Tuesday, 14 July 2020

जिथे जिथे तु तिथे तिथे मी ....

|| श्री स्वामी समर्थ ||




महाराजांचे अनुभव आणि प्रचीती नाही असा भक्तच विरळा .माझ्या स्वानुभवातून मी आणि माझे जीवन समृद्ध होत गेलेय ..जीवनातील मुल्ये मला अध्यात्माने उलगडून दाखवली ...आज कुणाचाच राग येत नाही ..कसलीच आसक्ती नाही ... समोर बासुंदी आणून दिलीत तर लग्गेच खाईन कारण मी सामान्य माणूस आहे देविदेवता नाही.पण आता आसक्ती कमीकमी होतेय हे नक्की जाणवतेय ..भौतिक सुखासाठी महाराज खचितच नाहीत. आणि ती मिळवण्यासाठी कुठल्याही भक्ताने केलेली कुठल्याही गुरूंची सेवा खचितच फळणार नाही ...हा मार्ग प्रचंड अवघड आहे.....सतत परीक्षा आहेत पण पास झालो म्हणजे व्हायचेच तर आनंदाच्या लहरींवर स्वार होवून पुढील आयुष्य जगणार हे नक्की.....ज्यांनी आपल्यालाच घडवले त्यांच्याकडे काय मागायचे ...ते सर्व देणार ..ते द्यायलाच बसले आहेत फक्त आपल्याला योग्य वेळेसाठी थांबणे गरजेचे आहे....त्यांनी दिलेले आपल्याला पेलवणार ह्याची त्यांना खात्री झाली कि आपल्याला ते देणारच ह्यावर आपली दृढ निष्ठा हवी...

प्रत्येक क्षेत्राचे स्थानमहत्व आहेच आहे त्याबद्दल दुमत नाही पण म्हणून तिथे जायला मिळाले नाही म्हणून " त्यांचे बोलावणे आल्याशिवाय जाता येत नाही ..." हे असे बोलणे आणि इतरांच्याही गळी उतरवणे आता पुरे असे वाटते... महाराज इथेच आहेत कि आपल्यासाबोत ... आत्ता मी काय लिहितेय ते आपल्या सर्वांच्या आधी तेच वाचत आहेत ...स्वामिनी सांगितलेय " शेत पिकवून खा ,," म्हणजेच काम कष्ट करा त्याला पर्याय नाही....अश्यांच्याच मागे मी उभा राहीन ....त्यामुळे जायला नाही मिळाले तर इथे आपल्या कामातच परमेश्वराला पहिले पाहिजे..

जे जे होते आणि होणार आहे ते त्यांच्या इच्छेने ह्यावर विश्वास लग्गेच नाही बसत पण कालांतराने महाराज अश्या काही प्रचीती अनिभव देतात कि बस....सर्व प्रश्नांची उत्तरे आपली आपल्यालाच मिळू लागतात ...सारखे काहीतरी मिळवणे आणि मागत राहणे हे कमी होत जाते आणि आता काहीच नको असे वाटते ...निदान मला तरी हे अनुभव आलेत ....राग ,लोभ ,जिभेचे चोचले सर्व सर्व अंतापर्यंत राहणारच पण त्याच्या मर्यादा आपण हळूहळू ओळखायला शिकतोच आणि म्हणूनच शेवटी मागण्याचे प्रमाण कमी होवू लागते ...इथे सर्वांचेच हे अनुभव असतील...कमी अधिक प्रमाणात ...

सर्वश्रेष्ठ मानसपूजेत महाराज प्रत्यक्ष दर्शन देतातच हा माझा विश्वास आणि स्वानुभव हि ...पण हे अनुभव आपल्याजवळच ठेवावेत कारण सांगून आपल्यातील अहंकार जोपासला जातो हि भीती असते कारण आपण शेवटी सामान्य माणसे..जरा कुणी हवा दिली कि आपला विठोबा घाटोळ झालाच म्हणून समजा....पण महाराजांवरचे भक्तांचे प्रेम उदंड न संपणारे आहे...

माझ्या ओळखीचे एक गृहस्त आहेत ...फार वर्षांचा सुखाचा संसार झाला आणि पत्नी वृद्धापकाळाने निवर्तल्या महाराजांवर संपूर्ण श्रद्धा तरी त्यांना का नेले म्हणून ते इतके नाराज झाले कि विचारू नका . त्यांनतर त्यांनी कधीच पोथी वाचली नाही पण रोज नमस्कार मात्र करतात पोथीला ...हे असे आहे ...लिहिण्यासारखे बरेच आहे ....आज इथेच पूर्णविराम देते.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.