज्योतिष तंत्र मंत्र आणि शेअर मार्केट सुद्धा .

सिंह लग्न हे अध्यात्मिकता दर्शवते. हे लोक पंचमेश गुरु असल्यामुळे देवावर विश्वास श्रद्धा असणारे असतात . राजाच्या दरबारी सुद्धा राज गुरु , राज पुरोहित , राज ज्योतिषी असत . गुरुतुल्य व्यक्तींचा राजा नेहमीच आदर सन्मान करत असे. तसेच हे लोक सुद्धा असतात . गुरु म्हणजे ज्ञान आणि गुरूची धनु राशी पंचमात आल्यामुळे हे लोक ज्ञान पिपासू , सत्शील असतात . राजाचे सर्व गुण ह्यांच्या ठायी असतात . अनेकदा हलक्या कानाचे स्तुतीप्रिय असतात . ह्यांना सतत कुणीतरी वाह वा म्हणायला लागते. रविचे लग्न असल्यामुळे मुळात शारीरिक ताकद उत्तम ,उत्तम जीवनशक्ती , व्यायामाची आवड , शारीरिक कष्टाला न घाबरणारे , जिद्द त्याच सोबत अहंकार , ओतप्रोत मी पणा हेही गुण उपजत असतात . करारी तडफदार नेतृत्व गुण असल्यामुळे मोठ मोठी पदे भूषवतात  . अंगावर घेतलेले  काम जबाबदारीने पूर्णत्वाला नेतात . संघटन कौशल्य असते. दिलदार , प्रेमळ आणि ईश्वरावर प्रचंड श्रद्धा .

प्रत्येक गोष्ट अर्थात राजा असल्यामुळे उत्तम लागते. ह्यांना दुय्यम स्थान पचनी पडत नाही. खाईन तर तुपाशी असली अवस्था असते. रवी भोवती इतर ग्रह फेर धरून भ्रमण करतात तसे प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा त्यांच्या भोवती खुशमस्करे अवती भोवती असेल कि ते मनातून सुखावतात . 

ग्रहांचा राजा त्यामुळे दानशूर , कलाकारांचा सन्मान करणारा , प्रजेचे हित पाहणारा राजा कुणाला त्रास देत नाही . कुणाचे अहित करणार नाही , परोपकारी , तत्वनिष्ठ , न्याय प्रिय पण अहंकारी मानी वृत्ती चा असतो. राजावर कुणी वर्चस्व गाजवलेले आवडत नाही .स्वतःचे व्यक्ति स्वातंत्र जपणारे हे लोक असतात .कर्तुत्व अफाट पण मानी स्वभाव त्यामुळे अनेकदा माणसे तुटतात , दुरावतात . स्वाभिमान असतो , धाडसी असतात . मंगळ लग्नाला योग कारक ग्रह आहे. राजाचा सेनापती चांगल्या स्थानी आणि चांगल्या नक्षत्रात असेल तर मंगळाची दशा उत्तम जाते. सिंह लग्नाचे लोक सतत इतरांना मदत करणारे, परिणामांची धास्ती न बाळगणारे असतात .खरेपणा , कष्टाळू , धार्मिकता असते . शासनाचे नियम तंतोतंत पाळणारे असतात .

अग्नितत्वाचे हे लग्न असल्यामुळे धर्म त्रिकोणात सगळ्या अग्नी राशी येतात . राजा असल्यामुळे थोडीशी हुकुमशाही वृत्ती , धाडस , जिद्द , अधिकाराचे तेज आणि लालसा असणारे, विवेकी , आचार विचारांनी शुद्ध स्विक राहणीमान , अत्यंत मोकळ्या मानाने जगणारे , उत्साही असतात . देवावर श्रद्धा त्यामुळे उत्तम साधना , ध्यान तेजस्वी व्यक्तिमत्व , रुबाबदार राहणीमान असते. कलासक्त , थोडेसे गर्विष्ठ आणि थोडा मी मी पण असतोच. अग्नीतत्व असल्यामुळे आणि सकारात्मकता असल्यामुळे आजारातून लवकर बरे होतात . व्यायामाची आवड असते. अहंकारी वृत्तीचा त्याग केला तर जनमानसात त्यांच्यासारखी आपलीशी वाटणारी व्यक्ती दुसरी नाही.  

खोटेपणा अंगी नसतो , उंची खाणे पिणे , पेहराव जीवनशैली पसंत करतात . लग्नेश रवी सुस्थितीत असेल तर आरोग्य उत्तम असते. सिंह लग्नाला  शनी  अनिष्ट ग्रह आहे त्यामुळे त्यांच्या दशा त्रासदायक असतात .  सतत वाचन मनन चिंतन आवडते . लाभेश बुधाची राशी असल्यामुळे सर्व वयोगटाच्या लोकांशी त्यांचे जमते. व्यासंग दांडगा असतो. 

मनात काही नसले तरी वागण्यातून बोलण्यातून मी म्हणजे कोण हि भावना डोकावते त्यामुळे अनेकवेळा ते एकटे राहतात . इतरांचे गुण आपलेसे न करणे हा स्वभाव त्यांना एकांतात नेतो . नामस्मरण , जप करून उत्तम साधक होण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते. राजा असल्यामुळे राजकीय क्षेत्र , मोठे व्यवसाय , मोठी पदे, व्यवस्थापन क्षेत्र ह्यात नेत्रदिपक कामगिरी करतात . स्वकष्टाने आयुष्यात पुढे येतात कारण कष्टाला कमी पडत नाहीत . मनापासून मित्र जपणारे असतात . लोकांच्यात रमणारे , कलासक्त असतात . सिंह लग्नाचे लोक चारचौघात नेहमीच उठून दिसतात . सप्तमेश शनी असल्यामुळे वैवाहिक सौख्य कमी अधिक असू शकते आणि त्यात त्यांना थोडे अपयश सुद्धा येते किंवा सर्वार्थाने संसारात तडजोड करावी लागते आणि तो त्यांचा मुळ स्वभाव नसल्यामुळे त्यांना अधिक कष्ट होतात .

सिंह हा राजा आहे आणि प्रजेचे हित जपणारा आहे. पंचमात चंद्र असेल तर प्रेमळ , सर्वांच्यात मध्यभागी असण्याचा प्रयत्न असतो. दानशूर , महत्वाकांक्षी , शूर , निडर पण तितकाच संवेदनशील व्यक्ती , धर्माचे आचरण करणारा आणि सगळ्यात असूनही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवणारा हा सिंह लग्नाचा जातक डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही आणि आपण आपल्याही नकळत त्याच्यासमोर नतमस्तक होतो. त्याच्या तेजामुळे फक्त सौरमंडळ नाहीतर संपूर्ण पृथ्वी तेजोमय होते. विशाल हृदयाचा , कनवाळू , दुसर्याचे दुक्ख समजून घेणारा आणि वेळीच मदतीचा हात पुढे करणारा .अनेकदा त्यांना महत्व दिले नाही किंवा दुय्यम स्थान दिले तर खपत नाही. 

स्पर्धा इर्षा आणि अहंकार ह्या गोष्टीना तिलांजली दिली तर सिंह जातका सारखा जातक नाही. सिंह राशीत रवी मंगळा सारखे ग्रह आले तर अरेरावी अहंकार ह्या दुर्गुणांच्या मुळे पिछाडीला जावू शकतात . हे गुण आटोक्यात राहिले तर उत्तम संघटन कौशल्य आणि नेतृत्व करतील . गुरुतुल्य असतात , मनन चिंतन , अध्यात्म ह्यात जीवन व्यतीत होते . खोटेपणाचा लवलेश नसतो , पण अति स्पष्टवक्ते असतात , आतबाहेर एकच वर्तन असते , माघार घेणे , झुकणे  माहित नसते त्यामुळे अनेकदा नाती संबंध तुटतात . सहसा आपली चूक मान्य करत नाहीत .शनी सप्तमेश त्यामुळे वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. समजात  जीवनात उठून दिसतात कारण काहीतरी असामान्य असे देवून जातात .  


आपल्या ओळखीत सिंह लग्नाचे लोक असतील तर ह्या सर्व गुणांचा आरसा त्यांच्यात नक्कीच बघायला मिळेल . राजासारखी राहणी आणि व्यक्तिमत्व असणार्या ह्या सिंह जातकांना मानाचा सलाम.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Thursday, 26 June 2025

समुद्र बनून जगून बघा ....

 || श्री स्वामी समर्थ ||


एक लाट आली त्याची चप्पल वाहून गेली त्याने लिहिले समुद्र चोर आहे .

एका म्हातारया माणसाला समुद्रावर शिंपले दिसले त्यात मोती होते , मोत्यांमुळे त्याचे आयुष्य बदलले त्याच्या मते समुद्र दानशूर आहे .

मासेमारी करणार्यांना पुष्कळ मासे मिळाले ते म्हणाले समुद्र अन्नदाता आहे.

आजीचा मुलगा समुद्रात गेला आणि गेलाच तिच्यामते समुद्र खुन्यापेक्षाही वाईट आहे .

एक लाट आली आणि सर्वकाही मिटवून गेली. समुद्राला कुणाशीही काहीही देणेघेणे नाही . 

आपण सुद्धा आयुष्यात समुद्रासारखे जगले पाहिजे , आपण आपले काम करत राहायचे . कोण काय म्हणतय त्याकडे लक्ष्य न देता नामस्मरण करत आपले कर्म करत राहावे . 

जोवर स्वार्थ आहे तोवर लोक आपले म्हणतात आणि स्वार्थ साधला कि आपलीच बदनामी करतात .

परमेश्वराची सत्ता अगाध आहे त्याच्या दृष्टीतून काहीच सुटत नाही , वेळ आली कि एकदाच सगळे हिशोब करतो ...कायमचे..मग कितीही मुखवटे लावून जगा ..दुक्ख वेदना पाठ सोडत नाहीत . 

शनी आपल्या आतच आहे . त्याला वेगळे काहीही सांगायची गरज नाही कारण तो आपल्या श्वासातच विराजमान आहे. लो प्रोफाईल जगा. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांचा विसर पडू देवू नका ...गरज सरो ...केले तर मग आहेच पुढचा अध्याय. 

१३ जुलै शनी वक्री होतोय ...सर्वाना सुबुद्धी व्हावी .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Wednesday, 25 June 2025

महादशा कि राजयोग ?? महत्वाचे काय ??

 || श्री स्वामी समर्थ ||




ग्रहांचा मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आणि आपल्या जीवनावर त्यांचा विशिष्ठ ठसा सुद्धा आहे . प्रत्येक ग्रह आपल्या दशेत आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव टाकत असतो. दशा म्हणजे ग्रहाला दिलेला कालावधी ज्यात ग्रह ज्या भावात आहे तो भाव , त्याच्या राशी जिथे आहेत तेही भाव , तो ज्या नक्षत्रात आहे तो नक्षत्रस्वामी ज्या भावात आहे तोही भाव , ग्रह दृष्टी टाकतो ते भाव असे सर्व फळे देण्यास उत्सुक होतात . अजून खोलात शिरले तर उप नक्षत्र स्वामीही आहेच. 

आपल्या पत्रिकेत अनेक ग्रह स्वराशीत , उच्च अवस्थेत असून अनेकदा त्यांचा राजयोग सुद्धा होत असतो . प्रत्येक वेळी हे राजयोग फलित देतात का? तर नाही. ग्रहांची फलिते हि संपूर्णतः आपल्या दशा अंतरदशेवर अवलंबून असतात . उदा. एखाद्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा किंवा बलवान आहे. पण त्याची दशाच आली नाही तर त्याची सर्वात उच्च फळे आपल्याला अनुभवताच येणार नाहीत . इतर ग्रहांच्या दशेत शुक्राची अंतर्दशा येयील तेव्हा थोडी फळे अनुभवायला मिळतील पण महादशा म्हणून शुक्र येणे वेगळे ती फळे मिळणार नाहीत .

अश्या वेळी शुक्र पत्रिकेत कितीही बलवान असला तरी त्याची दशा नसल्यामुळे त्याची फळे मिळणार नाहीत . म्हणूनच आयुष्यात राजयोग तेव्हाच फलित देतात जेव्हा त्या ग्रहाच्या दशा अंतर्दशा असतात . एकदा एका व्यक्तीची शुक्राची दशा ६५ व्या वर्षी आली. आयुष्यात कधी बायकोला गजरा न आणलेला व्यक्ती बायकोला गजरा आणू लागला, तिच्यासोबत वेळ घालवू लागला, आपण ह्या टूर ला जावू त्या प्रदर्शनाला सिनेमाला जावू असे होवू लागले. हीच शुक्राची दशा त्यांच्या ऐन तारुण्यात आली असती तर अनेक सुखांची दालने तेव्हाच उघडली असती. 

प्रत्येक ग्रहाला अमुक एक काळ दिलेला आहे जसे रविला ६ वर्ष मंगळाला ७ वर्ष , सर्वात अधिक काळ शनीला १९ राहुला १८ वर्ष असा दिलेला आहे. आपल्या पत्रिकेत तो ग्रह चांगला असेल तर ती दशाही चांगली जायील अन्यथा नाही. दशा संपूर्ण चांगली वाईट नसते कारण मध्ये मध्ये अंतर्दशा सुद्धा येतात आणि त्यांचे ग्रह कसे आहेत त्यावर त्यांचे फलित असते. 

अनेकदा माझा अमुक ग्रह स्वराशीत किंवा उच्चीचा आहे पण त्याचे फल मिळत नाही कारण त्याच्या दशेतच ग्रह सर्वाधिक फळे देतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यावेळी आवश्यक ग्रहाची दशा आली तर उपयुक्त ठरते . जसे शुक्र हा आनंद पर्यटन विलास खरेदी भिन्नलिंगी आकर्षण विवाह तारुण्य मौजमजा  दागिने अत्तरे फुले एकंदरीत भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे त्याची दशा २० वर्षाची असून ती ऐन उमेदीत आली तरच त्याचा पूर्ण उपभोग घेता येयील. शुक्राची दशा आयुष्याच्या उत्तरार्धात येवून उपयोग नाही . आयुष्याच्या संध्याकाळी विरक्त अश्या शनीची दशा आली तर त्यावेळी योग्य अशी अध्यात्मिक वाटचाल आणि शांत विरक्त जीवन जगता येयील.

पत्रीकेतील राजयोगापेक्षाही अत्यंत प्रभावशाली असतात त्या महादशा . प्रत्येक घटना घडवण्याचा काळ निश्चित करण्याचा संपूर्ण हक्क आणि अधिकार राखून ठेवणार्या महादशा सगळे लगाम आपल्याकडे ठेवतात . त्यांच्या अभ्यासा शिवाय घटनेची वेळ सांगता येत नाही. त्यामुळे त्या सर्वप्रथम लक्ष्यात घ्याव्या लागतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष म्हणजे चुकीचे भाकीत .राजयोग करणाऱ्या ग्रहाची दशा येते तेव्हाच त्या राजयोगा ची फलिते प्राप्त होतात .

 आपले जन्मस्थ नक्षत्र जे असते त्या ग्रहाची दशा आपल्याला जन्मतः असते. उदा. जर सिंह राशीतील केतूच्या मघा नक्षत्रात जन्म झाला तर केतू दशेने आयुष्याची सुरवात होते. पुढे शुक्र रवी चंद्र मंगळ राहू गुरु शनी बुध ह्या क्रमाने दशा येत राहतात . सगळ्या ग्रहांच्या दशा आपण भोगू शकत नाही , आपल्या आयुष्य मर्यादेवर ते अवलंबून असते.

दशे मध्ये येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा महत्वाच्या असतात . खरतर अंतर्दशा ह्या सगळ्यात बलवान असतात . त्यामुळे शुक्र ह्या ग्रहाची २० वर्षाची दशा सातत्त्याने चांगली अथवा वाईट जाणार नाही कारण त्यात येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या असतात . 

प्रत्येक ग्रहाचे फळ कर्माशी बांधील आहे . म्हणूनच आपल्या कर्मानुसार ग्रह फळ देत असतात . ग्रहांना दोष देणे बंद केले पाहिजे कारण शेवटी कर्म हि आपलीच असतात . अनेकदा माझा हा ग्रह उच्चीचा आहे वगैरे आपण ऐकतो पण मग हव्या त्या घटना का नाही घडत ? 


ह्याला अनुसरून एक लहानसे उदा. द्यावेसे वाटते. मध्यंतरी एका मुलाची पत्रिका पहिली. प्रश्न विवाहाचा होता . वय ३४ च्या आसपास होते . त्याची आई मुलाचे तोंडभरून कौतुक सांगत होती. आईला कौतुक असणारच न आपल्या मुलाचे . कौतुक करण्यासारखी करिअर , पैसा दिसणे सर्व काही उत्तम होते पण विवाह अजूनही झाला नव्हता . त्या म्हणाल्या मुली इतक्या सांगून  येत आहेत पण काय अडते समजत नाही . 

आज मुली सुद्धा ३४-३५ ला लग्न करतात त्यामुळे आजकाल हे वय म्हणजे उशीर असेही म्हणता येत नव्हते. अगदी १०० च्या वरती मुली पाहून झाल्या अनेक सोशल साईट वरून पण लग्न जमत नव्हते . 

ह्या मुलाची पत्रिका पाहिल्यावर लक्ष्यात आले वैवाहिक सुखाचा कारक बिघडला होता आणि मुख्य म्हणजे षष्ठ भावाची दशा चालू होती. षष्ठेशाच्या  नक्षत्रात एकही ग्रह नाही त्यामुळे षष्ठ भावाचा तो एकमेव कार्येश होता. आता त्याची दशा ७ व्या भावाचे सुख कसे देणार . ती दशा सोडून द्यावी लागणार म्हणजे त्याचे वय ४५ च्या पुढे जाणार. असो.

मुख्य मुद्दा असा कि महादशा स्वामीचा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय गाडी हलणार नाही . म्हणूनच संपूर्ण पत्रिकेचा सखोल अभ्यास महत्वाचा . नुसता गोचर गुरु रवी फिरवून लग्न होत नाही. शास्त्र अचूक उत्तर देतेच देते , अभ्यास  परिपूर्ण हवा .


सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Tuesday, 24 June 2025

रेशीमगाठी भाग १० – प्रेमविवाह

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यात प्रेमाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्यावर मनापासून अपेक्षा विरहित प्रेम करणारे कुणीतरी आहे हि भावना जीवन जगायला पुरेशी आहे. असे प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत अखंड आयुष्य एकत्र घालवणे हा ईश्वरी आशीर्वादच आहे . प्रेम कुणावर होईल सांगता येणार नाही . स्वतःच्या जातीतील प्रेम विवाहाला अनेकदा कटकटी किंवा विरोध होतो  तर आंतरजातीय किंवा अधर्मीय विवाहाला कश्या प्रतिक्रिया असतील ह्याचा विचार होणे आवश्यक आहे.  राहू केतू  परजातीत सुद्धा विवाह करवतात  तसेच शनी हा विजोड जोडीदार देतो . प्रेमाचा ग्रह हा शुक्र आहे .चंद्र नेप हेही स्त्रीग्रह असल्यामुळे त्यांचा विचार करावा. स्थानांचा विचार केला तर ५ ७ ९ आणि लग्नस्थान हि स्थाने प्रेम विवाहासाठी पोषक असतात . वृषभ ,तूळ , मिथुन ,कर्क ,वृश्चिक आणि मीन ह्या राशी चा विचार केला पाहिजे.  पत्रिकेत चंद्र राहू , शुक्र राहू ,सप्तमेशा बरोबर राहूची युती असेल तर आंतरजातीय प्रेम विवाह होऊ शकतो.  शुक्रासोबत राहू किंवा केतू असेल तर रूढीबाह्य विवाहाकडे कल राहील. सप्तमेश ,सप्तम स्थानातील ग्रह आणि शुक्र जर राहू किंवा केतूच्या ,शनिच्या नक्षत्रात असतील . सप्तम स्थानात चंद्र शुक्र मंगळ हे ग्रह असतील आणि ते राहू केतू शनी ह्यांच्या युतीत असतील . सप्तमेश शनी पंचम स्थानात किंवा सप्तम स्थानात शुक्र राहू युती असेल तर. पंचमेश , सप्तमेश किंवा भाग्येश ह्यांचे मालक राहू केतूच्या युतीत असून  ५ ७ ९ १ ह्या स्थानात असतील तर प्रेम विवाहाची शक्यता असते.

प्रेम हि निसर्गाची देणगी आहे तसेच भिन्नलिंगी आकर्षण हे सुद्धा नैसर्गिक आहे. तरुण पणात कुणीतरी आपल्याला आवडते तसेच कुणालातरी आपण आवडावे ह्या भावना मनात निर्माण होतात .आज मुले मुली ह्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावल्यामुळे आर्थिक स्थर सुद्धा उंचावला आहे , त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास सांगतो कि मी माझा जोडीदार पसंत करु शकतो , स्वतंत्र विचारसरणीचा , स्व कर्तुत्वावर पुढे येणारा जोडीदार आजकालच्या मुलांचा कल आहे तरीही आजही पालकांना आपल्या मुलांचे लग्न आपणच ठरवावे असे वाटते .

प्रेम होते पण त्या प्रेमाची परिणीती विवाहात फार कमी जणांची होते. असे असले तरी प्रेम विवाहाचे प्रमाण वाढत आहे. प्रेम आणि प्रेमविवाह ह्याचा सर्वांगीण विचार करताना ५ ७ ११ १ ह्या स्थानांचा विचार केला पाहिजे. तसेच चंद्र शुक्र आणि नेप ह्या ग्रहांचा विचार केला पाहिजे. मंगळ हा विलासी , कामप्रधान ग्रह असल्यामुळे शारीरिक संबंधा साठी त्याचा विचार केला पाहिजे. वृषभ कर्क तूळ मिथुन वृश्चिक आणि मीन ह्या राशींचा विचार केला पाहिजे. प्रेम भाव फुलण्यासाठी लग्न पंचम नवम लाभ स्थानात शुक्र चंद्र नेप ह्यासारखे ग्रह असणे . चंद्र शुक्र मंगळ नेप असे ग्रह जर पत्रिकेत वृषभ कर्क तूळ मिथुन वृश्चिक मीन ह्या राशीत उत्तम फळ देतील. शुक्र मंगळाच्या किंवा मंगळ शुक्राच्या राशीत असेल तर प्रेमात पडण्याचे योग येतात. सप्तमात किंवा पंचमात हर्शल नेप ह्यासारखे  ग्रह असतील तर जगावेगळे प्रेम होते .अचानक होते आणि अचानक संपते सुद्धा .५ ७ ११ १ मध्ये जर बुध शुक्र युती असेल तर आणि हि युती प्रेमाच्या राशीत असेल तर एकापेक्षा अधिक प्रेम संबंध असू शकतात .

चंद्र शुक्र , बुध शुक्र ,शुक्र मंगळ ,शुक्र नेप ,हर्शल नेप अश्या युती असतील तर व्यक्ती चे प्रेमसंबंध होतात. पंचमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध आला तर अनेक प्रेम प्रकरणे घडू शकतात. श्रवण नक्षत्र हे शापित आहे त्यात असणार्या ग्रहांना सुद्धा अशुभत्व येते . १ ७ ५ ९ ११ १ ह्यांच्या स्वामींचा एकमेकांशी संबंध आला . लग्नेश सप्तमात किंवा सप्तमेश लग्नात किंवा सप्तमेश सप्तम स्थानात . पंचमेश सप्तमात आणि सप्तमेश पंचम स्थानात . पंचमेश सप्तमेश ,पंचमेश भाग्येश , सप्तमेश भाग्येश ह्यांची युती कुठेही असेल तर. शुक्र नेप ,शुक्र हर्शल ,शुक्र मंगळ युती असेल तर ज्यावर प्रेम केले त्याच्याशीच लग्न करायची इच्छा असते . लग्नेशाचा पंचमेश ,सप्तमेश किंवा भाग्येशाशी संबंध आला तर आपल्या पसंतीने लग्न करते.५ ७ ९ ह्या स्थानात चंद्र शुक्र ,नेप किंवा मंगळ असे ग्रह एकटे किंवा एकमेकांच्या युतीत असतील तर . शुक्र लग्नस्थानी किंवा शुक्र चंद्र नवपंचम योग असेल तर वरील नियमांपैकी जास्तीतजास्त नियम एकाच कुंडलीत असतील तर प्रेमविवाह होतो. सप्तमेश आणि व्ययेश एकत्र आले तर घटस्फोट होऊ शकतो .

प्रेम फुलते तेव्हाच खर्या अर्थाने जीवन फुलते. प्रेमाची भावना नसेल तर जीवन निरस होईल . कुणीतरी आपल्यावर प्रेम करते आहे हि भावना जीवन जगायला पुरेशी आहे. सहमत ????

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Sunday, 22 June 2025

क्रोध

 || श्री स्वामी समर्थ ||



एक जोडपे ४-५ दिवसांसाठी एका रिसोर्ट मध्ये राहायला गेले. एकमेकांच्या सोबत एक छानसे वेकेशन घालवणार म्हणून खूप मजेत होते. तिथे गेल्यावर त्या मुलाच्या लक्ष्यात आले कि आपल्याला दिलेली रूम हि सी फेसिंग नाही म्हणजेच आपल्या खोलीतून समुद्र दिसतच नाही. त्याला राग आला आणि तरातरा तो तेथील मुख्य व्यक्तीला म्हणाला कि आमची खोली सीफेसिंग नाही. ह्यावर ते म्हणाले कि इथे बुकिंग करताना तुम्ही जर आम्हाला सी फेसिंग रूम हवी आहे असे सांगितले असते तर आम्ही नक्कीच अशी रूम दिली असती पण तुम्ही तसे काहीही सांगितले नव्हते . आताही देवू शकणार नाही कारण सर्व रूम  बुक झाल्या आहेत . हे म्हंटल्यावर त्याच्या रागाचा पारा अधिकच चढला आणि त्याने त्या हॉटेल त्या मालकाला बोलावले आणि त्यालाही हाच प्रश्न विचारला. त्यानेही तेच उत्तर दिले त्यावर तो मुलगा खूप जास्ती चिडला आणि रूम मधे जावून त्याने घडलेला सर्व प्रसंग त्याच्या पत्नीला सांगितला.

पत्नी समजूतदार होती . तिने त्याला सांगितले सगळ्यात महत्वाचे काय आहे? तर आपण एकमेकांच्या सोबत एकत्र वेळ घालवणे . आपल्या खोलीतून समुद्र दिसणे हे महत्वाचे अजिबात नाही. आपल्याला वाटले तर रोज आपण समुद्रावर एक मस्त फेरी मारून येत जावू . त्यावर मुलगा अधिकच भडकला. झाले.. त्या दोघांच्यात तू तू मैमै सुरु झाले आणि पुढील ५-६ दिवस ना ते एकत्र जेवले ना ते एकत्र फिरले. त्यांच्यातील संवाद जणू संपला आणि ज्या मेमरीज ते मिळवण्यासाठी आले होते . जे आनंदाचे क्षण ते जगायला आले होते ते न उप्भाग्तच ते निघून गेले. 

वेकेशन संपली पण त्यातून आनंद मिळाला नाही उलट डोक्याला ताप झाला. खरेतर चूक त्या मुलाचीच होती . समुद्र रूम मधून दिसावा अशी सूचना करून त्याने बुकिंग केले असते तर पुढील सर्वच टळले असते. कुठली गोष्ट किती ताणून धरायची हे महत्वाचे असते . राग राग राग कसला राग इतका ? आणि दुसर्याला वाट्टेल तसे बोलायचं अधिकार दिला कुणी तुम्हाला  ? स्वतःचाही आनंद घालवायचा आणि इतरांचाही . घरातील एकवेळ ऐकून घेतील पण बाहेरचे कुणी का ऐकून घ्यायचे ? 

सांगायचे तात्पर्य असे कि आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. आयुष्यात आपण सगळ्यांना आवडत नाही आणि सगळे आपल्यालाही आवडत नाहीत पण तरीही अश्या लोकांसोबत उठबस करावी लागते तेव्हा चार हात दूर राहणे पसंत केले तर सोपे होते. अनेकदा घरात , कामाच्या ठिकाणी अनेक व्याप असतात , असंख्य गोष्टीनी आपले आयुष्य आज घेरलेले आहे त्यात आर्थिक चिंता आणि आयुष्यात निर्माण झालेली अनिश्चीतता , संघर्ष करायला लावते. अश्या सर्वातून आपले आयुष्य आज जात असताना राग येणार. पण कुठल्या हि गोष्टीचा अतिरेक आपली स्वतःची तब्येत तर बिघडवण्यास आणि कुटुंबातील आनंदाला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरतो. 

समाजजीवन जगताना ज्यांना क्रोध येतो किंवा ज्यांना समोरच्या शाब्दिक चकमकी करून दुसर्याला दुखावून सगळेच वातावरण गढूळ करण्याची सवय आहे त्यांनी समाजातील कुठल्याही कामात पडू नये . कारण त्यामुळे माणसे दुखावतात आणि ती हि कायमचीच...

