|| श्री स्वामी समर्थ ||
एक लाट आली त्याची चप्पल वाहून गेली त्याने लिहिले समुद्र चोर आहे .
एका म्हातारया माणसाला समुद्रावर शिंपले दिसले त्यात मोती होते , मोत्यांमुळे त्याचे आयुष्य बदलले त्याच्या मते समुद्र दानशूर आहे .
मासेमारी करणार्यांना पुष्कळ मासे मिळाले ते म्हणाले समुद्र अन्नदाता आहे.
आजीचा मुलगा समुद्रात गेला आणि गेलाच तिच्यामते समुद्र खुन्यापेक्षाही वाईट आहे .
एक लाट आली आणि सर्वकाही मिटवून गेली. समुद्राला कुणाशीही काहीही देणेघेणे नाही .
आपण सुद्धा आयुष्यात समुद्रासारखे जगले पाहिजे , आपण आपले काम करत राहायचे . कोण काय म्हणतय त्याकडे लक्ष्य न देता नामस्मरण करत आपले कर्म करत राहावे .
जोवर स्वार्थ आहे तोवर लोक आपले म्हणतात आणि स्वार्थ साधला कि आपलीच बदनामी करतात .
परमेश्वराची सत्ता अगाध आहे त्याच्या दृष्टीतून काहीच सुटत नाही , वेळ आली कि एकदाच सगळे हिशोब करतो ...कायमचे..मग कितीही मुखवटे लावून जगा ..दुक्ख वेदना पाठ सोडत नाहीत .
शनी आपल्या आतच आहे . त्याला वेगळे काहीही सांगायची गरज नाही कारण तो आपल्या श्वासातच विराजमान आहे. लो प्रोफाईल जगा. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांचा विसर पडू देवू नका ...गरज सरो ...केले तर मग आहेच पुढचा अध्याय.
१३ जुलै शनी वक्री होतोय ...सर्वाना सुबुद्धी व्हावी .
सौ. अस्मिता दीक्षित
पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment