Tuesday, 14 July 2020

संचय

||श्री स्वामी समर्थ ||



जन्माला आल्यापासून आपला सगळा वेळ संचय करण्यातच जातो ...सगळे जमवून ठेवायचे ...ओतप्रोत आपल्या गरजेपुरते असावे हा विचारच नसतो ...नुसती हाव ...हे हवे ते हवे .एका पायाला किती ते चपला बुटांचे जोड, कपडे ,सोनेनाणे..प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टींचा नुसता भडीमार करतो ..न संपणारे आहे हे सर्व .

कुठे थांबायचे ते कळतच नाही आपल्याला ..म्हणूनच ह्याला संसार म्हणत असावेत ..सार जे कधीच आटत नाही माया ,प्रेम,लोभ ह्या सगळ्या पोटी आयुष्यभर सतत "संचय " करत राहतो ...शेवटी हे सर्व इथेच सोडून जायचे आहे हे माहित असूनही ..स्वामिनी भक्तांना सांगितले आहे.अरे किती जमा करशील ? किती आणि कश्यासाठी ? हि हाव बरी नाही ..हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ...जितके तूप अधिक घालत जाशील तितका अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होत जायील .

संचय करुया पण तो " अखंड नामाचा " कारण तेच शेवट आपल्याला ह्या भवसागरातून तारून नेणार आहे आणि शेवटचा क्षण सुखाचा करणार आहे ...श्री स्वामी समर्थ


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.