सर्वात महत्वाचे आपण आणि आपले कुटुंब . त्यामुळे आपले आरोग्य जपा , आपल्या माणसाना आपण हवे आहोत .कालच योग दिवस झाला आहे  तो फक्त कालच्याच पुरता मर्यादित नसून “ योग “ हि आयुष्यातील आनंदाची द्वारे उघडणारी गुरुकिल्ली आहे. 

तसेही शेवटी माणसाना दुखावून आपल्याला मिळणार तरी काय ? माणसे जपणे हि एक कला आहे आणि ती आज प्रत्येकाने आवडो अथवा न आवडो शिकलीच पाहिजे तरच आपले आणि इतरांचेही आयुष्य सुसह्य होयील.

माणसे जपणे म्हणजे माणसातील परमेश वर जपणे . असतात तेव्हा माणसांचे महत्व नसते पण नसली कि आपण केलेल्या चुका आठवतात आणि पश्चात्ताप करण्याशिवाय गत्यंतर उरत नाही . माणसे जोडायला आयुष्य खर्ची होते पण तुटायला तोडायला एक क्षण पुरेसा असतो .

ज्यांना रागावर ताबा मिळवायचा आहे त्यांनी भरपूर व्यायाम करा तुमची सगळी एनर्जी तिथे खर्ची करा . अहंकारातून क्रोधाची निर्मिती आणि ते दुष्टचक्र चालूच राहते त्यामुळे हनुमान चालीसा रामरक्षा नित्य म्हणावी . स्वामी समर्थांचा जप नित्य उपासनेत असावा. 

जुलै अखेरपर्यंत मंगळ केतू युती आहे . १३ जुलै ला शनी महाराज सुद्धा वक्री होणार आहेत आणि ते ह्या दोन ग्रहांच्या षडाष्टकात असणार आहेत तेव्हा आयुष्याचे , मैत्रीचे , हितसंबंध ह्यातील सूर बेसुरे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आहे सर्वानीच . 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Saturday, 21 June 2025

रेशीमगाठी भाग- 8 मंगळ

 

|| श्री स्वामी समर्थ ||



पत्रिकेतील मंगळाबद्दल अधिक जाणून घेवूया . पुरुषाला वैवाहिक सुख हे शुक्रावरून पहिले जाते तसेच स्त्रीसाठी मंगळ आणि गुरु महत्वाचे आहेत .शुक्र शनी युती असेल तर अनैकता होताना दिसत नाही .स्वतःवर संयम असतो . स्त्री पत्रिकेत मंगळावर गुरूची दृष्टी असेल तर सहसा चारित्र चांगले असते .पुरुषाच्या पत्रिकेत मंगळ शुक्र युती हि मैत्रीसाठी हात पुढे करायला थोडे धाडस देते. मंगळ शुक्र कामवासना अधिक असू शकते .बुध हा थोडा नपुंसकतेकडे नेणारा आहे. बुध हा पैशाचा ग्रह आहे. पैसा हेच सुख शुक्र राहू हा भोग भोगवणारा  तर शुक्र राहू हा निरस .शुक्र चांगला असतो त्या स्त्रीच्या अंगावर हिर्याचे  दागिने असतात .अन्न ,वस्त्र निवारा आणि बुटी पार्लर ह्या तिच्या मुख्य गरजा असतात . स्त्रीच्या पत्रिकेत शुक्र शनी युती छानछोकीची आवड देणार नाही .समाजातील उच्च वर्तुळातील स्त्रिया बघा .शुक्र राहू fashion करणारे असतात . शुक्र रवी असेल तर नवरा कमावणारा असतो आणि त्याच्या पदामुळे तिला मान मिळतो .गुरु शुक्र पुरुषांच्या पत्रिकेत जितका वाईट जातो तितका स्त्री च्या पत्रिकेत जात नाही .स्त्रीचे वैवाहिक जीवन हे मुख्यत्वे मंगळावर अवलंबून असते . गुरूमुळे वैवाहिक सुख तर मंगळामुळे जोडीदार समजतो .स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ हा सप्तमेश किंवा गुरूच्या दृष्टीत असेल तर वैवाहिक सौख्यात हानी होताना दिसते. मंगळ ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून दर्शवलेल्या नातेसंबंधपासून  कटकटी भांडणे वितुष्ट येते .


अग्नितत्वाच्या राशीत मंगळ असेल तर स्फोटकता अधिक असेल . पथ्वितत्वाच्या राशीत असेल तर चांगली फळे देयील वायतत्वाच्या  राशीतील मंगळ हा वणवा पेटल्या सारखा असतो .पंचमावर मंगळाची  दृष्टी असेल तर पाळीचा त्रास ,गर्भाशयाची सर्जरी होते.  मंगळ लाभात असेल तर मित्रांमध्ये भांडणे होतील . लग्नात असेल तर व्यक्तिमत्व स्फोटक असेल ,सतत चिडणे रागावणे होयील. धनस्थानातील मंगळ हा घरात अशांतता , स्फोटक वातावरण ठेवतो . तृतीय स्थानातील मंगळ शेजारी , भावंडे ह्यांच्यात दुरावा निर्माण करेल. चतुर्थातील मंगळ आईशी दुरावा वितुष्ट निर्माण करेल. पंचमातील मंगळ खेळासाठी उत्तम पण अश्या लोकांच्या नावावर काहीही करू नये .जल तत्वातील मंगळ त्यामानाने सौम्य असतो .

पंचम स्थानातील मंगळ गर्भपात देतो .संततीशी मतभेत असतात . पंचमाशी मंगळाचा संबंध असेल आणि प्रथम संतती मुलगी असेल तर त्रासदायक नसतो . षष्ठात मंगळ शत्रूवर मात करतो .


सप्तमातील मंगळ तू तू मै मै करवतो .अष्टम स्थानात मंगळ असेल तर तो अपघात दर्शवतो ,आयुष्याला घातक असतो .ह्या मंगळाची दृष्टी हि धनस्थानावर  असते त्यामुळे स्वतःचे आणि जोडीदाराचे आयुष्य घोक्यात असते. अष्टम स्थानातील मंगळ हा मोठ्या शस्त्रक्रिया साठी कारणीभूत ठरतो .मंगळावर गुरूची दृष्टी असणे हे उत्तम पण गुरुवर मंगळाची दृष्टी असणे हे वाईट एखाद्या पत्रिकेत मंगळ सप्तम स्थानाशी निगडीत असेल तर शनी त्या दुसर्या पत्रिकेत कुठल्याही प्रकारे सप्तम स्थानाशी निगडीत नको. मंगळ केतू , शुक्र केतू हे वाईट .


मंगळावर शनीची दृष्टी असेल तर एखाद्या वस्तूचे जेव्हा गतीत रुपांतर होते तेव्हा ती मंगळाच्या अधिपत्याखाली येते .मंगळ प्रधान व्यक्ती हि तापट लवकर संतप्त होणारी ,नमते न घेणारी , कोमलपणा नसून अहंकार आणि उतावीळ ,दुसर्यावर अधिकार गाजवण्याचा स्वभाव असतो . पत्रिकेत मंगळ आहे पण तो खरच त्रासदायक आहे का हा विचार केला पाहिजे .मंगळ का कर्क राशीत , बुधाच्या राशीत असेल ,अस्तंगत असेल तर अशुभत्व कमी होते. प्रथम स्थानात मेषेचा ,चतुर्थात कर्केचा ,सप्तम स्थानात मकरेचा , अष्टमात सिंहेचा आणि व्यय स्थानात धनु राशीचा मंगळ असेल तर अशुभ नाही .मंगळ वक्री असेल तर तो मंगळ सौम्य होतो.


मंगळ पत्रिकेत  कुठेही असून लग्नेश सप्तमेश ह्यापैकी कठल्याही ग्रहावर दृष्टी टाकत असेल तर पती आणि पत्नी मध्ये वाद होतात .चंद्र आणि शुक्र युतीवर मंगळाची दृष्टी असेल तर पती आणि पत्नी मध्ये खटके उडतात .मंगळाची उपासना करायची असेल तर उत्तम म्हणजे गणपती स्तोत्र आणि मंगळाचा जप करणे. हनुमान चालीसा , सुंदरकांडाचा पाठ म्हणणे. 

श्रीसूक्त  , देवी अथर्वशीर्ष .गणपती अथर्व शीर्ष आवर्तने ,ऋणमोचक अंगारक स्तोत्र .मंगळ चंडिका स्तोत्र म्हणणे. 

मंगल हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे योग , प्राणायाम करून मुळात आपण आपला स्वभाव शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  

मंगळ सदैव अमंगळ करेल असे गृहीत धरून चांगल्या पत्रिका डावलू नका , कडची तीच मुलगी तुमच्या मुलाचा संसार सुखाचा करणारी असेल.....सहमत ?

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230









रेशीमगाठी भाग 9 – पुनर्विवाह

 || श्री स्वामी समर्थ ||


पूर्वीचा काळ वेगळा होता . पतीचे निधन झाले तर स्त्री दुसरा विवाह करण्याची रीत नव्हती  किबहुना त्यावेळी स्त्रीचा पुनर्विवाह हि संकल्पना अस्तित्वातच नव्हती. विधवा म्हणून जीवन कंठीत करायला लागत असे. पण स्त्री गेली तर तिचे कार्य झाल्यावर लगेच पती मात्र विवाहबद्ध होत असे.  

आज २१ व्या शतकात विलंबाने विवाह हि जशी समस्या आहे तशीच घटस्फोट हि सुद्धा एक ज्वलंत समस्या आहे. घटस्फोट झाल्यानंतर पुढील जीवन एकट्याने व्यतीत करायचे का ? हा प्रश्न पडतो आणि त्यावेळी पुनर्विवाहाचा विचार पुढे येतो. स्त्री आता घराबाहेर पडत आहे आणि स्वतःचे करिअर करत आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे. 

आजच्या काळात घटस्फोटाची कारणे म्हणजे वैचारिक मतभेद , विवाहबाह्य संबंध हि प्रामुख्याने समोर येतात . अनेकदा जोडीदाराचा आजारपणामुळे किंवा अपघाती मृत्य त्यामुळे पुनर्विवाह करावा लागतो . मुले लहान घरी वयस्कर आई वडील हेही कारण असते. .पुनर्विवाहासाठी जातक आल्यास त्याला ह्यापुढे उत्तम वैवाहिक सुख मिळणार कि नाही हे पाहावे लागते . प्रथम विवाहाचा विचार आपण सप्तम स्थानावरून करतो .द्वितीय विवाह हा भाग्यस्थानावरून पहिला जातो. अष्टमेश लग्नी किंवा सप्तमात असेल तर द्वितीय विवाहाचे योग पहिल्या पती/पत्नीच्या निधन झाल्यामुळे येतात. लग्नेश लग्नात किंवा षष्ठात असेल तर २ विवाह संभवतात . लग्नी मंगळ असेल आणि सप्तमेश ६ ८ १२ मध्ये असेल आणि पापग्रहांनी युक्त असेल तर पुनर्विवाह होऊ शकतो. मेष किंवा वृश्चिक लग्नात मंगळ असून सप्तम स्थानात बुध असेल आणि सप्तमेश शुक्र जर अष्टमात असेल तर एकापेक्षा अधिक विवाह होतात. 

सप्तमात बुध मंगळ असतील किंवा बुध मंगळाच्या राशीत पापग्रह युक्त असेल . बुध हा एक घटना पुन्हा घडवतो. सप्तमेश बुध हा पापग्रहांनीयुक्त असून अशुभ नक्षत्रात असेल .सप्तम स्थानात उच्चीच्या किंवा निचीच्या ग्रहासोबत राहू किंवा केतू असतील तर . पुरुषाच्या पत्रिकेत १२ व्या स्थानी राहू असेल तर तो एकापेक्षा जास्ती विवाह घडवतो . नवम स्थानात राहू केतू किंवा केतू गुरु असे ग्रह असतील तर किंवा पापग्रहांची उपस्थिती जास्ती असेल तर पुनर्विवाह सहजासहजी होत नाही . शुक्र चांगला असेल ,नवमेश चांगल्या स्थितीत असेल दुसरा विवाह यशस्वी होतो.

पुनर्विवाह आजच्या काळात आवश्यक आहे. आर्थिक दृष्टीने तसेच मानसिक दृष्टीने सुद्धा. एकटेपणा जिव्हारी लागणारा असतो आणि त्यातून वैफल्य निर्माण होते आणि एकटेपणाच्या भावनेतून आत्मविश्वासाची कमी आणि मानसिक दौर्बल्य सुद्धा निर्माण होते . अनेकवेळा दोघानाही अपत्य असते त्यामुळे त्यांचाही विचार एकत्र येताना करावा लागतो . मुलांचा विचार सर्वप्रथम नाहीतर सगळेच दुखी होतील. वैचारिक मतभेदामुळे पहिला विवाह मोडला असेल तर दुसरा करताना तो निभावण्यासाठी पहिल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ह्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या स्वभावात अमुलाग्र बदलही करावा लागतो . दुसरा विवाहात प्रेम नसते असेही नाही , सहवासातून प्रेम निर्माण होते पण अनेकदा तडजोड अधिक असते . ती करण्याशिवाय गत्यंतरही नसते हेही तितकेच खरे. विवाह टिकवण्याची जबाबदारी दोघांचीही असते मग विवाह पहिला असो अथवा दुसरा .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230









Friday, 20 June 2025

रेशीमगाठी भाग 7 – मंगळ

 || श्री स्वामी समर्थ ||



मंगळाची पत्रिका ....अबबब... अशीच विनाकारण धास्ती समाजात आहे. मंगळ चांगला कि वाईट ह्याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. मंगळ हा व्यक्तीतील अहंकार , धाडस , शक्ती आहे आणि ती शक्ती चांगल्या आणि वाईट दोन्ही कामासाठी वापरली जाते. वैवाहिक जीवन हे कोमल, शीतल आहे, तिथे हिंसा क्रौर्य नाही . वैवाहिक जीवनात भावनिक गुंतवणूक असते तिथे नात्यांचा समतोल राखणे गरजेचे असते  म्हणूनच सप्तम स्थानात तूळ रास येते .तूळ रास हि शुक्राची रास असून ती जल तत्वाची रास आहे. शुक्र हा वैवाहिक सुखाचा ,आनंदाचा आणि जल तत्वाचा ,सौभाग्याचा कारक आहे. अश्या ह्या जलतत्वाच्या ग्रहासोबत जर मंगळा सारखा आगीचा धगधगता गोळा आला तर विपरीत परिणाम मिळू शकतात .कुंडलीतील १२  १ ४ ७ ८ ह्या स्थानात मंगळ असेल तर मंगळ दोष धरला जातो.१२ १ आणि  4 ह्या स्थानातील मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर येते तसेच सप्तम स्थानातील मंगळ स्वतः सप्तम स्थानातच असतो . 


