|| श्री स्वामी समर्थ ||
परवा एकाने छान प्रश्न विचारला .जप करत असताना मधेच काही काळ मी जपमाळ घेतो ,काही वेळा असाच करतो ,काही वेळा बोटातील counter वरती जप करतो पुन्हा माळ मग कधी असाच करतो .तर अस चालेल ?
उत्तर अगदी सहज सोपे आहे .मी त्यांना म्हंटले आपण कुठल्याही प्रकारे केलेला जप हा आपल्या देवते पर्यंत पोहोचतो. आपण जपास काय माध्यम वापरतो कि फक्त मुखाने जप करतो, ह्याहीपेक्षा तो किती प्रेमाने ,भावनेने करतो ते महत्वाचे .सुदाम्याने दिलेले पोहे सुद्धा कृष्णाने मिटक्या मारत खाल्ले कारण त्यात प्रेमाचा खर्या भक्तीचा अंश होता . परमेश्वर आपल्या भक्तांना ,त्यांच्या मनातील भाव ओळखतो, त्यामुळे भाव महत्वाचा. कसाही जप करा पण करा .
जप करण्याची बुद्धी झाली तिथेच समजा परमेश्वर प्राप्ती झाली .
अस्मिता