Tuesday, 14 July 2020

उमीद पे दुनिया कायम है..

|| श्री स्वामी समर्थ ||




आपला अहंकार नेस्तनाबूत केलाय ह्या विषाणूने ....

करोडो रुपये असतीलही आपल्याकडे पण आज सगळे फोल ठरलंय...पैशाचा फायदा एकच त्यातल्यात्यात बर्या हॉस्पिटल मध्ये मृत्यू ..अजून काही नाही ...संपत्ती ऐश्वर्य ,मोठेपणा , बडेजाव सर्व एका क्षणात गुल झालय ...हतबत अवस्था झालीय आपली...जीवन किती क्षणभंगुर आहे ह्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

किती लिहायचे आणि किती कुणाकुणाला बोलायचे ??? आज अशिक्षित सोडाच सुशिक्षित जास्ती डोकेदुखी झाले आहेत ,दिवसभर भटकंती चालू आहे .....स्वतः तर जातीलच बरोबर ५-50 जणांना घेवून जातील...कसले सुशिक्षित आपण ???? मास्क चे महत्व पण नाही कळत आपल्याला . काही लोकांकडे मास्क साठी हि पैसे नसतील....एक वेळच्या चहाची सुद्धा भ्रांत असेल .. कच्चीबच्ची काय खात असतील....त्यांना कुठे आहे 50 वेळा हात धुवायलाही पाणी आणि sanitizer ??? आणि ज्यांच्याकडे हे मुबलक आहे ते उंडारत आहेत...पोलीस यंत्रणा ,मेडिकल क्षेत्रातील लोक मुठभर आहेत ..आणि ती आपल्या जीवावर उदार होवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य पणाला लावून दिवसरात्र लढत आहेत...आणि आपण ??? लाज वाटली पाहिजे आपल्याला.....प्रशासनाला आपण नावे ठेवतो पण आपणही त्याचाच एक भाग आहोत ना? काही देशात ventiletar नाहीत रुग्ण जास्ती आहेत ..तिथे lucky draw सारख्या चिठ्ठ्या टाकत आहेत नावांच्या ...ज्याचे नाव येयील त्याला ventilater....अंगावर काटा येतो...एव्ह्ड्यावर भागणार नाही आहे ..पुढील आर्थिक मंदी आणि सलग्न अनेक अनेक संकटाना आपल्याला सामोरे जायचे आहे जी अजून आपल्याला स्पष्ट दिसत सुद्धा नाही आहेत .... सगळ्याची सोंगे आणता येतात पण पैशाचे नाही ...

lockdown नंतर आपली खरी परीक्षा सुरु होईल ...प्रचंड दडपण असेल बाहेर जाताना ... प्रत्येकाकडे संशयाने पाहत राहू आपण.. ट्रेन ,बस ह्यासारख्या सार्वजनिक वाहनातून तेही मुंबईसारख्या ठिकाणी प्रवास करायचं आपल्याला ...हे सर्व चुटकी सरशी संपणारे नाही .त्याचे ओरखडे कित्येक महिने , वर्ष राह अनुभवत राहू आपण...अमेरिकेसारख्या देशात लाखोंच्या नोकर्या गेल्या आहेत जगभर हीच स्थिती आहे आणि होणार आहे त्यात आपणही वेगळे नाहीत ...

सर्व समजतंय आपल्याला....आपण स्वतःच हे सर्व थांबवू शकतो अगदी क्षणार्धार्त .आणि पुन्हा पाहिल्यासारखे आयुष्य अनुभवू शकतो ...म्हणूनच घरात राहा जेणेकरून आता पुन्हा lockdown वाढणार नाही .

ह्या सगळ्यातूनही आशेचा किरण आहेच कि ..आणि ते म्हणजे आपली स्वतःची मानसिकता...मला आणि माझ्या देशाला ह्यातून बाहेर काढायचेच आहे हे लहानसे आशेचे ,रोपटे घट्ट रुजायला हवे आहे मनात ....

उमीद पे दुनिया कायम आहे ... हा काही जगाचा शेवट नाही पण तो झाला तर किती भयानक असेल ह्याची हि एक झलक आहे...

आज मुंबई चे फोटो टीव्हीवर पाहताना खरच वाटत नाही इतकी सुंदर आहे आपली मुंबई ???? परदेशात गेल्यासारखे वाटावे , दृष्ट लागण्यासारखा आहे. आपला सगळाच देश ज्याची आपण आपल्या वाईट सवयी आणि बेशिस्त वागणुकीमुळे अक्षरशः वाट लावली आहे .हि लढाई फक्त पोलिसांची ,डॉक्टरांची , प्रशासनाची आहे का? हि आपल्या सर्वांची आहे....

लवकर स्वतःला सावरा नाहीतर ३ मे चे १५ मे मग १० जून झाले तर नवल वाटायला नको ...आणि त्याला आपणच जबाबदार आहोत ..

उमीद पे दुनिया कायम है .. हे फक्त बोलण्यापुर्तेच राहायला नको ....

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.

antarnad18@gmail.com


लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.