अष्टम स्थानातील मंगळाचा दोष धरला आहे कारण अष्टम स्थान हे सौभाग्याचे स्थान आहे तसेच तिथे खर्या अर्थाने दोन्ही शरीराचे मिलन होते , त्यातही जलतत्व लागतेच .अश्या ठिकाणी मंगळ असेल तर अचानक संकटे ,सौभाग्याची हानी तसेच अचानक घातपाताची शक्यता असते म्हणून येथील मंगळाचा दोष धरला आहे. काही जण धनस्थानातील मंगळा सुद्धा दोष देतात कारण ते कुटुंब स्थान आहे .तसेच त्याची दृष्टी अष्टमावर पडते .अनेकांच्या पत्रिकेत हा योग सापडतो त्यामुळे फक्त त्याला दोष देणे चुकीचे ठरेल. मंगळ हि चेतना आहे,उर्जा आहे ,तामसी ,स्वतंत्र वृत्तीचा , वासना असणारा ,अविचारी असून अचानक तडकाफडकी फळे देणारा आहे. 


मंगळ स्वतःच्या राशीत ,उच्च राशीत असेल तसेच तो पापग्रहांच्या युती दृष्टीत नसेल किंवा क्रूर नक्षत्रात नसेल तर तो शुभ समजावा. शुभ मंगळात जिद्द , धैर्य , पराक्रम ,जोम , रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. वासना शुभ असते. २ ७ ह्या राशीत मंगळाची धग अधिक असते. सप्तम स्थानातील धनु राशीचा मंगळ सुद्धा संरक्षक म्हणून काम करतो . मंगळ क्रूर नक्षत्रात किंवा वक्री असेल वाईट फळे देतो.. अशुभ मंगळ हा असंतुलित असतो .हव्यास ,असमाधानी वृत्ती ,प्रबळ वासना ,सहानुभूती नसणारा , हुकुमशाह असतो.


प्रथम स्थान –आत्मविश्वास ,आरोग्य, जिद्द उत्तम .संहारक नसून संरक्षक असतात .

चतुर्थ स्थान – वस्तू , घर चांगले असते.

सप्तमस्थान –बिघडला नसेल तर वासना शुद्ध ,जोडीदारासाठी संरक्षक ,शरीरसुख चांगले.

अष्टमस्थान –उत्तम आयुष्य आणि शरीरसुख .सासरी प्रगती दाखवणारा .

द्वादश स्थानी – वैद्य आणि संरक्षक क्षेत्रासाठी चांगला .परदेशात धंदा व्यवसाय.

सप्तम स्थान -पाशवी वृत्ती आणि वासना ,लैंगिक विकार ,लग्न स्थानावर  दृष्टी

चतुर्थ स्थान – नातेवाईकांशी वाद , पटवून घेण्याची वृत्ती नसते , हेखेखोर .वर्चस्व गाजवणारा , सप्तम स्थानावर दृष्टी 

प्रथम स्थान – हट्टीपणा , अहंकार , हव्यास , उतावीळ पणा ,अपघाती , वासना अधिक , ४ ७ स्थानांवर दृष्टी .अरेरावी करणारा उद्धट .

व्यय स्थान – पैशाची उधळपट्टी , चैनी, अनैतिक संबंध ,सप्तम स्थानावर दृष्टी.

अष्टम स्थान – सौभाग्याची हानी , ऑरेशन ,लैंगिक विकार आणि वृत्ती , अपघात .

एकाच्या कुंडलीत ज्या स्थानात मंगळ असेल त्याच स्थानात दुसर्याच्या कुंडलीत शनी असेल तर नक्कीच त्रासदायक होईल.

गुरूची दृष्टी किंवा युती मंगळाबरोबर असेल तर चांगली . मंगळाची शक्ती चांगल्या कामासाठी वापरता येते.  बरेच वेळा शुक्र , चंद्रासोबत युती असेल तर मंगळाची शक्ती कमी होते. हे सौम्य ग्रह मंगळाची धग कमी करतात . दोघांच्याही एकाच स्थानी पापग्रह असणे चांगले नाही . मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते असे नाही . मंगळाची वासना शक्ती शमवणारी पत्रिका असावी .कर्क लग्नी मंगळ असेल आणि दुसर्याच्या पत्रिकेत सप्तम स्थानात वृषभेचा मंगळ असेल .हा मंगळ वासना कमी करणारा तितका जोम नसणारा असतो ,त्याच्यासोबत सप्तमात वृषभेचा मंगळ असणारी पत्रिका असेल तर शुक्राच्या राशीतील मंगळाला वासना अधिक असतात .


अश्या ह्या पत्रिका एकत्र आल्या तर शारीरिक साधर्म्य असणार नाही .

मुलीच्या पत्रिकेत अष्टम स्थानात मंगळ आणि सप्तमेश रवी असेल  आणि मुलाच्या पत्रिकेत अष्टमात मंगळ हर्शल युती असेल तर. मंगळ रवी सारखे अपघाती ग्रह अष्टम स्थानात सौभाग्याची हानी करतील .मुलाच्या पत्रिकेत अष्टमात असलेली मंगळाची हर्षला सोबत असलेली युती अपघात दर्शवते. अश्या पत्रिका फक्त मंगळाला मंगळ म्हणून घेवू नये. काही लग्नांना मंगळ अशुभ फळे देतो. बुधाची ,शुक्राची आणि शनीच्या लग्नांना मंगळ चांगली फळे देत नाही . अश्या लग्नांना पत्रिकेत मंगळ १२ १ ४ ७ ८ ह्या भावात असेल आणि बिघडलेला असेल तर अशुभ होयील. आधुनिक काळात मंगळ हा स्त्रीयांना वरदान आहे असे म्हंटले जाते .मंगळ असणार्या मुली शूर ,धाडसी , कर्तुत्ववान ,अर्थार्जन करणार्या , उत्तम निर्णय क्षमता असणार्या असतात .

मंगळाची पत्रिका म्हंटली कि अगदी लगेच तोंड फिरवून विवाह मोडणे हे आजही आपल्या समाजात सर्रास होताना दिसते . ९०% लोकांच्या पत्रिकेत मंगळ आहे मग त्यांनी विवाह करायचे नाहीत का? पुढील भागात ह्याबद्दल अधिक माहिती घेवूया .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी मार्गदर्शन : 8104639230







Wednesday, 18 June 2025

२१ पायऱ्यांची साधना

 || श्री स्वामी समर्थ ||




जुलै च्या १० तारखेला गुरु पौर्णिमा आहे. २० जून पासून उपासनेला सुरवात केली तर १० जुलै ला २१ दिवसाच्या उपासनेची करता येयील . प्रत्येक क्षणी महाराज आपल्या सोबत असतात , दिसत नाहीत कारण तितकी आपली कुवत नाही पण ते असतात . आपल्याला दुक्ख झाले कि त्यांच्याही डोळ्यातून अश्रू येतात . आपल्या लाडक्या भक्तांना खरच ते काहीही कमी पडू देत नाहीत . खडतर तपस्या करून घेतील , परीक्षा घेतील पण एक दिवस इतके भरभरून देतात कि त्यांच्या सोबत केलेली सगळी रुसणी फुगणी आपण विसरून जातो. परत आपली कट्टी ची बट्टी होते. 

गुरु पौर्णिमा हा आपल्या भक्तांसाठी महाराजांच्या चरणाशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस, कृतकृत्य होण्याचा आणि गुरूंच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस. आपले नित्य कर्म सोडून जप करत राहिलो तर महाराजांना ते आवडणार नाही . कारण खुलभर दुधाची गोष्ट . येतंय ना लक्ष्यात ?

प्रत्येक दिवस हि एक पायरी आहे . अश्या २१ पायर्यांची साधना आपल्याला महाराजंच्या समीप नेणार ह्यात शंका नको . आत्मिक समाधान आणि गुरुप्रती निष्ठा , समर्पण ह्याचा हा त्रिवेणी संगम आहे . आपली नित्याची दिनचर्या सांभाळून खालील पैकी कुठलीही एक साधना करून आपण गुरुपौर्णिमा साजरी करूया. प्रत्येक पायरीवर महाराज काही न काहीतरी बोध करून देतील, आत्मपरीक्षण करताना आपल्यातील चुकांचा आरसा दाखवतील . आपल्याला कुठे कुठे सुधारायला वाव आहे ते समजेल . प्रत्येक पायरी अनमोल आहे. आपल्याच आयुष्याचा लेख जोखा आपल्यासमोर उलगडेल. सतत दुसर्यांचे दोष काढणारे आपण आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त होवू . २१ व्या पायरीवर मन आणि चित्त दोघांचेही शुद्धीकरण होईल आणि महाराज काय चीज आहे ते अंशतः तरी समजेल. 

खालील साधना हि आपल्या नित्य उपसानेसोबत करायची आहे . आपला नित्य  कुल स्वमिनीचा जप , श्री सुक्त , गणपती स्तोत्र जे करत असू त्यासोबत खालील कुठलीही एक उपासना करायची आहे. 

अखंड नामस्मरण किंवा संकल्पित नामस्मरण 

श्री स्वामी कृपा तारक मंत्र ( रोज ११ २१ ५१ १०८ जमेल तसा )

श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण 

श्री आनंदनाथ महाराज ह्यांचे श्री गुरुस्तवन स्तोत्र पठण

दत्त बावन्नी 

मानसपूजा 

स्वामी महाराजाच्या देवघरातील मूर्ती किंवा पादुकांना पूजा अभिषेक आरती नेवेद्य

वरील पैकी किंवा आपल्याला जे सुचेल त्याप्रमाणे आपण एखादी साधना २१ दिवस संकल्प करून करू शकतो त्याचसोबत रोज अन्नदान करू शकतो. ह्या सर्वाचा उपयोग म्हणजे आपल्या स्वतः मध्ये पुढील २१ दिवसात होत जाणारा बदल. आपल्याला पडणार्या प्रपंचातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्यालाच मिळत जातात . 

प्रचीती विना भक्ती नाही आणि महाराज आपल्या भक्तांना प्रचीती दिल्याशिवाय कसे राहतील . अशक्य वाटणाऱ्या गोष्टी फक्त तेच शक्य करू शकतात . प्रचीती माणसाला जगायची उमेद देते आणि महाराजांच्या ठायी विश्वास द्विगुणीत करते . 

गुरुपौर्णिमा , प्रगट दिन हि तर फक्त निम्मित्त आहेत , आपण ह्या दिवसांची वाट न पाहता अगदी ह्या क्षणापासून साधनेला सुरवात केली पाहिजे . आपल्यातील उत्तम माणूस , भक्त घडवण्याचे काम आपण केलेली साधना करत असते .साधनेतून तावून सुलाखून निघालेला भक्त महाराजांच्या समीप जातो, त्याला गुरु चरणांच्या शिवाय काहीही दिसत नाही. साधनेच्या ह्या काळात अनेक दिव्य चमत्कार होतात , आपल्याकडून महाराजांना नेमके काय अभिप्रेत आहे ते समोर येते . साधनेचा काळ हा आत्मपरीक्षणाचा असतो. आपल्या आतमध्ये अंतर्मनात डोकावून अनुभूती घेण्याचा असतो. मनाची सात्विकता , शांतपणा , संयम , विचार करण्याची क्षमता , मनन चिंतन सर्वकाही ह्या काळात होत जाते आणि त्यातून एक साधक तयार होतो. 

लहान सहान गोष्टीत न अडकता आपले जीवन गुरु चरणांशी समर्पित करता आले पाहिजे हेच साधना शिकवते. भौतिक सुखे पायाशी हात जोडून उभी असताना झोपेच्या गोळ्या न घेता झोप येत नसेल तर त्या भौतिक गोष्टी किती निरर्थक आहेत आणि अश्याच सर्व गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागून आपली मनशांती मात्र घालवून बसतो. मनाची शांतता , मनाचा समतोल पुन्हा मिळवण्यासाठी ह्या २१ पायऱ्या २१ दिवसात चढताना दिव्य अनुभव येतात . आपलीच आपल्याला नव्याने ओळख होत जाते . आयुष्यभर दुसर्यांचे गुण अवगुण शोधणार्या आपल्याला आपल्यातील असंख अवगुणाची ओळख होते . 

मन स्वीकारते पण अंतर्मन नाही अश्या सर्व गोष्टी आता आरशासारख्या स्वछ्य होतात आणि आपल्यातील आणि महाराजांच्या मधील आपल्या अहंकाराची भिंत जणू कोसळून पडते. 

महाराजांचे अस्तित्व सहवास प्रत्यक्ष अनुभवायला मिळणारे भक्त किती किती भाग्यवान असतील . डोळे मिटले तरी अक्कलकोट शेगाव समोर उभे राहते तेव्हा तो क्षण आपण महाराजांच्या खूप समीप असतो . 

स्वामी म्हणजे स्वाः मी...ह्या साधनेतून आपण आपल्यातील मी ला म्हणजेच अहंकाराला कायमची तिलांजली देण्याचा प्रयत्न करुया . महाराजांच्या नावातच आणि त्यांच्या चरणाशी आपले जग आहे बाकी सबकुछ फोल आहे , अर्थहीन आहे ह्याची जाणीव करून देणारी साधना आपल्याला कात टाकल्यासारखे नवीन जीवन देयील ह्यात दुमत नसावे. 

तुम्हा आम्हा सर्वाना करत असलेल्या साधनेतून आनंद मिळूदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना . 

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

   








Tuesday, 17 June 2025

शुद्ध शरणागत भाव

 || श्री स्वामी समर्थ ||

खुलभर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे असे मला नेहमी वाटते. ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आज्जी कडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत. देव कुठलाही असो अंतर्मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो.

संसारात प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साकडे घालणे इष्ट होयील का. ५ नारळाचे तोरण बांधीन मला हे द्या , लाडूचा प्रसाद वाटीन ते द्या हे खरच करायची गरज आहे का? मनातील सच्चा भावासाठी ते भुकेलेले आहेत . आपणही म्हणतो कि मला आयुष्यात खरा मित्र मिळावा , सच्चा दोस्त हीच आपली आयुष्यातील मोठी संपत्ती असते , अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे. 

कश्यासाठी तरी सेवा करायची गरजच नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही . अक्कलकोट ला जाण्यासाठी खिशात पैसा नसेल आणि भक्ताने आहे तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तर ते असे थोडेच म्हणणार आहेत कि आधी तू इथे ये मग बघतो तुझा प्रश्न . अक्कलकोट ला तो शरीराने पोहोचेल सुद्धा पण ह्या क्षणाला तो मनाने महाराजांच्या चरणाशी पोहोचलेला आहे आणि हे फक्त त्यांनाच माहित आहे. 

आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे त्यावर आपली प्रचीती अवलंबून आहे. नुसते स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण. मी अक्कलकोट ला जावून आलो आणि १०० वेळा तारक मंत्र म्हंटला पण मन अशुद्ध  काय उपयोग आहे त्याचा. महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखे असले पाहिजे , कुठलीही शंका कुशंका नसावी .

एकदा दोन बायका महाराजांच्या कडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही . महाराजानी त्यांच्याजवळ एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार इतक्यात तिथे पदराची झोळी मागे केली कारण ती ब्राम्हण होती . सोवळे आड आले. पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले ती ब्राम्हण नव्हती म्हणून नाही तर हे महाराजांनी दिले आहे आणि त्यात माझे भले आहे. तिला मुल झाले. अशी निरपेक्ष भक्ती केली पाहिजे . त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा. त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे , तनमन धन अर्पण करून भक्ती भक्ती आणि भक्तीत रमले पाहिजे . 

प्रपंचातून सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे त्यामुळे महाराजांच्याकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्नच येत नाही . परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजशी जाणवू लागते प्रपंचातून मन मुक्त होत जाते , विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाटते. महाराजांच्याकडे सगळा स्वछ्य कारभार आहे. मनात एक ओठात एक पोटात एक त्यांना चालत नाही. आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे. महाराज हे अनाकलनीय , असामान्य , अद्वितीय विभूती आहेत , महाराज समजणे हे आपल्या सामान्य बाल बुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे. मागच्या जन्माचे पूर्व सुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील.

अध्यात्म आपल्याला जगवते. सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो. देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे . आपण त्याला उगीचच पेढे बर्फी लाडू ह्यात अडकवून ठेवतो. महाराजांच्या सेवेत असणार्या आणि त्यांच्याच सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर इतर कुणाला विचारायची आवश्यकताच नाही . आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार , देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे . 

सतत भयभीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे . एक काहीतरी करा ..भक्ती तरी करा नाहीतर चिंता . एक क्षण सुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही . देव्हार्यासमोर उभे असतो पण लक्ष्य कुकरच्या शीटीकडे. प्रपंचातून विरक्त करणारी साधना आहे . आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे. माझा चांदीचे भांडे , माझी दुलई , माझे हे आणि माझे ते. इथून काहीही न्यायचे नाही कारण काही घेवून आलो नाही तरीही सगळे जमा करण्याचा अट्टाहास असतो. जमवायचेच असेल तर नामस्मरण , अनुभव , प्रचीती ह्याचे गाठोडे करा ते न्यायचे आहे सोबत .

कलियुगात वस्त्राप्रमाणे देव पण बदलले जातात . रोज नवा ज्योतिषी रोज नवीन उपाय रोज नवीन गुरु रोज नवनवीन साधना . कश्याचा काही ताळमेळ नाही . कुठे वाहवत चाललो आहोत आपण आपले आपल्यालाच समजत नाहीय. कुठेही एकाग्रता , सारासार विचारबुद्धी नाही म्हणून कुठे थांबायचे तेच समजत नाही. दिशाहीन आयुष्य झाले आहे . चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघताय कोण ? कधी प्रेमाने त्यांच्या जवळ बसतो का आपण चार शब्द खुशालीचे महाराज कसे आहात ? थंडी वाजतेय का तुम्हाला ? आजचा नेवैद्य आवडला का ? काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण . २४ तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचे , जरा मनाविरुद्ध झाले कि थयथयाट सुरु . संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाही .

 काम धाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते तुम्हाला . शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे . प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा , त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा . मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा . समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा , गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा . 

अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते . सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा . द्या सगळा संसार , प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून...मग बघा ..अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहणार नाहीत . त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव . 


शरणागत दिनार्थ परित्राण परायणे |

सर्व स्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते ||

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


  


प्रेम कि आकर्षण ? ( आकर्षण क्षणात होते तर प्रेम सहवासातून )

 || श्री स्वामी समर्थ ||

प्रेम हि भावना आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. ज्यांना शुद्ध निस्वार्थी प्रेम मिळते ते खरेच भाग्यवान आहेत . प्रेम हि भावना आहे आणि ती व्यक्त होणे तितकेच गरजेचे आहे. आपण कुणालातरी आवडतो हि कारण सुद्धा जगायला कारणीभूत होते. कलियुगात असे प्रेम जरा दुर्मिळ झाले आहे असे म्हंटले तर वावगे ठरू नये. काहीतरी काम असल्याशिवाय कुणी कुणाला साधा फोन सुद्धा करत नाही , कुणाला भेटतही नाही . असो. प्रत्येक वयातील प्रेम वेगळे असते तसेच प्रत्येक नात्यातील सुद्धा. आईचे मुलावर असणारे प्रेम खरच अमर्याद असते , तिला फक्त देणे माहित असते घेणे नाही . आपले नातेवाईक मित्र आप्तेष्ट हे सगळेच प्रेमाच्या धाग्याने बांधले गेलेले असतात . 

आपल्या प्रेयसीचे , पत्नीचे प्रेम हेही विविध छटा दर्शवते. पुढे मुले नातवंडे , प्रेमाचा ओघ सुरूच राहतो. आज आपण विवाहातील प्रेम संबंध कसे असू शकतात किबहुना कसे असणे अपेक्षित आहे ह्यावर चर्चा करूया . आपणही आपली मते मांडा ती स्वागतार्ह असतील. 

आजकाल वाढत्या वयातील घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे तर तरुणाई अनेकदा आकर्षणाच्या मोहाच्या क्षणात फसताना दिसते .  लग्न नकोच असेही काही जणांचे विचार आहेत . हे सर्व ऐकून अनेक प्रश्न मनात येतात म्हणूनच आजचा लेखन प्रपंच .

एखाद्या मुलाला मुलगी आवडते म्हणजे नक्की काय होते ? प्रेम ? अजिबात नाही . त्या “ click “ चा अर्थ दर्शनी दिसणारे रूप , देहबोली बाह्य रूप असा आहे. तिचे दिसणे , असणे , आपल्या मित्रांची हीची ओळख करून देऊ शकतो हा विचार डोक्यात चाललेला असतो. तिचा modern , stylish लुक सोलिड आवडलेला असतो . पटतंय का? तिच्या बरोबरच्या कॉफी हाउस मधल्या चार दोन भेटी विवाह ठरवतात , २४ तासातील ४८ तास चाललेले चाटिंग , प्रेमात आकंठ बुडायला लावते. मनाने अनेकदा ते दोघे हनिमून ला सुद्धा जावून आलेले असतात . हे सर्व आहे हे असे आहे. पण मग विवाह पश्च्यात काही दिवसात किंवा महिन्यात वर्षात असे काय होते कि वेळ घटस्फोटा पर्यंत येते.

मग प्रश्न पडतो ते प्रेम होते कि नुसतेच आकर्षण ????????? आकर्षणाला प्रेम समजण्याची गल्लत त्यांनी केलेली असते . तुम्हाला सुद्धा असे प्रश्न पडत असतील. तिचे आणि त्याचे गुण अवगुण  समजायला पुरेसा वेळ एकमेकांना न देताच लावलेले लग्न . अनेकदा अवगुण दिसूनही दृष्टी आड सृष्टी असे म्हणून त्याकडे केलेले दुर्लक्ष्य . संसारातील लहान सहान सुखात रममाण होण्यापेक्षा पैशाची मोठी गणिते मांडण्यात हरवणारे ते दोघे एकत्र जेवणाचे , एकत्र गप्पा मारण्याच्या सुखाला कुठेतरी वंचित राहतात . नुसती मोठ मोठी बिले भरत राहणे आणि परदेशी वार्या म्हणजे संसार नाही. 

कुणालातरी सारखे इंप्रेस कश्याला करत राहायचे ? मग ते उंची कपडे अत्तर असो किंवा घर गाडी . ह्या सगळ्यात संसार करणे राहूनच जाते आणि मग संवादाला पारखे झालेल्या त्या दोघांना लग्ना पूर्वीच्या दिवसांचा विसर पडतो . घेलेल्या आणाभाका ? साधा चहा करण्यावरून वाद ? होतातच कसे ?? अरे आवडली होती न तुला ती इतकी ? मग आता काय झाले? 

थोडक्यात सांगायचे आहे कि विवाह ठरवताना आपली मते दोघांनीही स्पष्ट मांडावीत , आपले विचार मग ते आर्थिक , वैचारिक सामाजिक अगदी लैंगिक सुद्धा कसेही असोत त्यावर मोकळेपणाने चर्चा करा. अश्यावेळी अनेक गोष्टी उलगडत जातील जसे मुलगा म्हणेल मी पावसाळ्यात शनिवार रविवार पावसात मित्रांसोबत जातो माझे अनेक ग्रुप आहेत पण तिला नसेल यायचे किंवा तिला त्या ग्रुप सोबत न जाता स्वतःच्या ग्रुप सोबत जायचे असेल तर हे सर्व आधीच स्पष्ट होणे आवश्यक आहे. इतक्या लहान सहान गोष्टींचे पुढे मेरू पर्वत होतात हे नक्की. 

प्रेम असेल ते टिकून राहते , प्रेम असेल तर ती दोघे एकमेकांसाठी समर्पण त्याग करतील , एकमेकांचा समजून घेतील आणि समोरच्याच्या विचारांचा मान ठेवतील , एकमेकांना व्यक्ती स्वतंत्र देणे म्हणजे प्रेम , प्रत्येक वेळी तू मुलांसाठी घरात थांब हे प्रेम नाही हि तिला करायला लागणारी तडजोड आहे.  मुले फक्त तिचीच आहेत का? 

गेल्या १-२ वर्षात माझ्या ओळखीत जवळ जवळ लग्नाला २५ -३० वर्ष होवूनही घटस्फोट झालेले आहेत . संयम संपला.

गेले २५ वर्ष एकमेकांना सांभाळून घेतले आता मुलांचे विवाह तोंडावर असताना स्वतःच घटस्फोट घ्यायचा म्हणजे नक्कीच तसेच कारण असणार . असो. 

लग्नापूर्वी तो किंवा ती अशी नव्हती हे वाक्य आता उगाळून कोळसा झाल्यासारखे वाटते . लग्नानंतर तिचा काळा रंग गोरा झाला कि काय ? तीही तशीच आहे आणि तुही , बदलला आहे तो दृष्टीकोन . इथे कुणीही परीकथेतील 

राजकुमारासारखे नाही आणि कुणी सिंड्रेला सुद्धा नाही . आपण सर्व सामान्य माणसे आहोत. वयानुसार आपली देहबोली दिसणे विचार आवडी नक्कीच बदलत राहणार आणि त्या एकमेकांनी आहेत तश्या स्वीकारणे म्हणजे प्रेम . हे होत नसेल तर ते प्रेम नव्हतेच होते ते फक्त आकर्षण आणि म्हणूनच ते क्षणात विरले आणि मग जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा ते आपल्याला स्वीकारायला जड जाते . लग्न ठरवताना घाई करू नका आवडली मुलगी तर लगेच पत्रिका छापा  असे करू नका कारण हे बंध आयुष्यभराचे आहेत . ते दिवसागणिक वृद्धिंगत व्हावे , विरळ होवून विरून जायला नकोत हीच इच्छा आहे. 

प्रेम आणि आकर्षण ह्यात आपण नेहमीच गल्लत करतो , प्रेम अपेक्षा विरहित असते आणि टिकून राहण्याकडे कल असतो , तिथे अटींचे बंधन नसते , सहवासोत्तर ते वाढते पण आकर्षण क्षणिक असते बहुतेक ९९% ते शारीरिक आकर्षण असते . म्हणूनच ते टिकत नाही . 

आजकालच्या विवाह करण्यास उत्सुक सर्वच मुलामुलींनी ह्याचा गांभीर्याने विचार करावा . आपण कितीही आधुनिक झालो तरी आपल्याला संसार करायचा आहे , आपल्या रूढी परंपरा जपायच्या आहेत . लग्न हे लग्न असते ते पूर्वीचे आधुनिक अशी लेबले नसतात त्याला. विवाह हा एक शुभ संस्कार आहे , नात्या सोबत अनेक अपेक्षा येतात आणि त्यात शिथिलता नसेल तर त्यांचे ओझे वाटू लागते . एकमेकांना हवेहवेसे वाटणे हे नक्की काय ह्याची कारणे स्वतःची स्वतःच तपासावीत कारण ती किंवा तो कालानुरूप बदलत जाणार आहे . नुसत्या बाह्य आकर्षणाला प्रेम समजण्याची गल्लत केली तर संसाराची गाडी समांतर रेषांसारखी जायील . 


आकर्षण आयुष्यात अनेक गोष्टींचे असते पण संसारात “ आकर्षण “ उपयोगी नाही . विश्वास प्रेम ह्यावर संसाराची इमारत उभी असते . नुसतेच आकर्षण असेल तर संसाराची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कधी कोसळेल आपल्याला सुद्धा समजणार नाही.  प्रेम एकमेकांच्या चुका स्वीकारायचे धारिष्ट्य दाखवते आणि फुलत जाते. समोरचा आपलेही अवगुण स्वीकारणार आहे तेव्हा आपणही ते स्वीकारण्याचे मोठे मन दाखवले पाहिजे . छान छान दिसण्याचे गुडी गुडी बोलण्याचे ते चार दिवस फुलपाखरासारखे उडून जातात आणि मग खरा संसार सुरु होतो तेव्हा प्रेमाची खरी ताकद समजते . वयासोबत परिपक्व होणे , प्रगल्भता येणे अपेक्षित आहे . एकमेकांचे होणे म्हणजे प्रेम आणि म्हणूनच प्रेम कि आकर्षण ह्यातील फरक समजून घेतला तर संसार नक्कीच सुखाचा होईल.  


गेल्या काही दिवसात येणाऱ्या पत्रिका ह्या घटस्फोटाची नांदी करणाऱ्या होत्या पण एक विशेष गोष्ट म्हणजे त्यातील बर्याच जणांचे प्रेम विवाह होते . नक्की ते प्रेम होते कि नुसतेच आकर्षण ? कुठे चुकत गेले ? का? जन्मभराच्या आणा भाका घेतलेल्या गेल्या कुठे ? एकमेकांमधील so called interest गेला कुठे ? कि तो नव्हताच कधी ? असे असंख्य प्रश्न पुढे राहतील अशी स्थिती म्हणून ह्या विषयावर लिहावेसे वाटले. रूप रंग दिसणे हसणे हे क्षणिक आहे , मनाची उदात्तता , संसार करण्याची मनोवृत्ती , कुटुंबातील लोकांना आपलेसे करून घेण्याची क्षमता आणि वेळ प्रसंगी समर्पण ह्या सर्व गोष्टी विवाहाच्या दीर्घ प्रवासात उपयोगी पडणार्या आहेत .. त्याबद्दल जागरूक असले पाहिजे .आकर्षणाला अस्तित्व नसते , ते क्षणिक आकर्षण नुसते त्या दोघांचे नाही तर दोन कुटुंबांचे विवाहाचे स्वप्न धुळीस मिळवते . 

