Thursday, 23 July 2020

Ego less....

||श्री स्वामी समर्थ ||




आयुष्य हे अनेक चढ उतारांचे, नागमोडी वळणांचे आहे.. जन्मापासून ते आपल्या अखेरच्या क्षणापासून ते कसे घडवायचे ते अर्थात प्रत्येकाच्या हाती. आपले संचित ,क्रीयामाण आणि प्रारब्ध हे आपले सखे सोबतीच आहेत .आपल्या आयुष्यातील अनेक अनेक गोष्टीं किबहुना सगळ्याच गोष्टी आपल्या कर्मावर अवलंबून असतात .

लावणी सम्राद्नी श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते माणसाने नेहमी लव्हाळ्या सारखे असावे ,ताठ असू नये ,कारण जेव्हा वादळ येते तेव्हा ताठ असलेली माडाची झाडे उन्मळून पडतात पण लव्हाळी नाही. ती तग धरून असतात . आपल्यातील अहंकार हे आपल्या बहुतांश गोष्टींचे मूळ आहे ...मी ..माझे .मला हे शब्द आपली पाठ सोडताच नाहीत .मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना आपल्या आयुष्याला मेडिकल क्षेत्रातील "Cardiogram " चीच उपमा देईल.

आपले आयुष्य महादशांत विभागले गेलेय ...सर्व परिचित आणि जरा दशहत असणारी राहू महादशा येते तेव्हा काय होते ते ज्यांची राहू दशा चालू आहे किंवा संपली आहे त्यांना विचारा.सगळ संपलच असे वाटते ना वाटते तोच गुरु दशा येते आणि मग पुन्हा आशेची किरणे दिसू लागतात .

 गुरु दशेत माणसाचे स्वतःचे आणि समाजातील वजनही वाढते . मनासारख्या गोष्टी घडू लागतात .सकारात्मकता वाढीस लागते ,लाभ होतात ,मार्ग दिसू लागतो,धनप्राप्ती होते.शुभकार्य होतात .कदाचित ह्या सर्वांमुळे मनुष्याचा अहंकारही कळत नकळत वाढीस लागतो आणि म्हणूनच गुरु नंतरची दशा हि असते न्यायाधीशाची शनी महाराजांची. आपल्या सर्व बऱ्या वाईट कर्मांची फळे द्यायला शनी देव येतात. म्हणूनच वाटते आयुष्य हे "Cardiogram "सारखे आहे.आपले आहेत हेच दिवस कायम राहतील असे कधीही गृहीत धरू नये. ह्या तीनही दशा भोगलेली माणसे मी पहिली आणि त्यांचे आयुष्य जवळून पाहताना ह्याच गोष्टी प्रकर्षाने आढळल्या

राहुने झोडपून काढल्यावर आयुष्य सावरायला गुरु महाराज येतात पण जरा कुठे चांगले झाले कि आपल्याला आपल्या राहू दशेत काय काय भोगले आहे ह्याचा विसर पडतो आणि आपण उन्मत(सर्व नाही पण काही महाभाग आहेत ) ,माझ्यासारखा कुणी नाही असे वागू लागतो आणि मग अहंकाराची परिसीमा झाली कि परमेश्वराने नेमणूक केलेले शनिदेव आहेतच... म्हणूनच माणसाने आपले कर्म करत राहावे ,परिस्थिती नेहमीच बदलत असते आणि बदलत राहणार ,इथे काहीच शाश्वात नाही ऋतूही ,निसर्गही बदलतो ,आपले स्वतःचे अस्तित्वही अशाश्वत आहे तेव्हा अहंकाराचा वाराही लागू देवू नये.

उत्तम कर्म करावे आणि प्रभूचरणी ठेवावे ..उपासना ,अध्यात्म,उत्तम कर्म,कुळाचार ह्याने आयुष्य समृद्ध होतेच पण घरातील मोठ्यांचा मानसन्मान ,सर्वांचे उत्तम आदरातिथ्य ह्याने आयुष्याला चार चांद लागतात .प्रगती करताना त्याला अहंकाराची झालर नको लागायला....शानिदशेत आणि साडेसातीमध्ये सुद्धा शनिदेव काय दंड देतात ह्या साठी शनिमहात्म जरूर वाचावे.

सकारात्मकता आणि egoless आयुष्य आपल्याला आनंदाच्या मार्गावर नेते ह्यात दुमत नसावे.

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

#antarnad #Ego # Rahu # Saturn # Jupitor #Life #Karma # Positive vibes #Cardiaogram
#अंतर्नाद #अहंकार # राहू दशा # गुरु महादशा #आयुष्य #कर्मा #सकारात्मक न #आनंद

No comments:

Post a Comment