|| श्री स्वामी समर्थ ||
पण आज ह्या corona मुळे खरतर आपण आपल्या कुटुंबासोबत गुजगोष्टी ,गप्पा करायला , मुलांसोबत वेळ घालवायला .. निवांत वेळ आनायसे मिळाला आहे .खरतर ह्या संधीचे सोने केले पाहिजे . पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र काहीतरी वेगळेच सांगत आहे. मान्य आहे आपले आयुष्यभराच्या दिनक्रमाचे एक विशिष्ठ रुटीन ठरले आहे किबहुना ते आपल्या अंगवळणीच पडले आहे पण तरीही इतका छान वेळ सार्थकी लावायचा सोडून आपण भलतेच ऐकत आहोत. सुरवातीचे ५-६ दिवस छान गेले हक्काची अनायासे सुट्टी मिळाली ..सगळाच आनंद ..पण जसजसा lockdown वाढत गेला तसे हे चित्र झपाट्याने बदलू लागले .
घरात एकमेकांसोबत भांडणे होत आहेत .
एकमेकांचा सहवासही नकोसा वाटत आहे. आणि मग हि भांडणे टाळण्या साठी (हे एक कारण ) बाहेर भटकत राहणे हे प्रकार घडत आहेत . आपण भारतीय भावनेत गुंतलेले आहोत परदेशियान्सारखी आपली संस्कृती नाही . तिथे घरगुती वादांमुळे हजारोनी केसेस कोर्टात गेल्या आहेत .पण आपल्या सारख्या एकोप्याची संस्कृती असलेल्या देशातही हे असे चित्र फार बुचकळ्यात टाकणारे आहे . म्हणजे इतर वेळा ऑफिस मधून सुद्धा चार चार वेळा love you, लवकर घरी ये असे म्हणणारे आपण ? आता आपल्याला आपल्याच कुटुंबाचा सहवासाचे अजीर्ण झालय कि काय असा प्रश्न निर्माण होतोय. नक्की काय खरे म्हणायचे ते कि हे चित्र? आपण फेसबुकला आभासी जग म्हणतो पण आता तर सर्व जगच आभासी आणि भावनाशुन्य झालेय असे वाटू लागले आहे . ग्राहसौख्याला आसुसलेले आपण आज ते भरभरून मिळत असताना त्यास वंचित होवू पाहत आहोत ... सगळीकडेच अशी स्थिती असेल असेही नाही ...पण सर्वसाधारण हेच चित्र आज बहुतांश समाजाचे आहे.
माझी खोली माझा फोन आणि माझा laptop झाले संपले..गृहसौख्य , भावनिकता हे शब्द आता इतिहासजमा होवू लागले आहेत .भारतातील कुटुंबव्यवस्था ...जगाच्या पाठीवर कुठेच पाहायला मिळणार नाही .अनेक पिढ्या एकत्र राहणारी कुटुंबे आता नामशेष होवू लागली असली तरी त्याचे दाखले अजूनही काही प्रमाणत का होयीना आहेत .पण आज हे सर्वच चित्र धूसर होताना दिसत आहे. आपण खरच कुटुंबवत्सल आहोत का आहा प्रश्न आता आपण स्वतःलाच विचारायला हवा ...काय वाटते ?
गृहसौख्य आणि नात्यातील भावनिकता आपण २ किंवा ४ थे स्थानावरून पाहतो. ह्या सर्व परिस्थितीला नक्की काय ग्रहस्थिती कारणीभूत म्हणायची ?
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com