म्हणूनच म्हणावेसे वाटते गुण मिलन , ग्रह मिलन आणि सगळ्यात मुख्य मनोमिलन .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

 


Sunday, 15 June 2025

मंगळ केतू युती

 || श्री स्वामी समर्थ ||


सध्या अनिष्ट अशी मंगळ केतू युती सिंह ह्या अग्नी तत्वाच्या राशीत जुलै अखेर पर्यंत आहे.  त्याच सोबत गुरु अस्तंगत आहे . काहीच दिवसात शनी वक्री होणार आहे. रागावर भाव भावनांवर अत्यंत नियंत्रण असावे. ज्यांना BP चा त्रास आहे त्यांनी आपल्या प्रकृतीला जपावे. मंगळ म्हणजे आवेग , आवेश आणि वेग त्यामुळे वाहने जपून चालवावीत , शरीरातील उष्ण वाढेल त्यामुळे तामसी बोलणे आणि तामसी  भोजन टाळावे. 


मंगळ हा भूमिपुत्र आहे त्यामुळे जमिनीचे व्यवहार , रिअल एस्टेट पासून शेअर मार्केट पर्यंत बदल दिसून येतील. वातावरणात सुद्धा अनपेक्षित बदल होतील . सामान्य माणसाला त्रासदायक जीवन असणारा आहे. मोठे प्रवास टाळावेत . ज्यांना राग येतो त्यांनी तर पुढील दोन महिने गप्पच राहावे म्हणजे अनेक प्रसंग टळतील . युद्धाची पार्श्वभूमी सध्या आहेच . मंगळ हा रक्तासंबंधी विकार देतो . पुढील काळात आगी लागणे, घरांची मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यता , वादळी वारे . प्रत्येक गोष्टीत आपले मत मांडणे आणि टोकाचे निर्णय रागाच्या भरात घेणे टाळा. मंगळ केतू युती चांगल्या भावात अध्यात्मिकता सुद्धा देयील. सप्तमात हि युती जोडीदारासोबत वाद घडवून दुरावा आणेल , अष्टम भावात मुळव्याध आणि अपघात . असो.

प्रत्येक भावातील मंगळ केतू युतीचे फळ वेगवेगळे असणार आहे आणि आपल्या मूळ पत्रिकेतील ग्रहांप्रमाणे ते बदलणार आहे . अति स्पष्ट बोलणे टाळावे , संबंध कायमस्वरूपी बदलतील. मंगळ म्हणजे भावंडे , रक्त विकार , शेजारी , पोलीस दल , रक्तदाब . मंगळाच्या हातात शास्त्र आहे त्यामुळे सर्जरी . ज्यांची काही दिवसात सर्जरी झालेली आहे त्यांनी जपावे . मूळ पत्रिकेत मंगळ केतू युती असेल किंवा मंगळ केतू ह्यांची दशा अंतर्दशा असेल त्यांनी जपावे.  

उपाय : हनुमान चालीसा नित्य पठण , सद्गुरू स्मरण   

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Saturday, 14 June 2025

व्यवसाय आणि ग्रहयोग - भाग 2

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेत गुरु बलवान असेल तर शिक्षण क्षेत्रात जातकाची प्रगती होते. शिक्षक पर्यायाने मुख्याध्यापक हे पद मिळते. १ ४ ५ ९ १० ह्या भावात गुरु तसेच १० मध्ये मंगळ रवी असतील तर शिक्षण क्षेत्रात यश मिळते . अधिकार योगासाठी ९ भावात गुरु आणि तसेच २ ६ सुद्धा गुरूशी संबंधित असावेत . शनी दशमात असेल तर अनेकदा सत्ता मोठे पद देतो . ह्या सर्वासाठी अर्थात दशा अनुकूल असाव्या लागतात . 

स्पर्धा परीक्षातील यश – आजकाल परदेशी शिक्षण घेण्यासाठी किंवा भारतात सुद्धा अनेक उच्च शैक्षणिक प्रवेश हे CET CAT ह्या माध्यमातून घेतले जातात . आजकाल स्पर्धा परीक्षा आपला प्रवेश आणि आयुष्याची पुढील वाटचाल ठरवताना दिसतात . ह्यासाठी प्रामुख्याने ६ वा भाव बघावा तसेच त्या नुसार दशाही अनुकूल हवी . 


रवी गुरु बुधाचे गोचर भ्रमण अश्यावेळी पाहावे लागते. सरकारी नोकरी म्हंटली कि रवी आणि ६ १० भाव आलेच. पोलीस सैनिक मिलिटरी साठी अर्थात धाडसी मंगळ सोबत राहु  ४ १० मध्ये चांगले फलित देतात . 


चिकित्सक राशी कन्या आणि संशोधक राशी वृश्चिक ह्या वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी प्रथम क्रमांकावर येतात . रवी बुध गुरु तसेच शुक्र सुद्धा बघावा. ६ १० तसेच २ भाव धन देणारा. मकर धनु राशीही ह्या व्यवसायासाठी पोषक आहेत . मंगळ सुस्थितीत असेल तर व्यक्ती उत्तम सर्जन होते. मंगल १ ५ ९ किंवा २ ६ १० ह्या राशीत स्थित असावा .व्ययेश मंगळ दशमात आणि इतर ग्रहांची साथ उत्तम डॉक्टर होवू शकते.  


आरोग्याचा कारक रवी बघावा तसेच चिकाटी देणारा ग्रह शनी . डॉक्टर हा समाजात वावरणारा असतो. त्यामुळे चंद्र बघावा. ज्याचा चंद्र अतिशय शुभ असतो तो समाजात लोकप्रिय होतो. आता ह्या व्यवसायातून लाभ देण्यासाठी धन आणि लाभ भावाची दशा बघावी . 


व्यवसाय कुठलाही असो माणसे जोडण्याची कला अवगत असेल तर व्यवसाय चालेल . त्यासाठी बुध शुक्र चांगले हवेत . दशम भावातील गुरु शुक्र मोठे व्यवसाय लाभ दर्शवतात . उत्तम व्यवस्थापन रवीकडे तर सत्ता मंगळ राहुकडे .


प्रत्येक व्यवसायासाठीचे शिक्षण , भांडवल अनेक गोष्टींसाठी पहावी लागते ती मानसिकता .  मला हे करायचे आहे आणि ते करायचे आहे असे नुसते म्हणून चालत नाही . मी मोठे बुटी पार्लर उघडले पण कुणीच तिहे फिरकत सुद्धा नाही तर केलेला डामडौल फुकट .त्यामुळे व्यवसाय करण्यापूर्वी आपली मानसिकता , त्या व्यवसायातील खाचखळगे आपल्याला कितीसे समजत आहेत तसेच त्यातील चढ उतारावर पाय रोवून उभे रहायची मानसिकता आपली आहे का? धंद्यात चिकाटी , दूरदृष्टी , माणसे ओळखण्याची कुवत सर्व लागते , सगळ्यात मुख्य स्वतः कष्ट करायची ताकद लागते , नफ्या तोट्याचे गणित मांडावे लागते कारण ते कोलमडले तर व्यक्ती कर्ज बाजारी होते . 


एखादा व्यवसाय करणे हे तप करण्यापेक्षा कमी नाही . आजकालची मुले कसलाही विचार न करता वडिलांना मला धंदा करायचा आहे असे सांगतात आणि पालक सुद्धा त्यांना कर्ज घेवून देतात . आपला मुलगा पायावर उभा राहण्याची स्वप्न पाहणे वेगळे आणि त्यासाठी परिश्रम घेवून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे वेगळे . सर्वांगीण विचार केला तर यश दूर नाही , पण तसे झाले नाही तर जीवन नको त्या गर्तेत अडकेल म्हणून हे चार शब्द .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Friday, 13 June 2025

रेशीमगाठी भाग -6 विवाहाच्या पद्धती , सगोत्र विवाह , नाडी

 || श्री स्वामी समर्थ ||


पूर्वीच्या काळी समाज प्रगत नव्हता , शहरीकरण झालेले नव्हते , समाज शिक्षित नव्हता आणि त्यामुळे वैचारिक प्रगती आजच्यासारखी नव्हती . विवाह हे पंचक्रोशीत किंवा नात्यातच होत असत . मुलामुलींच्या अगदी उमलत्या कोवळ्या वयात संसाराला सुरवात होत असे. घरात पाच पंचवीस माणसे असत , सगळ्यांचा धाक पण वय लहान म्हणून शिस्त असली तरी भरपूर लाड होत असत . माहेर सासर एकाच वाटत असे. आई पेक्ष्याही त्या काळातील मुली सासू सोबत अधिक वर्ष घालवत असत. 

पूर्वीच्या काळी साधे जीवन मग त्यात विवाह हा आजकालचा संगीत , मेहेंदी वगैरे सारखा सोहळा नसे. सर्व चालीरीतींना अनुसरून घरची मोठी मंडळी विवाह ठरवत आणि संपन्न हि होत असत . 

तेव्हा विवाह ठरवायच्या पद्धती सोप्या सध्या आणि मजेशीर होत्या . स्त्रिया हळद कुंकवाच्या पुड्या टाकत जी पुडी उचलेल तिथे विवाह . पहिल्या ज्या स्थळाकडून होकार येयील तिथे मुलगी द्यायची असे ठरायचे. अनेकदा देवाला कौल लावून विवाह ठरत असत .

मुलीसमोर शेतजमिनीची , गोठ्यातील ,अग्निहोत्रातील , स्मशानातील , नापीक जमिनीतील ,चव्हाट्याच्या जागेवरील , नदीच्या पात्रातील , जुगारी अड्ड्यावरील असे मातीचे गोळे आणून ठेवत आणि मुलीला त्यापैकी एक गोळा उचलायला सांगत .

मुलीने शेतजमिनी  गोळा उचलला तर ती आल्यावर घरात अन्नाची बरकत येयील. गोठ्यातील गोळा उचलला तर गाई म्हशींची बरकत होयील. अग्निहोत्राचा गोळा उचलला तर घरातील धार्मिकता वाढेल, कुलाचार ,धर्म वाढेल. नदीच्या पात्रातील गोळा उचलला तर घरत पैशाचा ओघ राहील.पाणी म्हणजे जीवन ,लक्ष्मी. जुगारी अड्ड्यावरील उचलला तर घरात भावूबंदकी होयील.  चव्हाट्या वरचा उचलला तर घरातील भांडणे चव्हाट्यावर जातील. नापीक जमिनीतला गोळा उचलला तर ती आल्यापासून लाभ होणार नाहीत . स्मशानातील उचलला तर वैधव्य लवकर येयील अश्या समजुती असत आणि त्याप्रमाणे निर्णय होत असे. 


आजच्या आधुनिक काळात ह्या सर्व पद्धतीना आपोआपच  तिलांजली मिळाली . आजचे जग प्रगत आहे . आजची मुले आणि मुलीही अगदी परदेशात सुद्धा एकटे राहतात , मोठमोठ्या पदांवर काम करून घाम फुटेल इतके मोठमोठे पगार सुद्धा असतात . त्यामुळे आता पूर्वीच्या विवाह पद्धती अर्थातच मोडीत निघाल्या आहेत पण विवाह संकल्पनेला निदान आज तरी सुरुंग लागलेला नाही .


आता मुला मुलगी बाहेरच भेटतात ,त्यांना आपण अनुरूप आहोत असे वाटले तर दोन कुटुंबे एकत्र भेटतात .लग्नातील देणीघेणी त्याच्या मोठमोठाल्या याद्या ह्या सुद्धा आता बाद झाल्या आहेत . आजच्या काळात दोघांचे एकमेकांशी जमणे आणि त्यांनी एका छताखाली आनंदाने राहणे हेच सर्वात महत्व. पाश्च्यात्य संस्कृतीचे अनुकरण आपण नेहमीच करत आलो आहोत .आपली विवाह संस्था हि त्याला अपवाद नाही . भारतात सध्या लिव इन रिलेशन चे पेव फुटले आहे. आज मुलगा आणि मुलगी ह्यांनी एकत्र एका छताखाली आनंदात एकोप्याने राहणे हीच काळाची खरी गरज आहे. एखादी मुलगी छान नांदते तेव्हा आईवडील जावयाचे सुद्धा तितकेच कोडकौतुक करताना दिसतात .

म्हणून योनिमैत्रीचा विचार अधिक आहे. षडाष्टक योग टाळावा कारण त्याने शत्रुत्व येते म्हणून लग्न आणि चंद्र षडाष्टक टाळावे . सप्तमात २ शत्रू ग्रह आले तर वैवाहिक जीवनाची सुरवातच कटकटीतून होताना दिसते .तसेच अष्टमस्थानात सुद्धा शत्रूग्रह नकोत कारण ते लैंगिक सुखाचे स्थान आहे . 


एक नक्षत्र आणि एकच चरण असेल तर विवाह करू नये एक नाडी दोष निर्माण होतो , त्यांना संतती होण्यास अडथळे येतात. पण ज्यांना संतती नकोच असेल अश्यांसाठी हे पहायची गरज नाही. अश्यानी विवाह करायला हरकत नाही . समाजात परंपरागत ज्या गोष्टी चालू आहेत त्या एकदम अचानक खोडून टाकणे जमत नाही त्यामुळे आपल्याला गुणमिलन सुद्धा करून द्यायला पाहिजे.  किती गुण जुळतात तेही सांगायला लागते. 


पूर्वीच्या काळी सगोत्र विवाह करावे का असा प्रश्न येई . पूर्वी पलीकडच्या वाडीत ,पेठेत , नात्यात ,आत्याकडे मावशीकडे मुलगी दिली जात असे. अश्या मध्ये शारीरिक दोष निर्माण होतात असे  वैदिक शास्त्र सांगते त्यामुळे सगोत्र विवाह नकोत असे होते पण आता तसे होत नाही. मुलामुलीने एकत्र राहणे हे आजच्या काळात सर्वात महत्वाचे आहे.  सगोत्र विवाहासाठी काही उपाय शास्त्राने सुचवले आहेत .


विवाह कलाही होत होते आजही होत आहेत आणि भविष्यात सुद्धा होत राहतील . प्रश्न आहे तो कसे होतील आणि विवाहाची मूळ संकल्पना आपल्याच मातीत मूळ धरून टिकेल का  .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230



व्यवसाय आणि ग्रहयोग – भाग १

 || श्री स्वामी समर्थ || 



आपण घेतलेले शिक्षण आणि नोकरी , व्यवसाय ह्याचा अनेकदा एकमेकांशी काहीही संबंध नसतो असे दिसून येते . आपण जे शिक्षण घेतले त्याला अनुसरून नोकरी नाही म्हणून मग नोकरी मिळेल असे शिक्षण घ्यावे लागते आणि त्यातच वयाची पंचविशी उलटते . 

टेक्निकल आणि व्यवस्थापन अश्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीचे शिक्षण घेणे आजकाल आवश्यक आहे . आज आपण काही व्यवसाय आणि नोकरी साठी लागणारे ग्रहयोग बघुया .


इंजिनिअरींग हे क्षेत्र मोठे असून त्यात विविध शाखा येतात . ह्यासाठी प्रामुख्याने मंगळ पाहावा त्याच्या राशी आणि त्याचा दशम भावाशी असलेला संबंध . ४ ५ ८ ह्या ठिकाणी मंगळाच्या राशी असतील तर चांगलेच . मंगळ हा मेकानिकल रसायने , रवी मेकानिकल , शनी सिव्हील  भूगर्भ . संगणक म्हणजेच कॉम्पुटर क्षेत्रासाठी बुध , गुरु हर्शल चांगले . गुरु हा उच्च तंत्रज्ञान तसेच शनी अत्यंत संयम , चिकाटी देतो तसेच मंगळ इंजिनिअरींगशी संबंध देतो. 

बुध हा उत्तम संवाद कौशल्य देतो . शब्दांच्या कोट्या करणारा हा बुध पत्रिकेत उत्तम फलित देत असेल तर कुठल्या क्षेत्रात आपण यश संपादन करू शकतो ते बघुया .

लग्न भावात किंवा धन भावात बुध तसेच २ ६ १० ६ ह्या भावांशी जर मंगल गुरु बुध संबंधित असतील तर व्यक्ती वकिली क्षेत्रात नाव मिळवेल. 

पंचम , लाभ भावातील शनी सुद्धा वकिलीसाठी पूरक ठरतो. वकील म्हणून व्यवसाय करायचा असेल तर लाभस्थान आणि लाभेश शुभ हवेत  तसेच लग्नात ५ ७ ९ १० ह्या लग्न राशी हव्यात .

केंद्रात शुभ गुरु शनी व्यक्तीला उत्तम न्यायाधीश बनवतात . न्यायाधीश होण्यासाठी लग्नेश बलवान आणि ६ १० ह्या भावात शुक्र गुरु शनी हे ग्रह परस्परांशी संबंधित असावेत .हे अधिकार देणारे ग्रह आहेत . लग्न दशम भावातील राहुसुद्धा उच्च फलित देतो. शनी ५ ११ मध्ये असावा . 

४ ९ ह्या भावांची दशा उच्च शिक्षण देयील पण नोकरी देणार नाही . त्यामुळे शिक्षण घेताना पुढे नोकरीसाठी असलेल्या दशांची सांगड घालणे आवश्यक आहे. दशा मार्ग दाखवतेच . जसे नवम भावाच्या दशेत पर्यटन , प्रोफेसर गुरूशी संबंधित व्यवसाय केले तर उत्तम होईल. षष्ठ भाव असेल तर घरी खाद्य पदार्थ करून त्याचा व्यवसाय करावा. पंचम भाव हा कलेचा creative आहे. मुलांच्या शिकवण्या , कला अवगत असेल तर तबला पेटी हेही शिकवता येयील.

ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अश्या विविध पत्रिका संग्रहित करून त्यातील नियम अभ्यासावे . कदाचित अजूनही काही नियम निघू शकतील त्याचेही अध्ययन करावे. नुसते पोस्ट ला लाईक करून काय सध्या होणार . प्रत्येक विषयाचे मनन , चिंतन आवश्यक आहे. 

पुढील भागात इतर व्यवसाय बघुया .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Wednesday, 11 June 2025

शुक्र केतू युती

 || श्री स्वामी समर्थ ||


गोष्ट आहे एका मैत्रिणीची . सतत उदास , निराश , शून्यात कुठेतरी बघत राहणार , पटकन कश्याचेही उत्तर नाही. चेहऱ्यावर सतत गूढता, मनाचा थांगपत्ता लागणार नाही. आपल्या वयाप्रमाणे छान कपडे , केश वेशभूषा नाही . सतत आपले जगबुडी झाल्यासारखे भाव घेवून फिरणारी हि व्यक्ती मला नेहमी कोड्यात टाकत असे. 

ज्योतिष शास्त्र शिकल्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती , त्यांचे चालणे बोलणे ह्याकडे ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून बघण्याची अपोआप सवय होते. खूप वेगाने चालणारी व्यक्ती मग त्याचे चर लग्न असेल. पैसा पैसा करणारे मग त्यांचा धनेश पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल. राहू धनात , मोठमोठ्याने बोलणे, कदाचित व्यसन सुद्धा अनेकदा स्मोकिंग , गालावर खळी लग्नात शुक्र , असो असे ठोकताळे मांडायची सवय होत जाते. 


हिचे व्यक्तिमत्व इतके गूढ होते कि अपोआप माझी उत्सुकता ताणली गेली आणि तिच्या पत्रिकेच्या अभ्यासाला सुरवात केली. प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे तसेच आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा क्रम पाहिला तर त्याही मागे एक ठोस असे कारण असते. 

हिचा विवाह झाला , मुले हि झाली आणि पतीचे निधन झाले. दुसरा विवाह नाही , तसा योगही नाही. पत्रिका पाहताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते तृतीयात असलेल्या शुक्र केतू अंशात्मक युतीने . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक आणि केतू विरक्त ज्या ग्रहासोबत असेल त्या ग्रहाचे सर्व गुण शोषून त्याला रिता करणारा. केतूला दिसत नाही पण त्याला मनाचे चक्षु आहेत , स्पर्शज्ञान आहे . अंतर्मनाची संपूर्ण ताकद आहे .पण शुक जे सुंदर जग दाखवेल आणि ते उपभोगायचे मार्गही देयील ते केतुकडे काहीच नाही. 

साधी वेणीही नाही सारखा तो कसातरी केसांचा अंबाडा घालायचा , एकटे एकटेच राहायचे , फारसे बोलणे नाही , सतत चिंतायुक्त चेहरा आणि मोकळेपणाने हास्य सुद्धा नाही, चांगले ड्रेस , नटणे नाही ह्याचे उत्तर मला शुक्र केतू युतीने क्षणात दिले. शुक्र नुसता कोरडा तर कसे वाटेल नटावे चांगले राहावे. असो. शुक्र आयुष्यातील सगळ्या भौतिक सुखाचा कारक केतुमुळे दुषित झाला. तृतीय भाव हे विवाहाचे भाग्य आहे त्यात शुक्र केतू युती . 

सप्तम भाव पाप कर्तरी योगात . सप्तमेश अष्टम भावात स्तंभी . कुटुंब भावात हर्शल . शनी हर्षलामुळे बिघडला आणि पतीचे निधन अचानक झाले. लग्नातील गुरूने हि घटना वाचवली नाही . चतुर्थ भावात आमावस्या योग . बुध वृश्चिकेत नेप सोबत .

मुलांची जबाबदारी आणि घरची बेताची परिस्थिती . असो. अनेकदा वैवाहिक सुखाचा कारक शुक्र हा जर केतु सोबत युती करत असेल तर त्या व्यक्तीला संसार सुख किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे . शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि शुक्र रस आहे. शुक्र केतू युती असेल तर संसारातील रसच निघून जायील आणि मग निरस आयुष्य वाट्याला येयील. 

अनेकदा सप्तम भाव बिघडतो म्हणून विवाह मोडतो पण त्याही पेक्षा त्याचे खरे कारण म्हणजे शुक्राची पत्रिकेतील स्थिती . शुक्र चांगला असेल तर सकारात्मकता , जीवनात पर्यायाने संसार सुखात आनंद चैतन्य निर्माण होते. शुक्र म्हणजे नुसते  शारीरिक सुख नाही तर आत्मिक , अध्यात्मिक सुखाची बरसात करणाराही हा शुक्र आहे. शुक्र म्हणजे सळसळता उत्साह . संसारात गोडवा शुक्र निर्माण करतो , पती आणि पत्नी ह्यात ओढ निर्माण करणे , एकमेकांच्या सहवासाची ओढ, चांगला स्वयंपाक , गृहसजावट , पै पाहुण्याची उठबस , काहीतरी नवीन करण्याची आवड , कलात्मकता ,  पर्यटन ह्या सर्वाचा एकत्रित मेळ कुटुंबाचा सर्वांगीण विकास , मानसिकता आणि कुटुंबात एकोपा निर्माण करण्यास पूरक ठरतो. 

चेहऱ्यावर प्रसन्नता , गोडवा आणि माणसाबद्दल प्रेम निर्माण करणारा हा शुक्र केतुसारख्या विरक्त शुष्क ग्रहासोबत असेल तर वेगळेच चित्र दिसेल. हि युती मीन राशीत असेल तर अध्यातातील प्रगती  होवू शकते कारण शुक्र हा सगुण भक्तीचाही कारक आहे आणि केतू सारख्या अध्यात्मिक ग्रहासोबत तो मोक्षाचा मार्ग स्वीकारेल. पण संसार सुखाला पारखाच होईल.   

केतू हा घरात असून नसल्यासारखा . त्यामुळे घरातील स्त्री कुटुंबात रममाण होणार नसेल तर संसार कसा होईल हा प्रश्नच आहे. शुक्र केतू युती हे माझ्या मते संसार सुखाला पारखे करणारी युती आहे. पत्रिका मिलन करताना अश्या सर्व बाबी तपासून बघितल्या तर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  


Saturday, 7 June 2025

माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू ????

 || श्री स्वामी समर्थ ||




संथ असणारया पाण्यात खडा टाकला तर जे होते तेच राहू दशा सुरु झाली कि आपल्या आयुष्याचे होते . राहू ह्या भावात चांगला आणि राहू ह्या नक्षत्रात चांगला हे सबकुछ झूट आहे. राहू केतू हे राक्षस आहेत आणि त्यांना कितीही आंजरले गोंजारले तरी त्यांचे मुळ स्वभाव गुणधर्म जाणार नाहीत . प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तश्याच राहुला सुद्धा आहेत . 

राहू हा चंद्राला ग्रहण लावतो म्हणजे नेमके काय होते. आयुष्यात अश्या घटना घडायला सुरवात होते ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो , आपली शांत झोप उडते, मन सैरभैर होते आणि नक्की काय चाललय तेच समजेनासे होते. आपल्या मनाच्या ठिकर्या उडाल्या कि राहूचा विजय झालाच म्हणून समजा कारण तेच तर त्याचे घ्येय आहे . मन शांत नसेल तर काहीच सुचणार नाही , प्रत्येक गोष्ट निरस वाटू लागेल आणि जगण्यातील एकंदरीत सगळाच आनंद विरून जायील .

लहान पणापासून ज्या भावंडासोबत, मित्रांच्यासोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी अगदी शुल्लक गोष्टीवरून वितुष्ट येयील .  वास्तविक ज्या कुटुंबात आपण लहानाचे मोठे झालो त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला पूर्णतः ओळखते मग असे गैरसमज होतातच कसे? कुठल्याही लहान गोष्टीवरून गैरसमज कुणामध्ये होतील ? जे एकमेकांना अनभिद्य आहेत पण इथे तर एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांची तोंड पाहिनाशी झालेली आहेत . समज गैरसमज मनाला त्रास देत राहतात एक दोन नाही तर पूर्ण १८ वर्ष . आयुष्यभर एकमेकांच्या शिवाय राहू न शकणारे भाऊ बहिण एकमेकापासून दुरावतात एकाच शहरात राहून एकमेकांची तोंडे पाहंत नाहीत . अगदी एकमेकांच्या नावाने अंघोळ करतात म्हंटले तर वावगे ठरू नये. 


मित्र मैत्रिणी जवळची सगळी माणसे लहान सहान अत्यंत शुल्लक कारणांनी हळूहळू दूर व्हायला लागतात . मग फोन बंद होतात आपण केला तरी तितकेच बोलणे मोजकेच त्यात भावनिकता लोप पावलेली असते, सगळ्या संवेदना नष्ट होतात , प्रेमाचा ओलावाही नसतो फक्त आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार . ज्या दिवशी तुम्ही समोरच्या व्यक्तीला फोन करायचे बंद होणार त्या दिवसापासून तुमचा संबंध संपला कारण समोरून कधीही फोन येणार नाही . तुम्हाला हौस असेल तर करत राहा फोन. राहू आपली मज्जा बघत राहणार . आपल्याला समजायला लागते कि आपण एकटे पडत चाललो आहोत आणि हा एकटेपणा अत्यंत भयंकर असतो . आपण मनापासून जगतो , सामोर्च्यासाठी खूप काही सातत्याने करत असतो आणि मानसिक गुंतवणूक ती तर विचारूच नका . आयुष्यभराची साथ सोबत असलेली माणसे हळूहळू आपल्यापासून इतकी दुरावतात कारण काहीच नसते . दोन व्यक्तींच्या मधील गैरसमजाची एक अदृश्य भिंत . हे गैरसमज संपत नाहीत , ते दूर होत नाहीत अशी स्थिती राहूच निर्माण करतो.  राहू भोग भोगायला लावतो .


ह्या सगळ्या घटना मन अत्यंत उदास विषण्य करतात आणि शेवटी भावनिक दृष्ट्या आपण कोलमडून पडतो. आपली तब्येत ढासळू लागते , आर्थिक सुबत्ता कमी होते कामात लक्ष लागत नाही आणि काहीच नकोसे वाटते . जीवन हे एकटेपणाने नाही तर आपल्या आप्त , मित्र नातेवाईक ह्यांच्यासोबत जगण्यासाठी आहे . 


आपण आजवर प्रत्येकासाठी किती काय काय केले वेळ प्रसंगी कसे मदतीला धावून गेलो , कश्याचाही विचार न करता पैसाही खर्च केला हे सर्व आठवत राहते पण त्याचा काहीच उपयोग नसतो आणि ह्या गोष्टी बोलूनही दाखवायच्या नसतात त्या ज्याच्या त्याने समजून घ्यायच्या असतात .

आपली कुणालाही आठवण येत नाही अगदी आपण आहोत कि मेलो ह्याची विचारपूस पण कुणी करत नाही . हि सर्व परीस्थिती निर्माण करणारा राहू अत्यंत बुद्धिवान माहीर आहे. आपल्या मनात यायच्याही कितीतरी आधी त्याने गोष्टी घडवून आणलेल्या असतात . 

गैरसमज हे मोठे विष आहे आणि ते आपल्याही नकळत आपल्या विरुद्ध आपल्याच लोकांच्या मनात भरवून राहुने आपला डाव साधलेला असतो . कसला डाव ? तर आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा . हेच ते चंद्र ग्रहण जे मनाला लागते . आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे ह्या जगातून निघून जाणे ह्याही घटना राहू दशेत घडतात . पैशाचा अपव्यय आणि माणसांचाही होतो तो वेगळाच.

अनाठायी पैसा खर्च होतो आणि मन चिंतीत राहते. पैसा भरपूर येतो पण टिकत नाही त्याला असंख्य दिशा फुटतात . राहूच्या दशेत काहीच राहत नाही . ओंजळीतून सर्व काही निघून जाते. पैसा गेला पुन्हा कष्ट करून मिळवता येतो पण आयुष्यभर जोडलेल्या माणसांचे काय ? माझी माझी म्हणून जपलेली माणसे आपल्या हृदयाच्या कोपर्यातून क्षणात निघून जातात . असंख्य प्रश्न मनाला भेडसावू लागतात . ह्याच माणसांना मी आपले मानले होते माझी माझी माणसे म्हणून डोक्यावर घेवून त्यांच्या सोबत आज इतका आयुष्याचा प्रवास केला होतो ते सर्व खोट होत का? नात्यांवरचा विश्वास उडतो , आणि मग वास्तवाची जाणीव होते तशी परमेश्वराची आठवण येते . 

सगळे दुरावतात पण देव नाही . त्यामुळे सगळ्यांपासून दूर गेलो कि महाराजांच्या, देवाच्या समीप जातो. क्षमायाचना सुरु होतात , राहूचा जप करा , त्याचे रत्न घाला हे करा आणि ते करा पण त्याने खरच जे झाले ते परत येणार आहे का? मनावर असलेले दुक्खाचे वेदनेचे असंख्य ओरखाडे पुसले जाणार आहेत का? कधीच नाही आणि आता हे सर्व बरोबर घेवूनच जगायचे आहे? पुन्हा नव्याने तीच नाती जोडली जातील ? कदाचित नाही .

फसवणूक , विश्वासघात हे राहूचे दुसरे नाव आहे जणू . जवळच्या नात्याने , मित्राने सहकार्याने कुणीही असो त्याने केलेला विश्वासघात मग तो पैशाचा व्यवहार असो , मनाचा किंवा जमीन जुमला . इतके बेमालून फसतो कि आपला आपल्यावरचा विश्वास उडावा. कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही अश्या व्यक्ती आपल्याला फसवून आयुष्यातील मोठे धडे शिकवतात . ज्यांच्या वर आपला आपल्याही पेक्षा अधिक विश्वास असतो त्यांच्याकडून झालेली फसवणूक आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकते .जगायचे कुणासाठी आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर ‘??? शेवटी एकच उत्तर परमेश्वरावर तो आपलाच आहे आणि आपलाच राहणार . 

राहूच्या दशेत कुठल्याही कागदावर सही डोळस पणे करा , कुणालाही जामीन राहताना विचार करा , प्रेमाचे उमाळे अगदी आपल्या मुलांसाठीही नको . राहू च्या दशेत नको त्या व्यक्तींना आपणच जवळ करतो आणि फसतो . समाजात आपले नाव बदनाम करणाऱ्या व्यक्ती राहूच्या दशेत भेटतात . सामाजिक जीवन बदलते, मित्र मैत्रिणी दूर होतात , गैरसमज तसेच राहतात आणि सगळेच दुरावतात . आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा लोकांचा थोडा विचित्र होत जातो आणि आपल्या लोक टाळतात . आपल्याला हे का होत आहे हेच समजत नाही कारण आपण जसे असतो तसेच असतो . आपण बदललेले नसतो तर राहुने परिस्थिती बदललेली असते .

आज आपण राहुबद्दल वेगळा विचार करूया किबहुना राहु देखील कदाचित हेच सुचवत असावा. आयुष्यभर आपल्याला ओळखणारी आपली आपली म्हणवणारी माणसे आपल्याच बद्दल फालतू कारणानी गैरसमज होवून दूर जावूच कशी शकतात ? आपली बिनबुडाची नाती संपुष्टात येतात ,जी आपण डोक्यावर घेवून आयुष्यभर फिरत होतो , ह्यातच राहूच्या असामान्य ताकदीची ओळख आपल्याला होते. कितीही काहीही म्हणा राहू चे खेळ आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतात . नात्यांची खरी ओळख करून देतात , तुम्ही कुणासाठीही कितीही काहीही करा ह्या जगात आपले कुणीही नाही त्यामुळे स्वतःसाठी जगा आणि ह्या नात्यांच्या गुंत्यात अडकू नका हेच तर राहुला सांगायचे नाही ना? असाही विचार अनेकदा करावासा वाटतो .


ह्या विश्वात आपण एकटे येणार आणि एकटेच जाणार हेच जणू सांगण्यासाठी राहुने हा खेळ मांडलेला असावा असे अनेकदा वाटते. आपण ज्या लोकांसाठी जीव ओवाळून टाकतो ती क्षणात परकी कशी होवू शकतात ? मग आजवर काय ओळखले आपण एकमेकांना , एखादी चूक होवू शकते पण आपल्या नात्यात इतकीही परिपक्वता नाही कि आपण एकमेकांना माफ करू शकत नाही  . आपण ज्या नात्यांच्या जीवावर उड्या मारतो ती किती कच्ची तकलादू आहेत हेच राहू आपल्या समोर आणायचा प्रयत्न करत असतो. राहूचे खेळ त्यालाच माहिती . 

आजवर असंख्य वेळा राहूचे लेख आपण वाचले ऐकले पण आज ह्याच राहूचा असाही वेगळा विचार मला करावासा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच. ज्यांनी ज्यांनी राहू दशा भोगली आहे त्यांना माझे म्हणणे नक्कीच पटेल . 

अखंड विश्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची मोहिनी दाखवणारा राहू हा पूर्णतः वाईट नाही . त्याने तर जग जवळ आणले आहे . आज चे gpay , insta सोशल मिडिया , प्रगत युग राहूचा करिष्मा आहे . प्रत्येक वाईट गोष्टीतूनही काहीतरी शिकण्यासारखा धडा मिळतो तो हा असा . राहुला पूर्णतः समजून घेणे कठीण आहे . अदृश्य शक्ती आपल्या अवती भोवती आहे पण आपण तिला ओळखू  शकत नाही. इथे प्रत्येक माणसात राहू आहे. आपल्यासमोर गोड बोलणारी मागून आपलीच निंदा करणार हे गृहीत धरून चालले तर त्रास कमी होणार . सतर्क राहणे , कमी बोलणे हा राहुसाठी सर्वोत्तम उपाय आहे. 

राहू काय शिकवतोय ? अंतर्मुख व्हा आणि विचार करा . कुणीही आपले नाही पण आपल्या अत्यंत समीप आहे तो आपला देव . आज किती वेळ देतो आपण त्याला. सगळे विश्व फसवे आहे पण देव कधीही आपल्याला अंतर देणार नाही , दिलेहि नाही . उर्वरित आयुष्य त्याच्या चरणाशी समर्पित केले तर झालेला त्रास वेदना दाह नक्कीच  सुसह्य होयील ह्यात शंका नसावी. 



सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

Friday, 6 June 2025

रेशीमगाठी भाग 5 -गुण मिलन आणि ग्रह मिलन करताना लावायचे निकष

 || श्री स्वामी समर्थ ||


पूर्वीच्या काळी विवाह जमवण्यासाठी गुण पहिले जात असत . १८ गुण जुळले तर विवाह करायला हरकत नाही . पण आता कालानुरूप ज्योतिष परिभाषा सुद्धा बदलत आहे आणि म्हणून फक्त गुण मिलन पुरेसे नाहीतर ग्रह मिलन पण करावे असे मी नक्कीच सुचवीन .

पत्रिकेतील गृहसौख्य , संसार सुख , व्यवहार , नोकरी आणि आयुष्यमर्यादा , पर्यटन , नवीन वस्तूचा लाभ ह्या सर्व गोष्टी गुण मिलनावरून समजणार नाहीत म्हणून ग्रह मिलन तितकेच महत्वाचे वाटते . आपल्या आयुष्यातील आजार , आजूबाजूच्या लोकांशी पटणे न पटणे , पैशाचा ओघ हे सर्व गुण मिलानावरून नाही समजणार . 

गुण मिलन हे ३६ गुणांचे आहे . आपले व्यक्तिमत्व , नाती गोती , नोकरी व्यवसाय , अर्थार्जन , जोडीदार , गृहसौख्य , संतती , परदेशगमन , छंद , आजार , कष्ट , संकटे ह्या सर्व गोष्टींची खोली समजायला मूळ पत्रीकेलाच हात घालावा लागतो म्हणून नुसते गुण पुरेसे नाहीत . उदा द्यायचे तर पूर्वी राक्षस गण असलेली मुलगी नको कारण ती उर्मट असू शकेल अरे ला कारे करणारी . पण अशी मुलगी ५० लोकांच्या एकत्रित कुटुंबात रमेल का सामावून घेईल का स्वतःला ? कदाचित नाही कारण तिला स्वतंत्र विचारसरणी असेल म्हणून ती पूर्वीच्या काळात नको होती . पण आता सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे भरून नोकरीला घराबाहेर पडणारी स्त्री हि राक्षस गणाची असली तर अंगात खूप उमेद ताकद असल्यामुळे दिवसभराचा कामाचा डोंगर उपसु शकेल. घरात पाहुणे आले तर सगळ्यांसाठी खपून स्वयपाक करेल लगेच दमले दमले म्हणून हॉटेल मधून जेवण मागवणार नाही .  ह्या सर्वच एकत्रित विचार केल्यावर असे लक्ष्यात येते कि बदलेल्या काळानुसार , मानवी जीवन सुद्धा बदलले आहे आणि बदलेल्या जीवन शैलीच्या वेगळ्या आहेत त्यामुळे गुण आणि ग्रह मिलन हे दोन्ही करणे क्रमप्राप्त आहे. 

ग्रह मिलन कसे करावे ?

वैवाहिक सौख्य उत्तरोत्तर मिळाले तर विवाह परिपूर्ण होतो. उत्तम दर्जाचे वैवाहिक सौख्य पाहण्यासाठी सप्तम भाव , सप्तमेश , चंद्र शुक्र गुरु पाहावेत .वैवाहिक जीवनात चढ उतार , शारीरक , मानसिक त्रास आहेत का ? एखादी मानसिक विकृती , लैंगिक विकृती समस्या , मानसिक दुर्बलता , शारीरिक अत्याचारांना बळी पडणे ह्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत . आरोग्य आणि आयुष्यमान हे घटक अजिबात डावलून चालणार नाहीत . दोघांच्याही पत्रिका वैचारिक दृष्टीने ठीक असाव्यात म्हणून दोघांचीही लागणे आणि लग्नेश पाहावे. एकाचे पारडे खाली गेले तर दुसर्याचे वर असावे म्हणजे एकमेकांना पूरक असावेत . 

स्त्रियांच्या पत्रिकेत द्वितीय भाव सुस्थितीत असला पाहिजे कारण तिथे आपले कुटुंब आहे . कुटुंबात रुळणारी , माणसाना आपलेसे करणारी आणि घर आपले मानणारी मुलगी संसार तीकावान्याकडे लक्ष्य देयील . तसेच चतुर्थ भाव कारण ते आपले घर जिथे आपले वास्तव्य असते . २ आणि ४ हे दोन्ही भाव बलवान हवेत . घरोघरी मातीच्या चुली पण त्या चुलीवर सतत आग पेटायला नको इतकेच .

लग्न षडाष्टकात नको नाहीतर वैचारिक मतभेत होतात . नवर्याला २५ हजार मिळाले तो म्हणेल फिक्स ला टाकू ती म्हणले दोन दिवस महाबळेश्वरला जावू . लग्न हे आपले शरीर देह आहे . आपण दिसतो कसे आणि आपले आयुष्य , सकारात्मकता , जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हे सर्व लग्न भाव दर्शवते.

चंद्र हा आपली मानसिकता , प्रेमाची भावना , सरलता , सहजीवनातील प्रेम , मनाची उमेद आणि ताकद दाखवतो .

भावनिक आरोग्य आणि पत्नीचे मन समजून घेण्याची क्षमता म्हणून चंद्र महत्वाचा आहे . मानसिक दौर्बल्य असेल तर व्यसनाधीनता , मानसिक  असंतुलन होण्याची शक्यता असते . रवी एकमेकांच्या षडाष्टकात नसावा नाहीतर जीवनाची उदिष्टे वेगवेगळी असतात . एकमेकांबद्दल ओढ आकर्षण निर्माण करणारे ग्रह मंगळ शुक्र चंद्र राहू पाहावेत .

ग्रह मिलन करताना एकमेकांच्या राशी सम सप्तक योगात , नवपंचम योगात असतील तर उत्तम .नवपंचम योगात एकाच तत्व येते त्यामुळे आचार विचार , दृष्टीकोन , आर्थिक गणिते , इतर व्यवहार चांगले असतात .चंद्र एकमेकांच्या षडाष्टकात नसावा . 

एकाचे लग्न कन्या आणि दुसर्याचे मीन असेल तर अशी लग्ने made for each other अशी असतात . एकमेकांचे होवून जीवन व्यतीत करतात . एकाचा शुक्र मेष राशीत असेल आणि दुसर्याचा मंगळ राहू तुल राशीत असेल तर एकमेकांच्याबद्दल मानसिक शारीरिक आकर्षण असते . तसेच एकाचा शुक्र मिथुन राशीत आणि दुसर्याचा मंगळ राहू पण मिथुनेत असेल तर एकमेकांसाठी आकर्षण असते . 

ग्रह मिलन करताना पत्रिकेतील काही त्रासदायक योग आपण नक्कीच पहिले पाहिजेत . मुलाच्या पत्रिकेत चंद्र असेल तिथे मुलीच्या मिथुन राशीत शनी मंगळ राहू नसावा . मुलीच्या पत्रिकेत रवी असेल तिथे मुलाचा शनी राहू असतील तर तिच्या प्रगतीत अडथळे येवू शकतात .सतत दडपण राहील मुलीला.

एकाचा चंद्र असेल तिथे दुसर्याचा शुक्र गुरु असेल तर पत्रिका चांगल्या जुळतील.

एकंदरीत गुण आणि ग्रह मिलन व्यवस्थित केले तर पुढे मनोमिलन नक्कीच होणार ह्यात दुमत नसावे.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230